शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 03:06 IST

’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’

- प्रल्हाद वामनराव पैराष्ट्रभक्ती म्हणजे आपलं प्रत्येक पाऊल राष्ट्रहितार्थ असायला हवं. आज लॉकडाऊनच्या काळात आपण सरकारने सांगितलेले सर्व नियम व अटी पाळणे म्हणजे राष्ट्रभक्ती. जीवनविद्या मिशनमधील बालसंस्कार केंद्रातील एक मुलगी एका वेगळ्या शिबिरात गेली होती. तिथे त्यांना एक प्रश्न विचारला गेला, ‘एक कप चहासाठी किती गोष्टींची आवश्यकता आहे?’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’ कसं काय बरं? तिने सविस्तर उत्तर दिलं, ‘ऊस लावणाऱ्या शेतकºयापासून ती साखर तयार होऊन दुकानातून आपल्या घरी पोहोचण्यापर्यंत अनेकांचा हातभार लागलेला असतो. तसंच चहा पावडर, दूध, गॅस, पाणी, भांडी आदींबाबतीतही! पाहिलंत मुलांनो, आपण फक्त एक कप चहा पिताना किती हातांची मदत घेत असतो! पण याची जाणीव आपल्याला असते का?’ अशा एकमेकांच्या आधारावर, कष्टावर हे जग चाललं आहे. प्रत्येकजण वेगवेगळी कामे करतो म्हणून या जगात एकप्रकारची व्यवस्था आहे. स्वत:ला आपण केंद्रस्थानी ठेवून आपण पाहिलं तर मी, माझ्या गरजा, माझे कुटुंब, समाज, राष्ट्र, पर्यावरण या सर्वांचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होत असतो. आपली व्यवस्था होत असते. सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. शेतकऱ्यांमुळे अन्नाचा घास मिळतोय. कामगारांमुळे वेगवेगळ्या वस्तू आपल्यापर्यंत येतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे जगाला फायदा होतो. शिक्षकांमुळे ज्ञान, तर डॉक्टरांमुळे आरोग्य, सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय? सर्व लोक आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना राष्ट्र, समाजासाठी योगदान देत असतात. हे समाजऋण फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, आपले काम प्रामाणिकपणे, आवडीने करून! समाज सुखी तर आपण सुखी, हे लक्षात घेऊन सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना म्हणूया, असे शुभचिंतन प्रत्येकाने केले तर तो उत्तमरीतीने समाजऋण फेडू शकतो!