शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वासनेचा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:30 IST

धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

धर्म आणि विज्ञान यांचा तौलनिक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की विज्ञान ही एक विचार पद्धती आहे. निरीक्षण, प्रयोग, प्रचिती आणि सिद्धता या प्रक्रि यांच्या सहाय्याने निसर्ग सत्याचा घेतला जाणारा शोध म्हणजे विज्ञान. धर्माची तीन अंगे आहेत, कर्म, ज्ञान, आणि उपासना. सत्य, प्रेम, त्याग, आणि श्रद्धा हे धर्माचे चार पाय आहेत. पहिले तीन पाय आज दुर्बल झाले आहेत. चौथा पाय श्रद्धेचा तो देखील देवळा पुरताच मर्यादित राहिला आहे. धर्म म्हणजे आचार, धर्म म्हणजे विचार, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे शील, धर्म म्हणजे मर्यादा. जीवनात निंद्य काय आणि वंद्य काय हे धर्म सांगतो. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ ,आणि सर्वाहून परमात्मा श्रेष्ठ हे धर्माचे सार आहे.

विज्ञान आणि धर्म दोन्हीही आपआपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. धर्म हे अंतरंगाचे विज्ञान आहे. विज्ञान हा सृष्टीचा  धर्म आहे. विज्ञान हे सृष्टीचे ज्ञान असते, धर्म हे अंतरंगाचे भान असते. विज्ञान हे प्रयोग शरण आहे. धर्म हा तत्व शरण आहे. विज्ञान हे वैभवाचे प्रदर्शन आहे. धर्म हा जीवनाचे दर्शन आहे. धर्म हे आपले रूप असेल तर विज्ञान त्या वरचे वस्त्र आहे. सुखाने कसे जगावे हे विज्ञान सांगत असले तरी जगावे कशासाठी हे धर्मच सांगतो. धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो. स्वामी रामतीर्थ हे एकदा लाहोरच्या बाजारपेठेतून जात होते. रस्त्याच्या कडेला माडीवर एक लावण्यवती गणिका उभी होती. स्वामी तिच्याकडे एक टक बघतच बसले. बरोबर असणाऱ्या शिष्यांना वाटले, स्वामी तिचे सौंदर्य बघून मोहित झाले. गणिका देखील आश्चर्य चकित झाली. हा संन्यासी माझ्या रुपाने वेडा झाला की काय..? ती म्हणाली, स्वामीजी..         

हुस्न को जो बदनजर देखते है !  वो पहले अपना सर कलम देखते है !  

तिचे शब्द ऐकून रामतीर्थांची समाधी भंग पावली. स्वामी त्या गणिकेला म्हणाले,  मैया...! ना तेरे रुप से गरज, ना तुझसे गरज!हम तो हमारे मुसोहर की कलम देखते है...! तू इतकी सुंदर तर तुला बनवणारा ईश्वर किती सुंदर असेल. हेच मी समाधी अवस्थेत बघितले. दृष्टीचा विकास हेच धर्माचे उद्दीष्ट आहे.वर्तमान काळात भोगवाद प्रचंड बळावत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, भोगवादाच्या तळाशी वासनेचा ज्वालामुखी सतत धुमसत असतो. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होईल व या देशाची सभ्यता व संस्कृती नष्ट होईल. हा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची नितांत गरज आहे.

( लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्र. 9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक