शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 03:51 IST

‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान.

- प्रल्हाद वामनराव पै

‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान. का दिलं पाहिजे? निसर्गाचा क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम आहे. ‘सुख देणं’ ही सूक्ष्म क्रिया आहे. तिची प्रतिक्रिया सहस्रपटीने मिळणार. तुम्ही म्हणाल, आम्हीच पहिलं का द्यायचं? आपण जेव्हा सुख आपल्याकडे अनुभवतो तेव्हा फक्त तुम्हीच सुखी होता. पण जेव्हा सुख दुस-यांना देता तेव्हा तुम्ही, कुटुंब, समाज, राष्ट्र सुखी होतं. कुणाला द्यायचं? आपल्या जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आॅफिसमधील सहकारी, शेजारी, इ. द्यायचं. कसं द्यायचं ? आपण वीज कशी देतो, वायरमधून देतो. तसं शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ वागणं, शुभकर्मातून आपण सर्व काही देऊ शकतो. काय द्यायचं? असा विचार येताच आपल्याला वाटतं की धनदान करायचं. आपण काय काय देऊ शकतो पाहूया. जे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लोकांना द्या. तुम्हाला यश पाहिजे तुम्ही दुसºयांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. प्रेम पाहिजे प्रेम द्या. आनंद पाहिजे आनंद द्या. मान (सन्मान) पाहिजे मान (सन्मान) द्या. कौतुक पाहिजे दुसºयाचं कौतुक करा. तुमचं कोणी ऐकावं असं वाटत असेल तर प्रथम तुम्ही दुसºयाचं ऐका. का द्यायचं? कारण तुम्हाला गरज आहे. तुम्हाला सुख, आनंद, सन्मान, कौतुक पाहिजे म्हणून द्या. किती द्यायचं? देण्याची वृत्ती काही लोकांकडे खूप असते. परंतु तुमच्या कुवतीप्रमाणे द्या. आहे ते सर्व देऊ नका. शहाणपणाचा वापर करा. सत्पात्री दान पाहिजे. पण द्यायला शिका. थोडं द्या. आणखी येईल. अजून द्या. अजून येईल. माझ्याकडे मुबलक आहे हा भाव पाहिजे. ऐश्वर्याचा, समृद्धीचा, विपुलतेचा भाव पाहिजे. ‘देताना’ कृतज्ञतेचा भाव पाहिजे. ‘आहे’ हा भाव पाहिजे. अंतर्मनाला भावना भावतात. त्याला असा भाव भावतो. दिल्याने कोणतीच गोष्ट कमी होत नाही. दिल्याने तुमची श्रीमंती आतून आणि बाहेरून वाढते. आतून वाढते म्हणजे मन व्यापक होते. म्हणजे मनाची श्रीमंती वाढते. आणि बाहेरून घरची श्रीमंती वाढते. आपण एका बाजूने हवा बाहेर काढली तर दुुसºया बाजूने ती अधिक दाबाने आत येते. तसं तुम्ही एका बाजूने जेवढे द्याल तेवढे दुुसºया बाजूने येण्याची व्यवस्था होईल. खरं तर देण्याची इच्छा जरी केली तरी येण्याची व्यवस्था होते. म्हणून ‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे.’

टॅग्स :spiritualअध्यात्मिक