शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोक्षाची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:39 IST

भगवंतांनी अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार ‘राजविद्याराजगुह्य’ या नवव्या अध्यायात दिला होता की, प्रापंचिक भोग आणि धनादी संग्रहाची मनोकामना ...

भगवंतांनी अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार ‘राजविद्याराजगुह्य’ या नवव्या अध्यायात दिला होता की, प्रापंचिक भोग आणि धनादी संग्रहाची मनोकामना आणि विविध प्रकारच्या इच्छा-आकांक्षा अंत:करणात सदैैव जपत यज्ञादी कर्मे करतात त्यांना देवतांची प्रार्थना करावी लागते, आपले साध्य पूर्ण व्हावे म्हणून याचना करावी लागते. पुण्य संपादन करीत स्वर्गलोकाची प्राप्ती करून घ्यायची असते. परंतु या सकाम वृत्तीने उपासना करणाऱ्या माझ्या भक्तांच्या हे लक्षात येत नाही की या विविध देवतासुद्धा माझीच रूपे आहेत. परंतु जे परमभक्त केवळ माझीच उपासना करतात, मलाच शरण येतात, केवळ माझाच आश्रय घेत, निष्काम भावनेने माझी पूजा करतात त्यांना माझी याचना कधीच करावी लागत नाही. मी त्यांची मोक्षाची इच्छा स्वत:च पूर्ण करतो.

अन्यन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते!तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम।।

भगवंत अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले की, ‘‘पार्था, माझी जी अन्यन्यभावाने भक्ती करतात, माझ्याच उपासनेत अखंड दंग असतात, ज्या माझ्या परमभक्तांना फक्त माझीच प्राप्ती करून घ्यायची इच्छा असते, जे सतत माझेच चिंतन करतात, माझ्या नामातच जे अखंड दंग असतात ना, त्यांना जे प्राप्त करून घ्यायचे आहे ती कामना पूर्ण करीत त्या त्यांच्या इच्छेचे रक्षण मीच करतो. त्यासाठी त्यांना माझी याचना करावी लागत नाही. त्यांचा योगक्षेम मीच सांभाळतो आणि मोक्षापर्यंत त्यांचा सांभाळ करतो, पार्था... प्रत्येक भक्ताने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, आपले संपूर्ण आयुष्य, आपले सुखदु:खाने व्याप्त नित्याचे जगणे भगवंतांच्याच हातात आहे. आपण सर्व खरे तर त्या कृपाळू भगवंतांच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्याच आहोत. भगवंत आपले कधीच अहित करीत नाहीत यावर आपली श्रद्धा हवी. प्रत्येक साधक भक्ताने श्रद्धेय मनाने भगवंतांची निष्काम भावनेने फक्त उपासना करावी.

वामनराव देशपांडे