शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:32 IST

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही.

- सदगुरू श्री वामनराव पैजीवनविद्या आत्मसात करतात ते सुखी होताततुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही. कोणीही दुस-यांची निंदा करणार नाही.अशी दृष्टी असेल तर दुस-यांची चेष्टाकुचेष्टा कोणीही करणार नाही.असा दृष्टीकोन देणारे किती लोक समजामध्ये आहेत. असा दॄष्टीकोन घेणारे लोक समजात किती आहेत.समजा असा दृष्टीकोन देणारा एखाद -दुसरा जर असेल तरी तो घेणारे किती जण आहेत.आज जीवनविद्या मिशनमध्ये आपण लोकांना अचूक मार्गदर्शन करत आहोत.हे अचूक मार्गदर्शन तुम्हांला इतरत्र  कोठेही मिळणार नाही.शिवाय हे मार्गदर्शन जीवनविद्या मिशन वारंवार देत आहे.यातील वारंवार हा शब्द अंडरलाइन करायचा.इतके असूनसुध्दा  सदगुरु सांगतात त्याप्रमाणे सर्व लोक करतात का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.कारण एकाने मला प्रश्न विचारला की, “महाराज जीवनविद्येत आलेले सर्व लोक सुखी होतात का? मी त्याला म्हटले नाही.जे लोक जीवनविद्या आत्मसात करतात ते लोक सुखी होतात.सदगुरुंनी सांगितल्याप्रमाणे जे लोक आचरण करतात ते लोक सुखी होतात.पण हे तत्वज्ञान या कानाने ऐकतात व दुस-या कानाने सोडतात त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे.मला वाटते अशा लोकांबद्दल न बोललेच बरे.आम्ही सतत कर्मकांडावर अचूक असे मार्गदर्शन केलेले आहे तरी आमच्या मिशन मध्ये असलेले काही लोक देखील अजुनही कर्मकांडे करतात.असे लोक भितीपोटी हे सर्व करतात.पण सांगायला आनंद वाटतो की काही लोक आमच्या मार्गदर्शनानूसार सुधारले आहेत.त्यांनी निष्फळ कर्मकांडे करणे बंद केले आहे.एक काळ असा होता की आमचे नामधारक चार-पाच तास देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे रहायचे.कडेवर मूल असायचे पाऊस पडत असायचा तरी देखील ते अशा परिस्थितीत तासनतास रांगेत उभे असत.अशा परिस्थितीत जर मूल आजारी पडले, किंवा ती व्यक्ती आजारी पडली, त्याची बायको आजारी पडली तर डॉक्टरकडे जावे लागणार,पैसे खर्च होणार,त्याला दारिद्र येणार.आता या सर्व गोष्टींना जबाबदार कोण,याला जबाबदार केवळ ती व्यक्तीच असू शकते.शेवटी किती वेळ उभे रहाणार,शरीर थकणारच,गुडघ्यावर अति वजन आले की  ते त्रास देऊ लागतात.हे मी इथे का सांगतो आहे.माणसे विचार करत नाहीत, चिंतन करत नाही,एखाद्या गोष्टीच्या मुळाकडे जात नाहीत.आपल्या जीवनांत दु:ख का येत.खरंतर आपल्या दु:खाला कारणीभूत आपण आहोत की इतर कोणीतरी कारणीभूत आहेत.तुम्ही म्हणाल आपल्या दु:खाला इतर कुणीतरी कारणीभूत असू शकते का? तर हो दुसरे देखील कारणीभूत असू शकतात.काही लोक दुष्ट असतात.तुकाराम महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे आयुष्यभर त्रास भोगावा लागला.ज्ञानेश्वर महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे जन्मापासून त्रास भोगावा लागला.आता हा प्रकार वेगळा व आपल्या स्वत:च्या चुकीमुळे होणारा त्रास वेगळा.कधी कधीनैसर्गिक आपत्ती येते, धरणीकंप होतो, पूर येतो, पूरात घरे वाहून जातात तेव्हा अशा अस्मानी संकंटाना आपण काय करणार.पण दैववाद सांगितला की तो लोकांना लगेच पटतो पण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगितले तर हे कसे काय म्हणून लोक आम्हाला  विचारतात.