शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

परी वैष्णव न होसी अरे जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 4:03 PM

जीवन जगत असतांना माणसाला सुख असावे असे वाटते पण सुख मिळत नाही. त्याचे प्रयत्न अनेक प्रकारचे असतात. भौतिक साधनाने सुख न

जीवन जगत असतांना माणसाला सुख असावे असे वाटते पण सुख मिळत नाही. त्याचे प्रयत्न अनेक प्रकारचे असतात. भौतिक साधनाने सुख न मिळता सुखाचा भास होतो. प्रपंचातील आजचे सुख उद्याचे दु:ख कधी होईल हे सांगता येत नाही. भौतिक साधनाने सुख नाही मिळाले कि मग मात्र माणूस अन्य मार्गाकडे वळतो. देव, देवलासी, बाबा, संत, साधू अशा अनेक प्रकारे तो उपाय करीत असतो पण ! धन हरे, धोका न हरे। अशी स्थिती होते. एके ठिकाणी म्हटले आहे. ‘चंदन थे तो घिस गये, रहे गये निमके खोड । सच्चे साधू चले गये रहें गये चपाती चोर ’ त्यामुळे खरे साधू संत ओळखू येणे अवघड आहे. कारण वरच्या वेषावर साधुत्व अवलंबून नाही. निळोबाराय म्हणतात ‘वर वेषा आम्ही पाहावे ते काय । अंतरीचे नोहे विद्यमान ।।’ वरच्या वेषावर काहीही अवलंबून नाही. संत मुक्ताबाई सुद्धा म्हणतात, वरी भगवा झाला नामे । अंतरी वश्य केला कामे ।।१।। ऐसा नसावा संन्याशी । जो का परमार्थाचा द्वेषी ।।२।। भगवा वेष धारण केला म्हणजे तो संन्याशी असेलच असे नाही. कदाचित तो दांभिक असू शकेल. म्हणून खरा साधू, संत कोणाला म्हणावे हे कळलेच पाहिजे. संत कबीरांचे म्हणणे असे आहे कि, पाणी पिना छानके, गुरु करना जानके।। आपण पाणी प्यायचे असेल तर ते स्वच्छ करून मगच पितो. तसेच जर गुरु करायचा असेल तर सर्व लक्षणे पाहूनच करावा. उगीच त्याची विद्वता, कपडे, बाह्य वैभव पाहून त्याला भुलू नाही. संत, वैष्णव हे एकार्थवाची शब्द आहेत. तापत्रयें तापला गुरुते गिवसिती । भगवा देखोनि म्हणती तारा स्वामी । मग ते नेणोनि उपदेशाच्या रीती । आनेआन उपदेशिती ।।१।।ज्ञानेश्वर माउली ।। त्रिविध तापाने जीव पोळलेला असतो मग त्याला वाटते कोणी तरी साधू भेटला कि त्याला गुरु करावे आणि मग भगवे कपडे घातलेल्या एखाद्या भोंदू साधूची भेट होते व त्यालाच गुरु करतात पण ! तो साधू नसून नुसता वेषधारी असतो. तो या चेल्याची चांगली फसगत करतो आणि हे सर्व त्या शिष्याच्या उशीरा लक्षात येते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.परमार्थ करीत असूनही साधुत्व अंगी येईलच म्हणून सांगता येत नाही. वैष्णव म्हणविणे सोपे आहे पण प्रत्यक्षात वैष्णव होणे अवघड आहे. वैष्णव तो जया । अवघी देवावर माया ।।१।। नाही आणिक प्रमाण । तन धन तृण जन ।।२।।तू.म. ।। त्यालाच वैष्णव म्हणतात. ज्याचे सर्वस्वी प्रेम फक्त देवावर असते. त्याच्या चित्तात इतर कोणालाही जागा नसते. कारण प्रेम हे सर्वात उच्च प्रतीचे भक्तीचे लक्षण आहे. या भक्तीच्या आड तन, धन, जन काहीही येत नाही किंबहुना तो अत्यंत निस्पृह झालेला असतो. पातिव्रतेच्या प्रेमाचा विषय एकच असतो तो म्हणजे तिचा पती, पतीशिवाय ती आणिकाची स्तुती करू शकत नाही. कदाचित दुस-या पुरुषाची स्तुती झालीच तर तो व्यभिचार ठरतो. आणिकाची स्तुती आम्हा ब्रह्म्हांत्या ।। तसेच परमार्थात सुद्धा असते. भक्ती एक एकनिष्ठ असावी लागते. गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास असे चालत नाही पण ! बहुतेक सर्व ठिकाणी असेच दिसते. परमार्थ न करणा-यांची गोष्ट एक वेळ विचारात नाही घेतली तरी चालेल. पण जे भक्ती करतात ते सर्व वैष्णवच असतील असे नाही. श्री संत नामदेव महाराजांनी वैष्णव कोणाला म्हणावे हे एका अभंगात फारच सुंदर सांगितले आहे. वेदाध्ययन करिसी तरी वेदीकच होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।।१।।पुराण सांगसी तरी पुराणिकाची होसी। परी वैष्णव न होसी अरे जना।।२।।गायन करिसी तरी गुणिजन होसी ।परी वैष्णव न होसी अरे जना।।३।। कर्म अचरसी तरी कर्मठची होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।४।।यज्ञ करिसी तरी याज्ञिकाची होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।।५।।तीर्थ करिसी तरी कापडीच होसी।परी वैष्णव न होसी अरे जना।।६।।नामा म्हणे केशवाचे घेसी।तरीच वैष्णव होसी जना।।७।।वेदाध्ययन केले व चांगला वैदिक जरी झाला तरी तू वैष्णव होईलच असे नाही. पुराण चांगले रंगवून जरी सांगता आले तरी तू पुराणिक होसील पण वैष्णव नाही होणार. चांगले गाता आले, भक्ती गीत गायन केले म्हणजे तो भक्त थोडाच असतो तो फार तर फार कलाकार, गायक, गुणी असतो पण तो वैष्णव नसतो. व्यवस्थित यथासांग कर्म करता आले म्हणजे तो कर्मठ असतो तो वैष्णव होईलच असे नाही. यज्ञ याग व्यवस्थित करता आले म्हणजे तो चांगला याज्ञीक होईल पण वैष्णव होणे अवघड आहे. तीर्थ यात्रा करण्याचे जमले म्हणजे परमार्थ करता आला असे म्हणता येत नाही तो तीर्थयात्रा करणारा कापडी, संयोजक होईल पण खरा वैष्णव होणार नाही. भगवतांचे नाम मोठ्या प्रेमाने एकनिष्ठने घेतले म्हणजे मगच तो नामधारी वैष्णव होतो.जो वैष्णव असतो त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. शास्त्रामध्ये वेगवेगळे प्रकारचे वाद असतात उदा. सृष्टी-दृष्टी वाद, दृष्टी- सृष्टी वाद, अजात वाद, विवर्त वाद, अनध्यस्त विवर्त वाद, त्यापैकीच दृष्टी-सृष्टी वाद आहे. याचा अर्थ असा आहे, दृष्टिकाली सृष्टी आपण व्यवहारात एखादा चांगला मनुष्य नसला कि आपण त्याला म्हणतो ह्या माणसाची दृष्टी चांगली नाही, सुर्ष्टी जसी आहे तशी आहे आहे पण दृष्टी चांगली नाही, याप्रमाणेच जो वैष्णव असतो त्याच्या दृष्टीने जगत हे जगत नसून ते परमात्म्याचेच रूप असतो भगवंतच या विश्वाच्या रूपाने नटलेला असतो. ‘जग असकी वास्तूप्रभा ।। असे अनुभवामृतामध्ये माउलींनी म्हटले आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।१।। आइकजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ।।२।। कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।३।।.. हा सुंदर विचार जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी मांडला आहे तो अगदी यथार्थ आहे. म्हणून वरवरच्या लक्षणावर कधीहि भुलू नये. संतांनी सांगितलेले लक्षण विचारात घेऊनच संत, साधू , वैष्णव यांना शरण जावे म्हणजे आपली फसगत होणार नाही.भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीलेगुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी (पाटील) ता. नगरमोबाईल ९४२२२२०६०३

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर