शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:33 IST

बारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल.

- सदगुरू श्री वामनराव पैआपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोतबारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल. या दृष्टीकोनातून जो जीवन जगतो त्याच्या जीवनातले दु:ख हरण होते आणि तो माणूस सुखी होेतो.आज आपण एकमेकांवर अवलंबून आहोत.आपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोत ही गोष्ट लोकांच्या ध्यानातच येत नाही.लोकांना आपल्या वाटयाला दु:ख आले की असे वाटते हा देवाचा कोप झाला,मूळ पुरुषाचा रोष झाला,आपण नवस फेडला नाही,दरवर्षी तीर्थयात्रा करतो ती केली नाही,अशा नाना  त-येच्या च्या समजूती लोकांच्या मनात असतात.पण हयाला काहीच अर्थ नाही.काही बुवाबाबा असे सांगतात की आमच्या मठाला दर महिन्याला भेट दिली नाही तर तुमच्यावर संकटे येतील.अशी ते लोकांच्या मनात भिती घालतात.आता हा बुवा रहातो एका टोकाला व लोक रहातात वेगवेगळ्या ठिकाणी.आजकाल प्रवासाचा खर्च इतका वाढलेला आहे की लोकांना तिथे जाणे खरंतर परवडत नाही परंतू संकट येईल हया भितीने ते दूरवरचा प्रवास करतात.हया बुवाबाबाने अशी भिती घातलेली असते की जणू काही या लोकांची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे.जर कोणी तुमची अशी जबाबदारी घेतो असे म्हणत असेल तर ते खोटे आहे.खरंतर या सगळ्याचे भांडवल मनातील भिती आहे.मग तो माणूस गुंड असो पुंड असो त्या सर्वांचे भांडवल भिती आहे.काही डॉक्टर असे असतात की ते लोकांना घाबरवतात.अहो तुम्ही आलात म्हणून बरे झाले नाहीतर तुमचे काही खरे नव्हते. असे म्हटले की लोक घाबरतात आणि तो मागेल ती फी दयायला तयार होतात.मला असे काही बुवाबाबा माहित आहेत की ते सांगतात, “तुझ्या घरात तीन मृत्यू आहेत त्यात तुझा नंबर तिसरा आहे.”असे सांगितल्यावर कोण घाबरणार नाही सांगा बघू.मृत्यू ही संकल्पनाच लोकांना ठाऊक नाही.एका वर्षात तीन मृत्यू आहेत असे म्हटले की माणूस घाबरतोच.भिती घातली की या बुवाबाबांचे काम झाले.मग ते सांगतील तेवढे पैसे माणूस त्यांना देतो.कधीकधी घरात दु:ख आहे याचे कारण नवस फेडला नाही असे कुणीतरी पुजारी सांगतो व लोकांच्या मनात भिती घालतो.आता मला सांगा नवसाचा व तुमच्या दु:खाचा काही संबंध आहे का? तुम्ही नवस कुणाला केला देवाला.देव तुम्ही नवस फेडला की नाही हे पहात टपून बसला आहे का.अहो देवाचे साम्राज्य किती मोठे आहे.त्याला आपण अनंतकोटी ब्रम्हांड नायक म्हणतो.परमेश्वर हा अनंतकोटी ब्रम्हांड नायक आहे.त्या अनंत कोटी ब्रम्हांडांत माणूस हया प्राण्याला काही स्थान आहे का? जिथे पृथ्वीचे स्थान सुध्दा एका टिंबाइतके आहे तिथे माणसाला किती स्थान असेल.एक ब्रम्हांड,दोन ब्रम्हांड,एक सूर्य,दोन सूर्य नव्हे तर अनेक सूर्य आहेत असे आपले शास्त्रज्ञ सांगतात.