शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण - भाग ३

By admin | Updated: August 12, 2016 14:56 IST

घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत हे आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू जावी व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते

- सदगुरू श्री वामनराव पै
 
दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.
 
घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत हे आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू जावी व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडकरयांनी विनोदाने लिहिले ते आज वस्तुस्थिती झालेली आहे. नाटक सिनेमामध्ये दारूला प्रतिष्ठा दिलेली आहे. टीव्हीवर  मी एक सीन पाहिला त्यांत दारू पिताना एका पेगने काय होते आहे असे तो म्हणतो व त्याला इतर दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे. ज्यांना खायला अन्न मिळत नाही, रहायला घर नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ही मंडळी खरेच दु:खी असे मी म्हणेन. हयांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय. हे दारिद्रय का आले हयालाही अनेक कारणे आहेत. दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात. अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकारही जबबाबदार आहे. ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची? चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे. नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होता नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे. एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.
सांगायचा मुद्दा आपल्या देशात हे होत नाही. आपल्याकडे हे बोलण्याचे धाडसही कुणात नाही. कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही. तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत| ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत| तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन, शिक्षण, संवर्धन हया सर्व गोष्टींची जबाबदारी तुमचीच आहे. हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही त्यांना जन्म दया. हे करता येत नसेल आणि जर तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील व तसे जर त्यांनी विचारले तर त्यांना दोष कुणी दयायचा. मुलांना जर जन्म दयायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म दया अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.
क्रमश: