शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 9

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:31 IST

आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो.

- सदगुरू श्री वामनराव पै

देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे

आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो. त्यात ज्योतिषी जे काही सांगतात व ते ही त्यांना पटते.मी नापास होणार आहे असे ज्योतिष्याने सांगितले तर मग मी अभ्यास कशाला करू किंवा ज्योतिषाने सांगितले मी पास होणार तरी मी अभ्यास केला नाही तरी चालेल असे मुलांना वाटते.मुळात मुलांना अभ्यासच करायचा नसतो व त्यामुळे ते ज्योतिषी काय सांगतात असे वागतात. थोडक्यात देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे असे सांगितले तर ते लोकांना पटत नाही.लोक आम्हाला सांगतात वामनराव तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण जरी ते खरे असले तरी मनाला पटत नाही असे का? त्यावर मी नेहमी सांगतो नाहीच पटणार कारण इथे प्रयत्नवाद सांगितलेला आहे. आणि प्रयत्नवाद कुणाला हवा असतो.मनाची प्रवृत्ती ही नेहमी खालच्या दिशेने वहात असते त्यामुळे लोकांना नेहमी दैववाद पटतो, प्रयत्नवाद पटत नाही.मानवी जीवनांत दु:ख का? खंरतर याचे एकमेव कारण लोक दैववादी आहेत हे आहे.आयुष्यात ९० टक्के घटना आपल्या हातात असतात तर १० टक्के घटना या पराधीन असतात.पण लोकांचा असा समज असतो की सर्व काही दैवाधीन आहे,सर्व काही पराधीन आहे. आणि असे मोठमोठया लोकांनी सांगितल्यामुळे लोकांना तेच खरे वाटत असते.पण ते त्यांनी वेगवेगळ्या अर्थाने किंवा कोणत्या संदर्भात सांगितले आहे याचा कोणीच विचार करीत नाही.आयुष्यातील ९०  टक्के घटना आपल्या हातात आहेत म्हणूनच आम्ही सांगतो “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” माणूस दु:खी होण्याची अनेक कारणे आहेत.पण याचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान.अज्ञान हेच सर्वांच्या दु:खाचे मूळ आहे.जगातील सर्व समस्यांचे, दु:खाचे मूळ हे अज्ञान आहे.हे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणे कठीण आहे.जीवनात बघा ज्या ज्या ठिकाणी ज्ञान असते त्या ठिकाणी सुख असते व ज्या ज्या ठिकाणी अज्ञान असते त्या ठिकाणी दु:ख असते.जीवनांत अज्ञान हे वेगवेगळया प्रकारचे असते.परमार्थात, प्रपंचात, धंद्यात अज्ञान असेल तर माणसाच्या वाटयाला दु:ख येते.कारण त्या गोष्टींबद्दल ज्ञान करून घेतले की सुख मिळते.संसार दु:खाचा होतो कारण अज्ञान.संसारात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात.बायका स्वयंपाक करतात जर त्यांना स्वयंपाकाबद्दल ज्ञान नसेल तर त्यांना तो करता येणार नाही.कारण त्यासाठी स्वयंपाकाचे ज्ञान हे फार महत्वाचे आहे.जीवनविद्येने संसारात चूल व मूल या दोन्ही गोष्टींना फार महत्वाचे स्थान दिलेले आहे.इतरांनी चूल व मूल या गोष्टींना गौण स्थान दिलेले आहे.आज जगात ज्या समस्या आहेत त्याचे मूळ कारण म्हणजे चूल व मूल या गोष्टींना दिलेले गौण स्थान हे होय.