शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वासनेचा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:30 IST

धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

धर्म आणि विज्ञान यांचा तौलनिक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की विज्ञान ही एक विचार पद्धती आहे. निरीक्षण, प्रयोग, प्रचिती आणि सिद्धता या प्रक्रि यांच्या सहाय्याने निसर्ग सत्याचा घेतला जाणारा शोध म्हणजे विज्ञान. धर्माची तीन अंगे आहेत, कर्म, ज्ञान, आणि उपासना. सत्य, प्रेम, त्याग, आणि श्रद्धा हे धर्माचे चार पाय आहेत. पहिले तीन पाय आज दुर्बल झाले आहेत. चौथा पाय श्रद्धेचा तो देखील देवळा पुरताच मर्यादित राहिला आहे. धर्म म्हणजे आचार, धर्म म्हणजे विचार, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे शील, धर्म म्हणजे मर्यादा. जीवनात निंद्य काय आणि वंद्य काय हे धर्म सांगतो. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ ,आणि सर्वाहून परमात्मा श्रेष्ठ हे धर्माचे सार आहे.

विज्ञान आणि धर्म दोन्हीही आपआपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. धर्म हे अंतरंगाचे विज्ञान आहे. विज्ञान हा सृष्टीचा  धर्म आहे. विज्ञान हे सृष्टीचे ज्ञान असते, धर्म हे अंतरंगाचे भान असते. विज्ञान हे प्रयोग शरण आहे. धर्म हा तत्व शरण आहे. विज्ञान हे वैभवाचे प्रदर्शन आहे. धर्म हा जीवनाचे दर्शन आहे. धर्म हे आपले रूप असेल तर विज्ञान त्या वरचे वस्त्र आहे. सुखाने कसे जगावे हे विज्ञान सांगत असले तरी जगावे कशासाठी हे धर्मच सांगतो. धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो. स्वामी रामतीर्थ हे एकदा लाहोरच्या बाजारपेठेतून जात होते. रस्त्याच्या कडेला माडीवर एक लावण्यवती गणिका उभी होती. स्वामी तिच्याकडे एक टक बघतच बसले. बरोबर असणाऱ्या शिष्यांना वाटले, स्वामी तिचे सौंदर्य बघून मोहित झाले. गणिका देखील आश्चर्य चकित झाली. हा संन्यासी माझ्या रुपाने वेडा झाला की काय..? ती म्हणाली, स्वामीजी..         

हुस्न को जो बदनजर देखते है !  वो पहले अपना सर कलम देखते है !  

तिचे शब्द ऐकून रामतीर्थांची समाधी भंग पावली. स्वामी त्या गणिकेला म्हणाले,  मैया...! ना तेरे रुप से गरज, ना तुझसे गरज!हम तो हमारे मुसोहर की कलम देखते है...! तू इतकी सुंदर तर तुला बनवणारा ईश्वर किती सुंदर असेल. हेच मी समाधी अवस्थेत बघितले. दृष्टीचा विकास हेच धर्माचे उद्दीष्ट आहे.वर्तमान काळात भोगवाद प्रचंड बळावत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, भोगवादाच्या तळाशी वासनेचा ज्वालामुखी सतत धुमसत असतो. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होईल व या देशाची सभ्यता व संस्कृती नष्ट होईल. हा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची नितांत गरज आहे.

( लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्र. 9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक