शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीतला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:30 IST

कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच. कारण रूपापेक्षा गुणात्मक सुगंध देणे, हेच कस्तुरीचे सामर्थ्य आहे. चंदनाच्या सुगंधावर कधी भाष्य करता येत नाही. वाऱ्याची एक झुळूक आली की, नाकाला आपोआपच संवेदना होते. मोत्याचे पाणी रांजणात भरता येणे शक्य नाही आणि गगनाला कधी गवसणी घालता येत नाही. तद्वतच भक्ती भावनेवर कुठल्याही शास्त्री पंडिताने औपचारिक भाष्य करण्याची गरज नसते. कारण भक्ती हाच भक्ताच्या जीवनाचा सर्वोच्च बिंदू असतो, नव्हे त्याच्या दृष्टीने तोच खरा साक्षात्कार असतो. जो परमात्मा सागरापेक्षा अथांग, आकाशाएवढा व्यापक व जेथे खुज्यांची उंची पोहोचत नाही एवढा उत्तुंग आहे, त्या परमात्म्याला मात्र आपल्या भावभोळ्या भक्तीच्या चिमटीत पकडताना उपेक्षेचे वाळवंट तुडविणारी जनाई म्हणते -

धरिला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर ।हृदय बंदीखाना केला । आत विठ्ठल कोंडिला ।शब्दे केली जडाजुडी । विठ्ठलपायी घातली बेडी ।सोंहम शब्दांचा मारा केला ।विठ्ठल काकुळतीला आला ।जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुला ।

जेव्हा पोटातील वेदना शब्दरूप होऊन ओठावर येतात तेव्हा आपल्या आराध्याविषयी अपार श्रद्धाभाव भक्तांच्या वाणीतून प्रकट होऊ लागतात. म्हणून भक्ती ही भक्ताची मिरासी आहे. ती एक जीवननिष्ठा आहे. मनाचे सामर्थ्य वाढविणारी ती एक अद्भुत शक्ती आहे. तो एक पलायनवाद नव्हे. सर्वसामान्यपणे भक्तीकडे आजही अनेक प्रतिभावंतांकडून पलायनवाद म्हणून पाहिले जाते, तर ईश्वर प्रसन्नतेकडे संकट काळातून बाहेर काढणारी खिडकी म्हणून पाहिले जाते. जगाच्या त्रासाने क्लान्त व भ्रांत झालेल्या बालकाने आपली वेदना मातेसमोर मांडणे हा काही पलायनवाद नव्हे.

सद्भक्तांच्या दृष्टीने जर भगवंत माता-पिता, कर्ताधर्ता आहे अशी भक्तांची जर भावना आहे तर ‘झालो वियोगे हिंपुटी’ हा सद्भाव भगवंतासमोर भक्त जर प्रकट करीत असेल तर तो पलायनवाद नव्हे. जर आपल्या साºया तनामनात ईश्वरभक्ती मुरली की, जीवनाची वेल ईश्वरी साक्षात्काराच्या शक्तीने बहरून जाते. भक्तिभावनेमध्ये जेव्हा देहाची बंधने गळून पडतात तेव्हा अष्टसात्त्विक भावनेच्या साम्राज्यात भक्ताचे अवघे लौकिक भानच फुलपाखरासारखे हलके-हलके होऊ लागते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक