शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 9

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:31 IST

आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो.

- सदगुरू श्री वामनराव पै

देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे

आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो. त्यात ज्योतिषी जे काही सांगतात व ते ही त्यांना पटते.मी नापास होणार आहे असे ज्योतिष्याने सांगितले तर मग मी अभ्यास कशाला करू किंवा ज्योतिषाने सांगितले मी पास होणार तरी मी अभ्यास केला नाही तरी चालेल असे मुलांना वाटते.मुळात मुलांना अभ्यासच करायचा नसतो व त्यामुळे ते ज्योतिषी काय सांगतात असे वागतात. थोडक्यात देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे असे सांगितले तर ते लोकांना पटत नाही.लोक आम्हाला सांगतात वामनराव तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण जरी ते खरे असले तरी मनाला पटत नाही असे का? त्यावर मी नेहमी सांगतो नाहीच पटणार कारण इथे प्रयत्नवाद सांगितलेला आहे. आणि प्रयत्नवाद कुणाला हवा असतो.मनाची प्रवृत्ती ही नेहमी खालच्या दिशेने वहात असते त्यामुळे लोकांना नेहमी दैववाद पटतो, प्रयत्नवाद पटत नाही.मानवी जीवनांत दु:ख का? खंरतर याचे एकमेव कारण लोक दैववादी आहेत हे आहे.आयुष्यात ९० टक्के घटना आपल्या हातात असतात तर १० टक्के घटना या पराधीन असतात.पण लोकांचा असा समज असतो की सर्व काही दैवाधीन आहे,सर्व काही पराधीन आहे. आणि असे मोठमोठया लोकांनी सांगितल्यामुळे लोकांना तेच खरे वाटत असते.पण ते त्यांनी वेगवेगळ्या अर्थाने किंवा कोणत्या संदर्भात सांगितले आहे याचा कोणीच विचार करीत नाही.आयुष्यातील ९०  टक्के घटना आपल्या हातात आहेत म्हणूनच आम्ही सांगतो “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” माणूस दु:खी होण्याची अनेक कारणे आहेत.पण याचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान.अज्ञान हेच सर्वांच्या दु:खाचे मूळ आहे.जगातील सर्व समस्यांचे, दु:खाचे मूळ हे अज्ञान आहे.हे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणे कठीण आहे.जीवनात बघा ज्या ज्या ठिकाणी ज्ञान असते त्या ठिकाणी सुख असते व ज्या ज्या ठिकाणी अज्ञान असते त्या ठिकाणी दु:ख असते.जीवनांत अज्ञान हे वेगवेगळया प्रकारचे असते.परमार्थात, प्रपंचात, धंद्यात अज्ञान असेल तर माणसाच्या वाटयाला दु:ख येते.कारण त्या गोष्टींबद्दल ज्ञान करून घेतले की सुख मिळते.संसार दु:खाचा होतो कारण अज्ञान.संसारात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात.बायका स्वयंपाक करतात जर त्यांना स्वयंपाकाबद्दल ज्ञान नसेल तर त्यांना तो करता येणार नाही.कारण त्यासाठी स्वयंपाकाचे ज्ञान हे फार महत्वाचे आहे.जीवनविद्येने संसारात चूल व मूल या दोन्ही गोष्टींना फार महत्वाचे स्थान दिलेले आहे.इतरांनी चूल व मूल या गोष्टींना गौण स्थान दिलेले आहे.आज जगात ज्या समस्या आहेत त्याचे मूळ कारण म्हणजे चूल व मूल या गोष्टींना दिलेले गौण स्थान हे होय.