शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अहंकारमुक्त मन हे सदविचारांचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:18 IST

याची देही याची डोळा या म्हणण्यानुसार प्रत्येकास आपल्या कर्माचे फळ हे भोगावे लागतील.

मानवाच्या जन्म जणू काही दुःख भोगण्यासाठी झाला आहे असे आपल्याला भासते. आसक्ती हे मूळ दुःखाचे कारण असून राग मोह मत्सर हे त्यात वाढ करतात. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात,

रजतमसत्व आरे ज्याचे अंगी ।याचे गुणे जगी वाया गेला ।।तम् म्हणजे काय नरक केवळ ।रज तो सनक मायाजाल ।। 

मानवाच्या कर्मानुसार पाप-पुण्य संचित होते. याची देही याची डोळा या म्हणण्यानुसार प्रत्येकास आपल्या कर्माचे फळ हे भोगावे लागतील. मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म मानला जातो. ज्यांना हा जन्म लाभला त्यात स्वतःचा उद्धार करण्याची संधी ईश्वराने प्रदान केलेली असते. त्याचा यथोचित उपयोग  करण्याऐवजी माणूस हा सुखाच्या मागे लागलेला आहे.बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे मानवाच्या उद्धारासाठी जेवढ्या संत विभूती होऊन गेल्या त्यात महाराष्ट्रात बहुसंख्य झाले. त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हटले जाते. भक्ती संप्रदायाचे वारे बाराव्या शतकापासून सर्वत्र पसरले आहे.महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे पाहिले जाते. अगदी बालवयात सर्व मनुष्यप्राणी मात्रास देव विद्या व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा  मंत्र त्यांनी दिला. 

'मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले'. या  ज्ञानदेवांच्या आगळ्यावेगळ्या रचनेत त्यांनी मन हे राम रंगी रंगले आहे. असे सांगून वृत्ती प्रवृत्ती नष्ट होऊन निवृत्ती प्राप्त झाल्याचे ते सांगतात. नवविद्या भक्ती व समाधी स्थिती यांचा सुरेख संगम घडवून आणून भक्तिमार्ग आणि योगमार्ग या दोन्ही ईश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.

'अहंभाव लोपणे' हा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील अंतिम टप्पा असून  या अर्थपूर्ण रचनेत भक्ती आणि योगाचे मर्म सहजतेने स्वतःच्या अनुभवाने मांडलेले आहे. चिरंतन मूल्यांचा आणि आचारधर्माची  शिकवण संतांनी मानवांना दिली आहे.  ते म्हणतात आपल्याजवळील अहंकार नष्ट करावा. आणि सर्वांनी समभावाने वागावे. यामुळेच मनुष्य सदगतीस प्राप्त होतो. सर्वाविषयी क्षमा भाव ठेवावा. मनामध्ये एकत्वाचे चिंतन असावे. जेणेकरून अहंभाव लोप पावतो. हीच वाक्यता गर्भित स्वरूपात संत निवृत्तीनाथ मांडताना म्हणतात, समता  वर्तावी अहंता खंडावी, तेनीची पदवी मोक्षमार्ग, अहंकार मुक्त मन हेच सदविचार व सदगतीचे लक्षण असून सदविचारांच्या वाढीचे गमक आहे.

- भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक