शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

भक्तीतला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:30 IST

कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच. कारण रूपापेक्षा गुणात्मक सुगंध देणे, हेच कस्तुरीचे सामर्थ्य आहे. चंदनाच्या सुगंधावर कधी भाष्य करता येत नाही. वाऱ्याची एक झुळूक आली की, नाकाला आपोआपच संवेदना होते. मोत्याचे पाणी रांजणात भरता येणे शक्य नाही आणि गगनाला कधी गवसणी घालता येत नाही. तद्वतच भक्ती भावनेवर कुठल्याही शास्त्री पंडिताने औपचारिक भाष्य करण्याची गरज नसते. कारण भक्ती हाच भक्ताच्या जीवनाचा सर्वोच्च बिंदू असतो, नव्हे त्याच्या दृष्टीने तोच खरा साक्षात्कार असतो. जो परमात्मा सागरापेक्षा अथांग, आकाशाएवढा व्यापक व जेथे खुज्यांची उंची पोहोचत नाही एवढा उत्तुंग आहे, त्या परमात्म्याला मात्र आपल्या भावभोळ्या भक्तीच्या चिमटीत पकडताना उपेक्षेचे वाळवंट तुडविणारी जनाई म्हणते -

धरिला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर ।हृदय बंदीखाना केला । आत विठ्ठल कोंडिला ।शब्दे केली जडाजुडी । विठ्ठलपायी घातली बेडी ।सोंहम शब्दांचा मारा केला ।विठ्ठल काकुळतीला आला ।जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुला ।

जेव्हा पोटातील वेदना शब्दरूप होऊन ओठावर येतात तेव्हा आपल्या आराध्याविषयी अपार श्रद्धाभाव भक्तांच्या वाणीतून प्रकट होऊ लागतात. म्हणून भक्ती ही भक्ताची मिरासी आहे. ती एक जीवननिष्ठा आहे. मनाचे सामर्थ्य वाढविणारी ती एक अद्भुत शक्ती आहे. तो एक पलायनवाद नव्हे. सर्वसामान्यपणे भक्तीकडे आजही अनेक प्रतिभावंतांकडून पलायनवाद म्हणून पाहिले जाते, तर ईश्वर प्रसन्नतेकडे संकट काळातून बाहेर काढणारी खिडकी म्हणून पाहिले जाते. जगाच्या त्रासाने क्लान्त व भ्रांत झालेल्या बालकाने आपली वेदना मातेसमोर मांडणे हा काही पलायनवाद नव्हे.

सद्भक्तांच्या दृष्टीने जर भगवंत माता-पिता, कर्ताधर्ता आहे अशी भक्तांची जर भावना आहे तर ‘झालो वियोगे हिंपुटी’ हा सद्भाव भगवंतासमोर भक्त जर प्रकट करीत असेल तर तो पलायनवाद नव्हे. जर आपल्या साºया तनामनात ईश्वरभक्ती मुरली की, जीवनाची वेल ईश्वरी साक्षात्काराच्या शक्तीने बहरून जाते. भक्तिभावनेमध्ये जेव्हा देहाची बंधने गळून पडतात तेव्हा अष्टसात्त्विक भावनेच्या साम्राज्यात भक्ताचे अवघे लौकिक भानच फुलपाखरासारखे हलके-हलके होऊ लागते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक