शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संयमातून आनंदाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 20:35 IST

आनंदाची निर्मिती करावयाची नसते. ती आपोआप होत असते. आणि आपण ती उत्स्फूर्तपणे अनुभवयाची असते. अनुभव हाच आनंदाचा गाभा असतो. प्राण असतो. 

- रमेश सप्रेगोष्ट तशी अनेकांना माहीत असलेली. गोष्ट कसली प्रसंगच आहे तो. श्याम आणि त्याचे आई वडील यांच्या मधला. श्याम म्हणजे आपले सानेगुरूजी, श्यामची आई म्हणजे संस्कारांची साक्षात् मूर्ती, संस्कारदेवता. ‘मातृदेवो भव’ म्हणताना मुख्य भाव हा संस्कारांचा म्हणजे हल्लीच्या भाषेत मूल्य शिक्षणाचा (व्हॅल्यू एज्युकेशनचा) असतो. काही संस्कार घडतात तर काही घडवले जातात. या प्रसंगात हे दोन्ही प्रकार दिसतात. श्यामच्या आईवडिलांनी त्याच्यावर घडवलेले संस्कार तर कुटुंबातील वातावरण, परस्परातील स्नेहबंध यातून घडलेले संस्कार. त्याचं असं झालं-श्याम हा आपल्या गुणांमुळे नि स्वभावामुळे सर्वाचा लाडका होता. त्याच्या आईचा तर तो जीव की प्राण होता. शाळेत असताना शिक्षणासाठी त्याला अनेक गावी जाऊन निरनिराळ्या शाळांतून शिक्षण घ्यावं लागलं. अशावेळी तो सुटीसाठी जेव्हा घरी येई तेव्हा सर्वाना अर्थातच खूप आनंद होई. आईला तर जास्तच. घरची गरीबी असल्यामुळे अनेक गोष्टी मनात असूनही करता येत नसत; पण असं असलं तरी प्रेम, सेवा, त्याग अशा संस्कारांची श्रीमंती त्यांच्या कुटुंबात होती. गरीबी म्हणजे दारिद्रय़ नव्हे. गरीबी ही आर्थिक परिस्थितीवर तर दारिद्रय़ हे मनाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. गरीबी ही बऱ्याच वेळा शाप नसून वरदान ठरू शकते. श्यामला संस्कारांच्या दृष्टीनं संपन्न घरच्या या गरीबीनंच बनवलं असेल त्या परिस्थितीत मनाचं समाधान कसं टिकवायचं हे वडिलांकडून तर अखंड आनंदात कसं राहायचं हे आईकडून श्याम शिकला. एवढंच नव्हे तर वरवर दिसणाऱ्या या दु:खालाही आनंदाची झालर कशी लावायची याचंही शिक्षण मिळाल्यामुळे श्याम हा स्वत: संस्कारसंपन्न, सुसंस्कृत झाला असं नव्हे तर मराठी जाणणाऱ्या या मुलांच्या तसेच वडील मंडळींच्या मनावरही त्यानं संस्कारांचं सुरेख सिंचन केलं.श्यामची आई ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर संस्कारांचा संतत अभिषेक करणारी शक्ती होती. अशातूनच आनंदाची अखंड अनुभूती घेता येते. एके दिवशी श्याम येणार म्हणून आईनं त्याला आवडणारी फणसाची भाजी करण्याचं ठरवलं. एरवी श्यामची आई सुगरण नि अन्नपूर्णा दोन्ही होती. ती म्हणायची, ‘भोपळीचा, भेंडीचा, शेवग्याचा कोणताही कोवळा पाला ही पालेभाजीच असते. तिखट, मिठ नि तेलाची फोडणी दिली तर सारं गोड लागतं.’ नुसती म्हणायचीच नाही तर तिच्या स्वयंपाकातून याचा अनुभव सर्वाना रोज येत असे. तो आनंदाचा अमृतानुभव असे.त्या दिवशी वडिलांनी पाटीलवाडीहून भाजीसाठी फणस आणला. तो जून असेल (म्हणजे कोवळा नसेल) तर ‘उकडगरेच करा’ असंही सांगितलं. आईनं भाजी करायला घेतली ती चिरून शिजवून पानात वाढेपर्यंत तिच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती. हे सर्वाच्या लक्षात आलं. आधी चुलीचा धूर नि त्यात भावनांचा पूर मग काय विचारता? आईची भावविव्हळ अवस्था सर्वाच्या लक्षात आली. जेवायला सुरुवात केल्यावर पहिल्याच घासाला सगळ्यांच्या लक्षात आलं की भाजीत आई मीठ घालायला विसरल्यामुळे ती अळणी झाली आहे. नेहमीच्या स्वभावाप्रमाणे श्याम जोरात म्हणाला, ‘आई, पण तो पुढे काय म्हणणार इतक्यात वडिलांनी सर्वाना गप्प बसून मुकाटय़ानं भाजी खाण्यास सांगितली. स्वत:ही ‘काय फक्कड झालीय भाजी, एकदम राजमान्य, म्हणजे राजालाही आवडेल अशी!’ असं म्हणत ती अळणी भाजी मिटक्या मारीत खाल्ली. आईच्या लक्षात येऊन तिला वाईट वाटू नये म्हणून पानात वाढलेलं मीठही भाजीला लावलं नाही. मुलांनीही भाजी खाल्ली. शेवटी आई जेवायला बसली. पहिला घास खाताच तिच्या लक्षात आलं की भाजीत मीठ घालायचं राहून गेलं. तिनं हाक मारली. ‘श्याम’ तो आल्यावर आसूभिजल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली, ‘अरेरे, अळणी भाजी तुम्ही सर्वानी खाल्लीत ना? तू तरी सांगायचंस श्याम’ यावर श्यामनं घडलेला सारा प्रसंग सांगितला.खरंच, श्याम म्हणतो त्याप्रमाणे आपल्या विसरभोळेपणामळे सर्वाना अळणी, बेचव भाजी खावी लागली म्हणून हळहळणारी माझी आई श्रेष्ठ की संयम पाळून सतत कामात असलेल्या आईला समजून घेऊन संयमानं वागून घरात समाधान राखणारे वडील श्रेष्ठ याचा निर्णय लागणं कठीण आहे. दोघांनीही आपापल्या वागण्यातून मोलाचे संस्कार घडवले होते. ते खरे सुसंस्कार होते. सर्वाना आनंद देणारे. सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण, आर्थिक सुबत्ता, सत्ता यापैकी काहीही फार महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते वातावरण आणि सुसंस्कृत व्यक्तींचा सहवास. श्यामच्या भाग्यानं त्याला मिळाला. त्यातूनच पुढे साकारले साने गुरूजी. ते जसे सर्वाचे ‘गुरुजी’ होते तशीच सर्वाची आईही होते. गुरुमाउली होते.आनंदाची निर्मिती करावयाची नसते. ती आपोआप होत असते. आणि आपण ती उत्स्फूर्तपणे अनुभवयाची असते. अनुभव हाच आनंदाचा गाभा असतो. प्राण असतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक