शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण - भाग ३

By admin | Updated: August 12, 2016 14:56 IST

घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत हे आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू जावी व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते

- सदगुरू श्री वामनराव पै
 
दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.
 
घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत हे आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू जावी व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडकरयांनी विनोदाने लिहिले ते आज वस्तुस्थिती झालेली आहे. नाटक सिनेमामध्ये दारूला प्रतिष्ठा दिलेली आहे. टीव्हीवर  मी एक सीन पाहिला त्यांत दारू पिताना एका पेगने काय होते आहे असे तो म्हणतो व त्याला इतर दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे. ज्यांना खायला अन्न मिळत नाही, रहायला घर नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ही मंडळी खरेच दु:खी असे मी म्हणेन. हयांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय. हे दारिद्रय का आले हयालाही अनेक कारणे आहेत. दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात. अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकारही जबबाबदार आहे. ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची? चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे. नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होता नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे. एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.
सांगायचा मुद्दा आपल्या देशात हे होत नाही. आपल्याकडे हे बोलण्याचे धाडसही कुणात नाही. कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही. तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत| ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत| तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन, शिक्षण, संवर्धन हया सर्व गोष्टींची जबाबदारी तुमचीच आहे. हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही त्यांना जन्म दया. हे करता येत नसेल आणि जर तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील व तसे जर त्यांनी विचारले तर त्यांना दोष कुणी दयायचा. मुलांना जर जन्म दयायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म दया अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.
क्रमश: