शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 03:06 IST

’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’

- प्रल्हाद वामनराव पैराष्ट्रभक्ती म्हणजे आपलं प्रत्येक पाऊल राष्ट्रहितार्थ असायला हवं. आज लॉकडाऊनच्या काळात आपण सरकारने सांगितलेले सर्व नियम व अटी पाळणे म्हणजे राष्ट्रभक्ती. जीवनविद्या मिशनमधील बालसंस्कार केंद्रातील एक मुलगी एका वेगळ्या शिबिरात गेली होती. तिथे त्यांना एक प्रश्न विचारला गेला, ‘एक कप चहासाठी किती गोष्टींची आवश्यकता आहे?’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’ कसं काय बरं? तिने सविस्तर उत्तर दिलं, ‘ऊस लावणाऱ्या शेतकºयापासून ती साखर तयार होऊन दुकानातून आपल्या घरी पोहोचण्यापर्यंत अनेकांचा हातभार लागलेला असतो. तसंच चहा पावडर, दूध, गॅस, पाणी, भांडी आदींबाबतीतही! पाहिलंत मुलांनो, आपण फक्त एक कप चहा पिताना किती हातांची मदत घेत असतो! पण याची जाणीव आपल्याला असते का?’ अशा एकमेकांच्या आधारावर, कष्टावर हे जग चाललं आहे. प्रत्येकजण वेगवेगळी कामे करतो म्हणून या जगात एकप्रकारची व्यवस्था आहे. स्वत:ला आपण केंद्रस्थानी ठेवून आपण पाहिलं तर मी, माझ्या गरजा, माझे कुटुंब, समाज, राष्ट्र, पर्यावरण या सर्वांचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होत असतो. आपली व्यवस्था होत असते. सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. शेतकऱ्यांमुळे अन्नाचा घास मिळतोय. कामगारांमुळे वेगवेगळ्या वस्तू आपल्यापर्यंत येतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे जगाला फायदा होतो. शिक्षकांमुळे ज्ञान, तर डॉक्टरांमुळे आरोग्य, सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय? सर्व लोक आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना राष्ट्र, समाजासाठी योगदान देत असतात. हे समाजऋण फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, आपले काम प्रामाणिकपणे, आवडीने करून! समाज सुखी तर आपण सुखी, हे लक्षात घेऊन सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना म्हणूया, असे शुभचिंतन प्रत्येकाने केले तर तो उत्तमरीतीने समाजऋण फेडू शकतो!