शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पाहे पां दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:40 IST

समाजात भिन्न प्रवृत्ती वावरत असतात, याचे मार्मिक वर्णन वरील ओवीत संत ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे.

पाहे पां दूध पवित्र आणि गोड ।पासी त्वचेचिया पदराआड ।परीते अव्हेरून गोचिड ।अशुद्धचि सेवी ।।

समाजात भिन्न प्रवृत्ती वावरत असतात.  संत ज्ञानेश्वर माऊलींनी याचे मार्मिक वर्णन वरील ओवीत केले आहे. सकाळी सकाळी दूधवाला दूध घ्या म्हणून घरोघरी फिरतो. भाजी-फळे रसयुक्त पदार्थ घेऊन रस्त्यावरून फिरावे लागते. तेव्हा कुठे त्यास काही जण स्वीकारतात. परंतु आपण नीरा-मदिरा या वस्तू रस्त्यावरून ओरडून विकताना पाहिल्या आहेत का?

समाजमनात वाईट बाबींचा शिरकाव लवकर होतो व ते अनुकरण केले जाते. तथापि चांगल्या गोष्टी झिडकाराव्या लागतात. माणूस संगतीत राहतो. त्या गोष्टी स्वीकारतो, पण त्याचे मन वाईट व अव्हेरीत बाबींकडे लवकर आकर्षित होते. संत ज्ञानेश्वरांनी वरील ओवीत अत्यंत मार्मिक पद्धतीने तेच समाजास सांगण्याचा व उद्बोधित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात माऊली म्हणतात, दूध हे पवित्र, गोड व पौष्टिक आहे. त्याच गाईच्या कासेजवळ गोचिडदेखील बसलेला असतो. दूध, त्वचा आणि रक्त या सर्व सिद्ध व निषिद्ध दोन्ही गोष्टी अगदी जवळ असतात. परंतु मधूर, अमृत असे दूध सोडून मानवाच्या विकृत प्रवृत्तीप्रमाणे गोचिड हे रक्ताचे सेवन करण्यास धन्यता मानते. मानवी मनाचे असेच काही घडते. त्यास योग्य सहवासाची व मार्गदर्शनाची गरज असते. संत माऊलींनी अशाच प्रकारचे वर्णन दुसऱ्या ओवीतही केले आहे. त्यात ते म्हणतात,

कां कमलकंदा आणि दर्दूरी ।नांदणूक एकेचि घरी ।परि परागु सेविजे भ्रमरी ।येरा चिखलचि उरे ।। 

याचा अर्थ भ्रमर आणि बेडूक यांचे वास्तव कमळाच्या फुलाजवळ असते. परंतु भ्रमर हा गोड असे मधाचे सेवन करतो, तर बेडूक चिखलात रुतून राहतो. यावरून सहवास, वास्तव्य, विचार, परिवर्तन आणि ज्ञान यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजाचे उद्बोधन होणे, चांगल्या-वाईट गोष्टींचा फरक स्पष्ट करणे हाच या स्वैर लिखाणाचा उद्देश आहे.

 - डॉ. भा.ना. संगनवार

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक