शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मन:शांतीचा सुलभ मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:07 IST

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।

अशोकानंद महाराज कर्डिलेमन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारणमोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ।।२।।मन गुरू आणि शिष्य । करी आपुलाचे दास्य ।प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।३।।साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।४।।परमार्थ असो अथवा प्रपंच असो या दोन्ही ठिकाणी एक समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ‘मन’. मन जर अशांत असेल तर मनुष्य समाधानी राहू शकत नाही. पंचदशीमध्ये म्हटले आहे की, ‘मन एवं मनुष्याणाम् बंधमोक्षयो :।। बंध आणि मोक्ष या दोन्हीसाठी फक्त मनच कारण आहे. दुसरे काहीही नाही.बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय। उभ्या पिकातलं ढोर।। किती हाकला हाकला। फिरी येतं पिकांवर।। मन मोठे चंचल आहे. म्हणून या मनालाच वळवावयाचे आहे. हल्ली आपल्या आसपास कोठेही बघितले तर माणसे ताण-तणावाखाली जगतांना दिसतात. त्यांना मानसिक शांती नाही. म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचे दवाखाने जास्त दिसू लागले आहेत. कुटुंबात तणाव वाढलेले दिसतात. सर्वत्र तणावाखाली लोक दिसतात, याचे कारण म्हणजे मनाचा कमकुवतपणा ! या मनाला स्थिर करता आले तरच प्रतिकूल स्थितीतही तणाव वाढणार नाही. माणसाचे जीवन सुखमय होईल, यासाठीच जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज फार सुंदर उपाय सांगतात. तो म्हणजे, मनाला प्रसन्न करा. मन जर प्रसन्न असेल तर सर्व काही सध्या करता येईल. याचा अर्थ मनाप्रमाणेच वागायचे असे नाही, तर मनाला योग्य दिशा द्यायची. मनाचा स्वभाव असा आहे की,ते ज्या गोष्टीला पाहिलं तिथे ते सोकते. तिकडे ओढ घेते, या करिता काय करावे. मनाला अध्यात्म मार्गाकडे न्यावे. त्याला ध्यान, चिंतनाची थोडी सवय लावावी. मन:शांती मिळण्याचा अध्यात्म हा एक चांगला मार्ग आहे.सुख, समाधान मनाच्या प्रसन्नतेमुळेच मिळते. मनानेच प्रतिमा स्थापित केली व मनानेच पूजा कल्पिली. मनोमय पूजा हेचि पढिये केशिराजा ।।तु. म. ।। मानसिक पूजा भगवंताला आवडते. बहिरंग केलेली पूजा सुद्धा देवाला आवडत नसते. म्हणून हे मनच माउली आहे. मनाला माउली म्हणणारे तुकाराम महाराज एक वेगळे संत आहेत. गुरु आणि शिष्य सुद्धा आपले मनच आहे. कारण सर्व क्रियेचे साक्षी मनच असते. जर मन प्रसन्न असेल तरच आपली प्रगती होते आणि अप्रसन्न मन अधोगतीला कारण ठरते. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, साधक, विद्वान, वक्ते, पंडित, कोणीही असा पण, एक लक्षात घ्या,या मनासारखे दुसरे दैवत नाही. संत तुकाराम महाराजांनी मनाचे थोडक्यात आणि यथार्थ विवेचन व निदान केले आहे. हाच एक मन:शांतीचा सुलभ मार्ग आहे.

( लेखक भागवताचार्य असून अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील चिचोंडी पाटील येथे  गुरुकुल भगवंताश्रम ते चालवितात.)

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर