शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण - भाग ३

By admin | Updated: August 12, 2016 14:56 IST

घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत हे आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू जावी व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते

- सदगुरू श्री वामनराव पै
 
दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.
 
घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत हे आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू जावी व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडकरयांनी विनोदाने लिहिले ते आज वस्तुस्थिती झालेली आहे. नाटक सिनेमामध्ये दारूला प्रतिष्ठा दिलेली आहे. टीव्हीवर  मी एक सीन पाहिला त्यांत दारू पिताना एका पेगने काय होते आहे असे तो म्हणतो व त्याला इतर दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे. ज्यांना खायला अन्न मिळत नाही, रहायला घर नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ही मंडळी खरेच दु:खी असे मी म्हणेन. हयांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय. हे दारिद्रय का आले हयालाही अनेक कारणे आहेत. दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात. अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकारही जबबाबदार आहे. ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची? चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे. नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होता नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे. एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.
सांगायचा मुद्दा आपल्या देशात हे होत नाही. आपल्याकडे हे बोलण्याचे धाडसही कुणात नाही. कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही. तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत| ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत| तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन, शिक्षण, संवर्धन हया सर्व गोष्टींची जबाबदारी तुमचीच आहे. हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही त्यांना जन्म दया. हे करता येत नसेल आणि जर तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील व तसे जर त्यांनी विचारले तर त्यांना दोष कुणी दयायचा. मुलांना जर जन्म दयायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म दया अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.
क्रमश: