शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

मन:शांतीचा सुलभ मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:07 IST

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।

अशोकानंद महाराज कर्डिलेमन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारणमोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ।।२।।मन गुरू आणि शिष्य । करी आपुलाचे दास्य ।प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।३।।साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।४।।परमार्थ असो अथवा प्रपंच असो या दोन्ही ठिकाणी एक समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ‘मन’. मन जर अशांत असेल तर मनुष्य समाधानी राहू शकत नाही. पंचदशीमध्ये म्हटले आहे की, ‘मन एवं मनुष्याणाम् बंधमोक्षयो :।। बंध आणि मोक्ष या दोन्हीसाठी फक्त मनच कारण आहे. दुसरे काहीही नाही.बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय। उभ्या पिकातलं ढोर।। किती हाकला हाकला। फिरी येतं पिकांवर।। मन मोठे चंचल आहे. म्हणून या मनालाच वळवावयाचे आहे. हल्ली आपल्या आसपास कोठेही बघितले तर माणसे ताण-तणावाखाली जगतांना दिसतात. त्यांना मानसिक शांती नाही. म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचे दवाखाने जास्त दिसू लागले आहेत. कुटुंबात तणाव वाढलेले दिसतात. सर्वत्र तणावाखाली लोक दिसतात, याचे कारण म्हणजे मनाचा कमकुवतपणा ! या मनाला स्थिर करता आले तरच प्रतिकूल स्थितीतही तणाव वाढणार नाही. माणसाचे जीवन सुखमय होईल, यासाठीच जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज फार सुंदर उपाय सांगतात. तो म्हणजे, मनाला प्रसन्न करा. मन जर प्रसन्न असेल तर सर्व काही सध्या करता येईल. याचा अर्थ मनाप्रमाणेच वागायचे असे नाही, तर मनाला योग्य दिशा द्यायची. मनाचा स्वभाव असा आहे की,ते ज्या गोष्टीला पाहिलं तिथे ते सोकते. तिकडे ओढ घेते, या करिता काय करावे. मनाला अध्यात्म मार्गाकडे न्यावे. त्याला ध्यान, चिंतनाची थोडी सवय लावावी. मन:शांती मिळण्याचा अध्यात्म हा एक चांगला मार्ग आहे.सुख, समाधान मनाच्या प्रसन्नतेमुळेच मिळते. मनानेच प्रतिमा स्थापित केली व मनानेच पूजा कल्पिली. मनोमय पूजा हेचि पढिये केशिराजा ।।तु. म. ।। मानसिक पूजा भगवंताला आवडते. बहिरंग केलेली पूजा सुद्धा देवाला आवडत नसते. म्हणून हे मनच माउली आहे. मनाला माउली म्हणणारे तुकाराम महाराज एक वेगळे संत आहेत. गुरु आणि शिष्य सुद्धा आपले मनच आहे. कारण सर्व क्रियेचे साक्षी मनच असते. जर मन प्रसन्न असेल तरच आपली प्रगती होते आणि अप्रसन्न मन अधोगतीला कारण ठरते. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, साधक, विद्वान, वक्ते, पंडित, कोणीही असा पण, एक लक्षात घ्या,या मनासारखे दुसरे दैवत नाही. संत तुकाराम महाराजांनी मनाचे थोडक्यात आणि यथार्थ विवेचन व निदान केले आहे. हाच एक मन:शांतीचा सुलभ मार्ग आहे.

( लेखक भागवताचार्य असून अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील चिचोंडी पाटील येथे  गुरुकुल भगवंताश्रम ते चालवितात.)

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर