शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:33 IST

बारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल.

- सदगुरू श्री वामनराव पैआपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोतबारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल. या दृष्टीकोनातून जो जीवन जगतो त्याच्या जीवनातले दु:ख हरण होते आणि तो माणूस सुखी होेतो.आज आपण एकमेकांवर अवलंबून आहोत.आपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोत ही गोष्ट लोकांच्या ध्यानातच येत नाही.लोकांना आपल्या वाटयाला दु:ख आले की असे वाटते हा देवाचा कोप झाला,मूळ पुरुषाचा रोष झाला,आपण नवस फेडला नाही,दरवर्षी तीर्थयात्रा करतो ती केली नाही,अशा नाना  त-येच्या च्या समजूती लोकांच्या मनात असतात.पण हयाला काहीच अर्थ नाही.काही बुवाबाबा असे सांगतात की आमच्या मठाला दर महिन्याला भेट दिली नाही तर तुमच्यावर संकटे येतील.अशी ते लोकांच्या मनात भिती घालतात.आता हा बुवा रहातो एका टोकाला व लोक रहातात वेगवेगळ्या ठिकाणी.आजकाल प्रवासाचा खर्च इतका वाढलेला आहे की लोकांना तिथे जाणे खरंतर परवडत नाही परंतू संकट येईल हया भितीने ते दूरवरचा प्रवास करतात.हया बुवाबाबाने अशी भिती घातलेली असते की जणू काही या लोकांची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे.जर कोणी तुमची अशी जबाबदारी घेतो असे म्हणत असेल तर ते खोटे आहे.खरंतर या सगळ्याचे भांडवल मनातील भिती आहे.मग तो माणूस गुंड असो पुंड असो त्या सर्वांचे भांडवल भिती आहे.काही डॉक्टर असे असतात की ते लोकांना घाबरवतात.अहो तुम्ही आलात म्हणून बरे झाले नाहीतर तुमचे काही खरे नव्हते. असे म्हटले की लोक घाबरतात आणि तो मागेल ती फी दयायला तयार होतात.मला असे काही बुवाबाबा माहित आहेत की ते सांगतात, “तुझ्या घरात तीन मृत्यू आहेत त्यात तुझा नंबर तिसरा आहे.”असे सांगितल्यावर कोण घाबरणार नाही सांगा बघू.मृत्यू ही संकल्पनाच लोकांना ठाऊक नाही.एका वर्षात तीन मृत्यू आहेत असे म्हटले की माणूस घाबरतोच.भिती घातली की या बुवाबाबांचे काम झाले.मग ते सांगतील तेवढे पैसे माणूस त्यांना देतो.कधीकधी घरात दु:ख आहे याचे कारण नवस फेडला नाही असे कुणीतरी पुजारी सांगतो व लोकांच्या मनात भिती घालतो.आता मला सांगा नवसाचा व तुमच्या दु:खाचा काही संबंध आहे का? तुम्ही नवस कुणाला केला देवाला.देव तुम्ही नवस फेडला की नाही हे पहात टपून बसला आहे का.अहो देवाचे साम्राज्य किती मोठे आहे.त्याला आपण अनंतकोटी ब्रम्हांड नायक म्हणतो.परमेश्वर हा अनंतकोटी ब्रम्हांड नायक आहे.त्या अनंत कोटी ब्रम्हांडांत माणूस हया प्राण्याला काही स्थान आहे का? जिथे पृथ्वीचे स्थान सुध्दा एका टिंबाइतके आहे तिथे माणसाला किती स्थान असेल.एक ब्रम्हांड,दोन ब्रम्हांड,एक सूर्य,दोन सूर्य नव्हे तर अनेक सूर्य आहेत असे आपले शास्त्रज्ञ सांगतात.