शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 03:51 IST

‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान.

- प्रल्हाद वामनराव पै

‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान. का दिलं पाहिजे? निसर्गाचा क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम आहे. ‘सुख देणं’ ही सूक्ष्म क्रिया आहे. तिची प्रतिक्रिया सहस्रपटीने मिळणार. तुम्ही म्हणाल, आम्हीच पहिलं का द्यायचं? आपण जेव्हा सुख आपल्याकडे अनुभवतो तेव्हा फक्त तुम्हीच सुखी होता. पण जेव्हा सुख दुस-यांना देता तेव्हा तुम्ही, कुटुंब, समाज, राष्ट्र सुखी होतं. कुणाला द्यायचं? आपल्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आॅफिसमधील सहकारी, शेजारी, इ. द्यायचं. कसं द्यायचं ? आपण वीज कशी देतो, वायरमधून देतो. तसं शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ वागणं, शुभकर्मातून आपण सर्व काही देऊ शकतो. काय द्यायचं? असा विचार येताच आपल्याला वाटतं की धनदान करायचं. आपण काय काय देऊ शकतो पाहूया. जे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लोकांना द्या. तुम्हाला यश पाहिजे तुम्ही दुसºयांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. प्रेम पाहिजे प्रेम द्या. आनंद पाहिजे आनंद द्या. मान (सन्मान) पाहिजे मान (सन्मान) द्या. कौतुक पाहिजे दुसºयाचं कौतुक करा. तुमचं कोणी ऐकावं असं वाटत असेल तर प्रथम तुम्ही दुसºयाचं ऐका. का द्यायचं? कारण तुम्हाला गरज आहे. तुम्हाला सुख, आनंद, सन्मान, कौतुक पाहिजे म्हणून द्या. किती द्यायचं? देण्याची वृत्ती काही लोकांकडे खूप असते. परंतु तुमच्या कुवतीप्रमाणे द्या. आहे ते सर्व देऊ नका. शहाणपणाचा वापर करा. सत्पात्री दान पाहिजे. पण द्यायला शिका. थोडं द्या. आणखी येईल. अजून द्या. अजून येईल. माझ्याकडे मुबलक आहे हा भाव पाहिजे. ऐश्वर्याचा, समृद्धीचा, विपुलतेचा भाव पाहिजे. ‘देताना’ कृतज्ञतेचा भाव पाहिजे. ‘आहे’ हा भाव पाहिजे. अंतर्मनाला भावना भावतात. त्याला असा भाव भावतो. दिल्याने कोणतीच गोष्ट कमी होत नाही. दिल्याने तुमची श्रीमंती आतून आणि बाहेरून वाढते. आतून वाढते म्हणजे मन व्यापक होते. म्हणजे मनाची श्रीमंती वाढते. आणि बाहेरून घरची श्रीमंती वाढते. आपण एका बाजूने हवा बाहेर काढली तर दुुसºया बाजूने ती अधिक दाबाने आत येते. तसं तुम्ही एका बाजूने जेवढे द्याल तेवढे दुुसºया बाजूने येण्याची व्यवस्था होईल. खरं तर देण्याची इच्छा जरी केली तरी येण्याची व्यवस्था होते. म्हणून ‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे.’

टॅग्स :spiritualअध्यात्मिक