शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

सुमधुर भक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 04:45 IST

माणसंं करू शकतात अशा अनेक अद्भुत गोष्टी जगात आहेत, पण दुर्दैवाने प्रत्येक जण अशा गोष्टींची निवड करतोच असे नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवमाणसंं करू शकतात अशा अनेक अद्भुत गोष्टी जगात आहेत, पण दुर्दैवाने प्रत्येक जण अशा गोष्टींची निवड करतोच असे नाही. ते प्रेम करू शकतात, आनंदी असू शकतात, आपापसात आनंद वाटून घेऊ शकतात, ते एकमेकांसाठी जगू शकतात आणि मरूही शकतात, एकमेकांची सेवा करू शकतात, ते अद्भुत संगीत आणि कलाकृती निर्माण करू शकतात. माणसं करू शकतात अशा सर्व अद्भुत गोष्टींपैकी, सगळ्यात सुमधुर गोष्ट एक व्यक्ती करू शकतो, ती म्हणजे या धर्तीवर चालता-फिरताना जरा भक्ती-भावाने वावरणे. जीवनात सर्वोच्च गोडवा म्हणून जर काही असेल जे मनुष्य आपल्यात अनुभवू शकतो तर नक्कीच तो आहे - भक्तीचा गोडवा. भक्तीयुक्त जीवन जगणे ही सगळ्यात हुशारीची व फलदायक कृती ठरेल. कारण आजपर्यंत कुठल्याच माणसाने आपल्या आयुष्यात भक्तीविना एकनिष्ठतेने जगात असं काहीच विलक्षण, कल्याणकारी निर्माण केलेले नाही. मग तो खेळ असो, कला, संगीत, नृत्य किंवा इतर कोणतंही कार्य असो; जगात जर परिणामकारक असं काहीतरी निर्माण करायची इच्छा असेल तर त्यात स्वत:ला भक्तीयुक्त एकनिष्ठतेने समर्पित केल्याखेरीज ते साध्य करणे शक्य नाही. आणि जी सार्थकता असा एकनिष्ठ भक्त अनुभवतो ती इतर कुणीच समजू शकत नाही आणि ती काही त्याच्या कार्याच्या परिणामावर अवलंबून नाही तर केवळ ते कार्य करण्याच्या आनंदात लाभते. कारण ती व्यक्ती तल्लीन होऊन भक्तिभावाने त्यात समर्पित असते. भक्तिभावाने जगात अनेक विधायक बाबी सहजगत्या साकार होऊ शकतात. मात्र ते लक्षात घेत तसंच आपल्या जीवनातील लक्ष्य हवं. तसंच भक्तिभावपूर्वक आचरण हवं. तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतं. भक्ती जीवनात आनंद निर्माण करते. त्याने प्रत्येक व्यक्ती समाधानी होत जातो. प्रत्येक कुटुंब आनंदी होऊ शकतं आणि संपूर्ण समाजही भक्ती आणि आनंदाने न्हाऊ शकतो. हाच नियम संपूर्ण जगाला लागू होत जातो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक