शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:33 IST

बारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल.

- सदगुरू श्री वामनराव पैआपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोतबारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल. या दृष्टीकोनातून जो जीवन जगतो त्याच्या जीवनातले दु:ख हरण होते आणि तो माणूस सुखी होेतो.आज आपण एकमेकांवर अवलंबून आहोत.आपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोत ही गोष्ट लोकांच्या ध्यानातच येत नाही.लोकांना आपल्या वाटयाला दु:ख आले की असे वाटते हा देवाचा कोप झाला,मूळ पुरुषाचा रोष झाला,आपण नवस फेडला नाही,दरवर्षी तीर्थयात्रा करतो ती केली नाही,अशा नाना  त-येच्या च्या समजूती लोकांच्या मनात असतात.पण हयाला काहीच अर्थ नाही.काही बुवाबाबा असे सांगतात की आमच्या मठाला दर महिन्याला भेट दिली नाही तर तुमच्यावर संकटे येतील.अशी ते लोकांच्या मनात भिती घालतात.आता हा बुवा रहातो एका टोकाला व लोक रहातात वेगवेगळ्या ठिकाणी.आजकाल प्रवासाचा खर्च इतका वाढलेला आहे की लोकांना तिथे जाणे खरंतर परवडत नाही परंतू संकट येईल हया भितीने ते दूरवरचा प्रवास करतात.हया बुवाबाबाने अशी भिती घातलेली असते की जणू काही या लोकांची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे.जर कोणी तुमची अशी जबाबदारी घेतो असे म्हणत असेल तर ते खोटे आहे.खरंतर या सगळ्याचे भांडवल मनातील भिती आहे.मग तो माणूस गुंड असो पुंड असो त्या सर्वांचे भांडवल भिती आहे.काही डॉक्टर असे असतात की ते लोकांना घाबरवतात.अहो तुम्ही आलात म्हणून बरे झाले नाहीतर तुमचे काही खरे नव्हते. असे म्हटले की लोक घाबरतात आणि तो मागेल ती फी दयायला तयार होतात.मला असे काही बुवाबाबा माहित आहेत की ते सांगतात, “तुझ्या घरात तीन मृत्यू आहेत त्यात तुझा नंबर तिसरा आहे.”असे सांगितल्यावर कोण घाबरणार नाही सांगा बघू.मृत्यू ही संकल्पनाच लोकांना ठाऊक नाही.एका वर्षात तीन मृत्यू आहेत असे म्हटले की माणूस घाबरतोच.भिती घातली की या बुवाबाबांचे काम झाले.मग ते सांगतील तेवढे पैसे माणूस त्यांना देतो.कधीकधी घरात दु:ख आहे याचे कारण नवस फेडला नाही असे कुणीतरी पुजारी सांगतो व लोकांच्या मनात भिती घालतो.आता मला सांगा नवसाचा व तुमच्या दु:खाचा काही संबंध आहे का? तुम्ही नवस कुणाला केला देवाला.देव तुम्ही नवस फेडला की नाही हे पहात टपून बसला आहे का.अहो देवाचे साम्राज्य किती मोठे आहे.त्याला आपण अनंतकोटी ब्रम्हांड नायक म्हणतो.परमेश्वर हा अनंतकोटी ब्रम्हांड नायक आहे.त्या अनंत कोटी ब्रम्हांडांत माणूस हया प्राण्याला काही स्थान आहे का? जिथे पृथ्वीचे स्थान सुध्दा एका टिंबाइतके आहे तिथे माणसाला किती स्थान असेल.एक ब्रम्हांड,दोन ब्रम्हांड,एक सूर्य,दोन सूर्य नव्हे तर अनेक सूर्य आहेत असे आपले शास्त्रज्ञ सांगतात.