शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोक्षाची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:39 IST

भगवंतांनी अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार ‘राजविद्याराजगुह्य’ या नवव्या अध्यायात दिला होता की, प्रापंचिक भोग आणि धनादी संग्रहाची मनोकामना ...

भगवंतांनी अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार ‘राजविद्याराजगुह्य’ या नवव्या अध्यायात दिला होता की, प्रापंचिक भोग आणि धनादी संग्रहाची मनोकामना आणि विविध प्रकारच्या इच्छा-आकांक्षा अंत:करणात सदैैव जपत यज्ञादी कर्मे करतात त्यांना देवतांची प्रार्थना करावी लागते, आपले साध्य पूर्ण व्हावे म्हणून याचना करावी लागते. पुण्य संपादन करीत स्वर्गलोकाची प्राप्ती करून घ्यायची असते. परंतु या सकाम वृत्तीने उपासना करणाऱ्या माझ्या भक्तांच्या हे लक्षात येत नाही की या विविध देवतासुद्धा माझीच रूपे आहेत. परंतु जे परमभक्त केवळ माझीच उपासना करतात, मलाच शरण येतात, केवळ माझाच आश्रय घेत, निष्काम भावनेने माझी पूजा करतात त्यांना माझी याचना कधीच करावी लागत नाही. मी त्यांची मोक्षाची इच्छा स्वत:च पूर्ण करतो.

अन्यन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते!तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम।।

भगवंत अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले की, ‘‘पार्था, माझी जी अन्यन्यभावाने भक्ती करतात, माझ्याच उपासनेत अखंड दंग असतात, ज्या माझ्या परमभक्तांना फक्त माझीच प्राप्ती करून घ्यायची इच्छा असते, जे सतत माझेच चिंतन करतात, माझ्या नामातच जे अखंड दंग असतात ना, त्यांना जे प्राप्त करून घ्यायचे आहे ती कामना पूर्ण करीत त्या त्यांच्या इच्छेचे रक्षण मीच करतो. त्यासाठी त्यांना माझी याचना करावी लागत नाही. त्यांचा योगक्षेम मीच सांभाळतो आणि मोक्षापर्यंत त्यांचा सांभाळ करतो, पार्था... प्रत्येक भक्ताने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, आपले संपूर्ण आयुष्य, आपले सुखदु:खाने व्याप्त नित्याचे जगणे भगवंतांच्याच हातात आहे. आपण सर्व खरे तर त्या कृपाळू भगवंतांच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्याच आहोत. भगवंत आपले कधीच अहित करीत नाहीत यावर आपली श्रद्धा हवी. प्रत्येक साधक भक्ताने श्रद्धेय मनाने भगवंतांची निष्काम भावनेने फक्त उपासना करावी.

वामनराव देशपांडे