शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 5

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:32 IST

माणसाला सुख हवे असते पण ते त्याला मिळत नाही त्याला  दु:ख नको असते पण तरी  देखील दु:ख त्याच्यापाठी हात धुऊन लागते.इथे मनात प्रश्न निर्माण होतो.

- सदगुरू श्री वामनराव पैपर्यावरणात सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत.माणसाला सुख हवे असते पण ते त्याला मिळत नाही त्याला  दु:ख नको असते पण तरी  देखील दु:ख त्याच्यापाठी हात धुऊन लागते.इथे मनात प्रश्न निर्माण होतो. लक्षात ठेवा जीवनविद्या नेहमी का हा प्रश्न विचारा असे सांगते. कारण प्रश्न विचारला की त्यातून तुमच्या चिंतनाला सुरवात होते.तुम्ही वाचन करू लागता श्रवण करू लागता त्यातून तुमचा अभ्यास व्हायला लागतो त्यात जर तुम्हांला ख-या सदगुरुंचे मार्गदर्शन मिळाले की तुम्हांला त्या प्रश्नांचे उत्तर मिळू लागते.म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की प्रश्न विचारा.सायंटिस्ट काय करतात? ते स्वत:ला प्रश्न विचारतात व त्यांच्या संशोधनाला सुरवात  करतात.फळ खाली का पडले वर का गेले नाही हा प्रश्न पडला व त्यावर  संशोधन झाले.असे का? या प्रश्नाने जीवनात क्रांती घडते म्हणून जीवनविद्येला का? हा प्रश्न फार आवडतो.प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारला की तुम्हाला ब-याच गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.अर्थात त्याला वाचन-श्रवणाची जोड ही हवीच नाहीतर तुम्ही उगीच का-का? करत बसलात तर कावळे व्हाल दुसरे काही होणार नाही.सांगायचा मुद्दा असा की माणूस जन्माला आल्यापासून दु:खी होतो त्याचे कारण काय?याचा जर आपण विचार केला तर माणसावर जन्मोजन्मी जे संस्कार होतात ते संस्कार जर विशिष्ट पध्दतीने झाले तर मानवी जीवनात सुखी होतो.आता इथे मी केवळ माणूस म्हणून विचार करतो.तो कुठल्या जातीचा,पंथाचा,धर्माचा असा विचार करत नाही.कारण संतांनी सर्व भूतमात्राचा विचार केलेला आहे आणि भूतमात्रांमध्ये आणि माणसाचा देखील संबंध येतो.आपण पर्यावरण असे म्हणतो.पर्यावरणामध्ये पशु-पक्षी जलचर माणसे हया सर्वांचा समावेश होतो.पर्यावरणात सर्व एकमेकांवर अवलंबून असतात.जशी एक वीट घसरली तर दुसरी वीट घसरते तिसरी वीट घसरते व शेवटी संपूर्ण इमारतच कोसळते.तसेच पर्यावरणाचे आहे.एक घटक घसरला की दुसरा घटक घसरतो व सगळे पर्यावरण बिघडू लागते.पृथ्वीचा किंवा पाण्याचा लय झाला तर बाकी सगळ्यांचा लय होणार,प्रकाशाचा लय झाला तर जगात काहीच उरणार नाही.हवेचा लय झाला तर कुणीच शिल्लक रहाणार नाही.आपले शरीर तरी काय आहे? आपल्या शरीरांत पंचकर्मेंद्रिये आहेत,पंच ज्ञानेंद्रिये आहेत,पंच तन्मात्रा आहेत.मन चित्त बुध्दी अहंकार हे सर्व मिळून आपण आहोत.त्यात कल्पना भावना धारणा हया सर्व शक्ती मिळून आपण आहोत.यातले काहीही एक वजा केले तरी जीवनाला अर्थ उरत नाही.तुमची स्मरणशक्ती वजा केली तर तुमच्या जीवनाला काही अर्थ उरणार नाही. तुमच्या ठिकाणची जाणीव वजा केली तर जीवनाला काही अर्थ उरणार नाही.तुमच्या शरीरातला प्राण काढून घेतला तर जीवनच शिल्लक रहाणार नाही.