शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:32 IST

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही.

- सदगुरू श्री वामनराव पैजीवनविद्या आत्मसात करतात ते सुखी होताततुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही. कोणीही दुस-यांची निंदा करणार नाही.अशी दृष्टी असेल तर दुस-यांची चेष्टाकुचेष्टा कोणीही करणार नाही.असा दृष्टीकोन देणारे किती लोक समजामध्ये आहेत. असा दॄष्टीकोन घेणारे लोक समजात किती आहेत.समजा असा दृष्टीकोन देणारा एखाद -दुसरा जर असेल तरी तो घेणारे किती जण आहेत.आज जीवनविद्या मिशनमध्ये आपण लोकांना अचूक मार्गदर्शन करत आहोत.हे अचूक मार्गदर्शन तुम्हांला इतरत्र  कोठेही मिळणार नाही.शिवाय हे मार्गदर्शन जीवनविद्या मिशन वारंवार देत आहे.यातील वारंवार हा शब्द अंडरलाइन करायचा.इतके असूनसुध्दा  सदगुरु सांगतात त्याप्रमाणे सर्व लोक करतात का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.कारण एकाने मला प्रश्न विचारला की, “महाराज जीवनविद्येत आलेले सर्व लोक सुखी होतात का? मी त्याला म्हटले नाही.जे लोक जीवनविद्या आत्मसात करतात ते लोक सुखी होतात.सदगुरुंनी सांगितल्याप्रमाणे जे लोक आचरण करतात ते लोक सुखी होतात.पण हे तत्वज्ञान या कानाने ऐकतात व दुस-या कानाने सोडतात त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे.मला वाटते अशा लोकांबद्दल न बोललेच बरे.आम्ही सतत कर्मकांडावर अचूक असे मार्गदर्शन केलेले आहे तरी आमच्या मिशन मध्ये असलेले काही लोक देखील अजुनही कर्मकांडे करतात.असे लोक भितीपोटी हे सर्व करतात.पण सांगायला आनंद वाटतो की काही लोक आमच्या मार्गदर्शनानूसार सुधारले आहेत.त्यांनी निष्फळ कर्मकांडे करणे बंद केले आहे.एक काळ असा होता की आमचे नामधारक चार-पाच तास देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे रहायचे.कडेवर मूल असायचे पाऊस पडत असायचा तरी देखील ते अशा परिस्थितीत तासनतास रांगेत उभे असत.अशा परिस्थितीत जर मूल आजारी पडले, किंवा ती व्यक्ती आजारी पडली, त्याची बायको आजारी पडली तर डॉक्टरकडे जावे लागणार,पैसे खर्च होणार,त्याला दारिद्र येणार.आता या सर्व गोष्टींना जबाबदार कोण,याला जबाबदार केवळ ती व्यक्तीच असू शकते.शेवटी किती वेळ उभे रहाणार,शरीर थकणारच,गुडघ्यावर अति वजन आले की  ते त्रास देऊ लागतात.हे मी इथे का सांगतो आहे.माणसे विचार करत नाहीत, चिंतन करत नाही,एखाद्या गोष्टीच्या मुळाकडे जात नाहीत.आपल्या जीवनांत दु:ख का येत.खरंतर आपल्या दु:खाला कारणीभूत आपण आहोत की इतर कोणीतरी कारणीभूत आहेत.तुम्ही म्हणाल आपल्या दु:खाला इतर कुणीतरी कारणीभूत असू शकते का? तर हो दुसरे देखील कारणीभूत असू शकतात.काही लोक दुष्ट असतात.तुकाराम महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे आयुष्यभर त्रास भोगावा लागला.ज्ञानेश्वर महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे जन्मापासून त्रास भोगावा लागला.आता हा प्रकार वेगळा व आपल्या स्वत:च्या चुकीमुळे होणारा त्रास वेगळा.कधी कधीनैसर्गिक आपत्ती येते, धरणीकंप होतो, पूर येतो, पूरात घरे वाहून जातात तेव्हा अशा अस्मानी संकंटाना आपण काय करणार.पण दैववाद सांगितला की तो लोकांना लगेच पटतो पण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगितले तर हे कसे काय म्हणून लोक आम्हाला  विचारतात.