शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 03:51 IST

‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान.

- प्रल्हाद वामनराव पै

‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान. का दिलं पाहिजे? निसर्गाचा क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम आहे. ‘सुख देणं’ ही सूक्ष्म क्रिया आहे. तिची प्रतिक्रिया सहस्रपटीने मिळणार. तुम्ही म्हणाल, आम्हीच पहिलं का द्यायचं? आपण जेव्हा सुख आपल्याकडे अनुभवतो तेव्हा फक्त तुम्हीच सुखी होता. पण जेव्हा सुख दुस-यांना देता तेव्हा तुम्ही, कुटुंब, समाज, राष्ट्र सुखी होतं. कुणाला द्यायचं? आपल्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आॅफिसमधील सहकारी, शेजारी, इ. द्यायचं. कसं द्यायचं ? आपण वीज कशी देतो, वायरमधून देतो. तसं शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ वागणं, शुभकर्मातून आपण सर्व काही देऊ शकतो. काय द्यायचं? असा विचार येताच आपल्याला वाटतं की धनदान करायचं. आपण काय काय देऊ शकतो पाहूया. जे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लोकांना द्या. तुम्हाला यश पाहिजे तुम्ही दुसºयांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. प्रेम पाहिजे प्रेम द्या. आनंद पाहिजे आनंद द्या. मान (सन्मान) पाहिजे मान (सन्मान) द्या. कौतुक पाहिजे दुसºयाचं कौतुक करा. तुमचं कोणी ऐकावं असं वाटत असेल तर प्रथम तुम्ही दुसºयाचं ऐका. का द्यायचं? कारण तुम्हाला गरज आहे. तुम्हाला सुख, आनंद, सन्मान, कौतुक पाहिजे म्हणून द्या. किती द्यायचं? देण्याची वृत्ती काही लोकांकडे खूप असते. परंतु तुमच्या कुवतीप्रमाणे द्या. आहे ते सर्व देऊ नका. शहाणपणाचा वापर करा. सत्पात्री दान पाहिजे. पण द्यायला शिका. थोडं द्या. आणखी येईल. अजून द्या. अजून येईल. माझ्याकडे मुबलक आहे हा भाव पाहिजे. ऐश्वर्याचा, समृद्धीचा, विपुलतेचा भाव पाहिजे. ‘देताना’ कृतज्ञतेचा भाव पाहिजे. ‘आहे’ हा भाव पाहिजे. अंतर्मनाला भावना भावतात. त्याला असा भाव भावतो. दिल्याने कोणतीच गोष्ट कमी होत नाही. दिल्याने तुमची श्रीमंती आतून आणि बाहेरून वाढते. आतून वाढते म्हणजे मन व्यापक होते. म्हणजे मनाची श्रीमंती वाढते. आणि बाहेरून घरची श्रीमंती वाढते. आपण एका बाजूने हवा बाहेर काढली तर दुुसºया बाजूने ती अधिक दाबाने आत येते. तसं तुम्ही एका बाजूने जेवढे द्याल तेवढे दुुसºया बाजूने येण्याची व्यवस्था होईल. खरं तर देण्याची इच्छा जरी केली तरी येण्याची व्यवस्था होते. म्हणून ‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे.’

टॅग्स :spiritualअध्यात्मिक