शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

ऊर्जामय व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:33 IST

अध्यात्म आणि योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते. मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते - सात्विक, राजसी व तामसी.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायअध्यात्म आणि योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते. मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते - सात्विक, राजसी व तामसी. सात्विक व्यक्ती नेहमीच पवित्र विचार, वाणी व कर्माने ओतप्रोत असते. त्या व्यक्तीची सर्व कार्ये ही लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित असतात. याउलट तामसी वृत्तीचे व्यक्ती असतात, जे सदैव दुसऱ्यांचे नुकसान करीत असतात व त्यांचे विचार, वचन व कर्म निषिद्ध असतात. या दोहोंच्या मधली जी स्थिती असते त्याला राजसी संबोधले जाते.या तीन प्रकारच्या व्यक्ती आपल्या चारही बाजूला एकप्रकारच्या ऊर्जेचे जाळे तयार करतात. हे ऊर्जामय जाळे कशाप्रकारचे असेल ते आपले विचार-वचन-कर्म यांची त्रिसूत्री ठरवते. सात्विक, राजसी व तामसी प्रवृत्तीचे जितके आधिक्य असेल तेवढे त्या प्रवृत्तीचे जाळे तयार होईल.आधुनिक विज्ञानाने bio-feedback यंत्र बनविलेले आहे. मानवाच्या मनात कशाप्रकारचे विचार सुरू आहेत व मानवाच्या शरीरावर त्याचा काय प्रभाव पडेल, हे या यंत्राच्या माध्यमातून कळण्यास मदत होते. एका तणावग्रस्त व्यक्तीच्या मस्तिष्कामधून जी ऊर्जा निघते, ती एखाद्या आनंदी व्यक्तीच्या मस्तिष्कामधून निघणा-या ऊर्जेपेक्षा पूर्णत: वेगळी असते. भारतीय परंपरेत वलयाचे वर्णन पाहायला मिळते. अनेकदा चित्रात महान संतांच्या मस्तिष्काच्या चारही बाजूला एक दिव्य प्रकाश दिसून येतो. यालाच इंग्रजीमध्ये ं४१ं संबोधले जाते. हे वलय संतांच्या पवित्र ऊर्जेचा संकेत आहे.अनेकदा बºयाच व्यक्तींना एखाद्याला भेटून असा अनुभव येतो की, त्याचे मन व शरीराची ऊर्जा वाढलेली आहे. याउलट अनेक व्यक्तींच्या संपर्कातून नैराश्य व नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या अनुभवाचे प्रमुख कारण म्हणजे - मानवाचे वेगवेगळे सात्विक, राजसी व तामसी कर्म. आपले व्यक्तिमत्त्व जसजसे सात्विक होईल, तसतशी आपल्या व्यक्तिमत्त्वामधून निघणारी ऊर्जा ही सकारात्मक होत जाईल. अध्यात्म व योगशास्त्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाºया अनेक विधींचे वर्णन आलेले आहे. शरीर व मनाच्या शुद्धीचा यात प्रामुख्याने उल्लेख आहे. शरीराची शुद्धी पाण्याने व मनाची शुद्धी सिद्धचाराने होते. वाणीची शुद्धी मधूर व सत्य वचनाने होते. नि:स्वार्थ भाव व लोककल्याणाच्या भावनेने केलेले कर्म आपल्याला कार्मिक शुद्धता प्रदान करतात. अशाप्रकारचे शुद्ध व्यक्तिमत्त्व आपल्याभोवती एक चुंबकीय ऊर्जामय वलय तयार करीत असतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक