शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

तुम्ही जसा विचार करता तसेच घडता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:36 IST

‘मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण’ म्हणजेच सकारात्मक विचार ठेवा आणि जीवनात यश संपादन करा, असाच मुलमंत्र संत तुकोबारायांनी ...

‘मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण’ म्हणजेच सकारात्मक विचार ठेवा आणि जीवनात यश संपादन करा, असाच मुलमंत्र संत तुकोबारायांनी संपूर्ण मानव जातीला दिला आहे. थोडक्यात सुरूवातीला आपण आपलीच ओळख करून घ्यावी... आपल्यातील क्षमता ओळखावी. आपल्यातील गुण आणि उणिवांच्या आधारे स्वत:चे मुल्यमापन स्वत:च करावे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेची जोड दिल्यास तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकत नाही.  पंरतू, जीवनातील यश हे मनाच्या प्रसन्नतेवरच अंवलबून असल्याचे संत तुकाराम आवर्जून सांगतात... रतन टाटा यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ‘लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही; पण त्याचा स्वत:चा गंजच त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही; पण त्याच्याच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. नष्ट होण्याऐवजी श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न आपण का बरे करू नये? चला श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ कसं बनायचं याचा विचार आपण करू. मी हे करू शकतो, असा ठाम विश्वास बाळगला व आपल्यात आत्मविश्वासाची शक्ती जागृत केली तर आभाळाएवढी संकटं जरी आली तरी विश्वास बाळगा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. असा सकारात्मक दृष्टिकोन मात्र असावा लागेल. स्वत:ची ओळख झाल्याशिवाय व्यक्तीमत्व घडत नाही. जीवनाला अर्थही उरत नाही. ‘स्व’च्या ओळखीतूनच व्यक्तिमत्त्व घडते. अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे. हे फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे स्वत:ची ओळख होते. आपणास सहज इतरांविषयी विचारले की आपण भरभरून त्याच्या गुण-दोषांची थैली उघडतो; पण स्वत:विषयी काही विचारलं तर मात्र बोलण्यास कचरतो. स्वरूप ओळखा असे संत सांगतात. ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन्  तेच आजही करताहेत. स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे. एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात. दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात. आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते. त्यावेळी आपले मन सापडते.  मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो.  प्रसन्नता ही मनातच असते. तिला आपण बाहेर खेचून आणले पाहिजे. - स्वामी शून्यानंद भालेगाव बाजार, ता. खामगाव.
टॅग्स :spiritualअध्यात्मिकkhamgaonखामगाव