शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

म्हणोनिया शरण जावे । सर्व भावे देवासी ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:22 IST

देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे परम कल्याण होणार नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी

अध्यात्म मार्गात देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे कल्याण होत नाही. तुकाराम महाराज आग्रहाने सांगतात - म्हणोनिया शरण जावे । सर्व भावे देवासी ॥फक्त महाराजच सांगतात असे नाही तर गीता माऊली देखील म्हणते -तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत ।देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे परम कल्याण होणार नाही. जीवाने अत्यंतिक दु:ख निवृत्तीकरिता आणि परमानंदाच्या प्राप्तीकरिता देवालाच शरण जायला पाहिजे. शरण तरी का जायचं..? तर गीता माऊली म्हणते -दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।मामेव ये प्रपध्यन्ते माया मेतां तरिन्त ते ॥भगवान म्हणतात, जे मला शरण येतात ते माया नदी तरुन जातात. आता देवाला शरण तरी कसे जावयाचे..? तर महाराज म्हणतात, सर्व भावे..! 

ज्ञानेश्वर महाराज हे सर्वभावे या पदाचे स्पष्टीकरण करतात -तया अहं वाचा चित्त अंग । देऊनिया शरण रिघ ॥महोदघी का गांग । रिघाले जैसे ॥गंगेचं पाणी आपल्या जवळचं सर्वस्व अर्पून जसं समुद्रात मिसळतं तसं आपल्या जवळील सर्वस्व देवाला अर्पण करावं. सर्वस्व म्हणजे काय..? तर अहं..! म्हणजे अहंकार हा अर्पण करता आला पाहिजे. परमात्मस्वरु पात तो स्थिर करता आला पाहिजे. मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी प्राण आहे, असं न म्हणता मी वासुदेव तत्वता या भूमिकेवर आलात तर अहंकार जाईल. अहं ब्रह्मास्मि ही ब्रह्मरु पता सिद्ध व्हावी लागेल नंतर शरणागतीसाठी दुसरे समर्पण आहे. वाचा..! तुकाराम महाराज म्हणतात -तुका म्हणे वाचा वाहिली अनंता ।बोलायचे आता काम नाही ॥वाचा समर्पण करता आले पाहिजे. मुखाने फक्त भगवंताचेच नाम घेणे. हरि बोला हरि बोला, नाही तरी अबोला. साधकाला असं जीवन जगता आलं पाहिजे. तिसरं समर्पण आहे चित्ताचं. चित्त देवाला देणे म्हणजे आपले अंत:करणसुद्धा देवालाच समिर्पत करता आले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात -माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही ॥धरोनिया बाही भव हा तारी दातारा ॥देवाचे चरणकमल ह्रदयात सर्व काळ धारण करणे. याला चैत्तीक शरणागती असे म्हणतात आणि शेवटची शरणागती सांगितली आहे अंग. शरीर देवाला समर्पण करावे लागेल. मनासहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥यालाच सर्वभावाने शरण जाणे असे म्हणतात. शरणागतीत मी देवाचाच आहे असा भाव असावा मगच तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा..!

( लेखक हे स्वत: राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक