शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

भक्तीतला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:30 IST

कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच. कारण रूपापेक्षा गुणात्मक सुगंध देणे, हेच कस्तुरीचे सामर्थ्य आहे. चंदनाच्या सुगंधावर कधी भाष्य करता येत नाही. वाऱ्याची एक झुळूक आली की, नाकाला आपोआपच संवेदना होते. मोत्याचे पाणी रांजणात भरता येणे शक्य नाही आणि गगनाला कधी गवसणी घालता येत नाही. तद्वतच भक्ती भावनेवर कुठल्याही शास्त्री पंडिताने औपचारिक भाष्य करण्याची गरज नसते. कारण भक्ती हाच भक्ताच्या जीवनाचा सर्वोच्च बिंदू असतो, नव्हे त्याच्या दृष्टीने तोच खरा साक्षात्कार असतो. जो परमात्मा सागरापेक्षा अथांग, आकाशाएवढा व्यापक व जेथे खुज्यांची उंची पोहोचत नाही एवढा उत्तुंग आहे, त्या परमात्म्याला मात्र आपल्या भावभोळ्या भक्तीच्या चिमटीत पकडताना उपेक्षेचे वाळवंट तुडविणारी जनाई म्हणते -

धरिला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर ।हृदय बंदीखाना केला । आत विठ्ठल कोंडिला ।शब्दे केली जडाजुडी । विठ्ठलपायी घातली बेडी ।सोंहम शब्दांचा मारा केला ।विठ्ठल काकुळतीला आला ।जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुला ।

जेव्हा पोटातील वेदना शब्दरूप होऊन ओठावर येतात तेव्हा आपल्या आराध्याविषयी अपार श्रद्धाभाव भक्तांच्या वाणीतून प्रकट होऊ लागतात. म्हणून भक्ती ही भक्ताची मिरासी आहे. ती एक जीवननिष्ठा आहे. मनाचे सामर्थ्य वाढविणारी ती एक अद्भुत शक्ती आहे. तो एक पलायनवाद नव्हे. सर्वसामान्यपणे भक्तीकडे आजही अनेक प्रतिभावंतांकडून पलायनवाद म्हणून पाहिले जाते, तर ईश्वर प्रसन्नतेकडे संकट काळातून बाहेर काढणारी खिडकी म्हणून पाहिले जाते. जगाच्या त्रासाने क्लान्त व भ्रांत झालेल्या बालकाने आपली वेदना मातेसमोर मांडणे हा काही पलायनवाद नव्हे.

सद्भक्तांच्या दृष्टीने जर भगवंत माता-पिता, कर्ताधर्ता आहे अशी भक्तांची जर भावना आहे तर ‘झालो वियोगे हिंपुटी’ हा सद्भाव भगवंतासमोर भक्त जर प्रकट करीत असेल तर तो पलायनवाद नव्हे. जर आपल्या साºया तनामनात ईश्वरभक्ती मुरली की, जीवनाची वेल ईश्वरी साक्षात्काराच्या शक्तीने बहरून जाते. भक्तिभावनेमध्ये जेव्हा देहाची बंधने गळून पडतात तेव्हा अष्टसात्त्विक भावनेच्या साम्राज्यात भक्ताचे अवघे लौकिक भानच फुलपाखरासारखे हलके-हलके होऊ लागते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक