शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

Adhyatmik : वेगवेगळे बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 03:22 IST

या कलियुगामध्ये फसवणूक, भ्रष्टाचार... या गोष्टी सर्रास चालतात. अनेकानेक बातम्या कानावर पडतात, तेव्हा मनात विचार येतो की माणसं अशी का वागतात?

या कलियुगामध्ये फसवणूक, भ्रष्टाचार... या गोष्टी सर्रास चालतात. अनेकानेक बातम्या कानावर पडतात, तेव्हा मनात विचार येतो की माणसं अशी का वागतात? एखाद्यावर खूप प्रेम करतात आणि दुसऱ्यांना जखमा देतात हा विरोधाभास एकाच व्यक्तीच्या कर्मांमध्ये का दिसून येतो? पण याचे कारण ही हेच आहे की, प्रत्येक व्यक्तीबरोबरचा व्यवहार, संबंध एकाच प्रकारचा कसा असू शकतो? नाती वेगळी, सगळ्याबरोबरचा अनुभव वेगळा, ऋणानुबंध ही वेगळेच.प्रसिद्ध लेखक एडगर केसी यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की, १८व्या शतकामध्ये एका व्यक्तीच्या पाठीवर व्रण होते, खूप नानाविध उपाय केले गेले, परंतु ते व्रण काही गेले नाहीत आणि भयंकर त्रास ही त्यामुळे सहन करावा लागायचा. एके दिवशी ती व्यक्ती एडगर केसीकडे गेली. ज्यांच्यामध्ये अशी शक्ती होती की, ते समोरच्या व्यक्तीच्या पूर्वजन्मांना बघू शकायचे. जेव्हा एडगर केसी सुप्तावस्थेमध्ये जाऊन त्याच्या पूर्वजन्मांना बघतात, तेव्हा त्यांना दिसून येते की, ही व्यक्ती तीन जन्मापूर्वी एका राजाकडे काम करीत असे. राजा खूप निर्दयी होता. त्याचा नियम होता, त्याला कोणालाही काही संदेश पाठवायचा असेल, तर तो राज्यातल्या एका व्यक्तीला पकडून त्याच्या पाठीवर गरम लोखंडाच्या सळीने तो संदेश लिहायचा आणि पाठवायचा.ही व्यक्ती त्या जन्मामध्ये त्याला काहीच झाले नाही, पण तीन जन्मानंतर त्याच्या स्वत:च्या पाठीवर असे व्रण आले की, त्याला उठता, बसता, झोपतानाही त्याचा अतिशय त्रास व्हायचा. सारांश हा की, कळत-नकळत आपणच आपल्यासाठी असे बांध घातले आहेत, ज्यामुळे जीवनाचा खरा आनंद, सुख आपणास मिळत नाही. वर्तमानामध्ये प्रत्येक कर्मावर आपण लक्ष ठेवले, सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला, तर पूर्वजन्माची सारी देणी फेडून जीवनाचा प्रवाह सरळ आणि सुखद करू शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक