शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 04:56 IST

मनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो.

- ब्रह्माकुमारी नीतामनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो. माणसाला सामाजिक प्राणी मानले जाते. समाज, कुटुंब, प्रकृती अशा अनेक बाबींबरोबर मनुष्याला ऋणानुबंध आहेत. संपूर्ण जीवनच त्या अनुषंगाने चालत आहे. एखादे मूल जन्माला आले की हळूहळू त्याच्यावर मातृऋण, पितृऋण वाढत जातात. हे ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात. कारण हे बांध आपल्याला जीवनाच्या प्रवाहामध्ये कुठे ना कुठे थांबवतात. जोपर्यंत त्याची भरपाई होत नाही तोपर्यंत आपली अजिबात सुटका नाही. आपण सर्वच पावलोपावली अनुभव घेत असतो की कोणतेही बंधन आपल्याला आवडत नाही. परंतु ही बंधने मनाला तसेच आपल्या पूर्ण जीवनाला प्रभावित करतात. सगळ्यांनाच आपल्या मनासारखा जीवनसाथी, नोकरी, कुटुंब मिळत नाही. काही ठिकाणी तडजोड करूनच जीवन व्यतीत करावे लागते. म्हणजेच हे बंध असे आहेत ज्यांनी आपले जीवन बांधून ठेवले आहे. पण सत्य हे आहे कीहे बांध कदाचित आपणच घातले आहेत. कळत नकळत केलेले विचार, बोल, कृती याचाच तो परिणाम आहे. आजच्या युगात ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ या नियमावर लोक चालत आहेत. कदाचित आपण त्याला आज व्यवसाय म्हणतो. प्रत्येक संबंधामध्ये, मग ते पती-पत्नी, भावंडं, मित्रमैत्रिणी, वडील-मुलगा, चालक-मालक असो. सगळीकडे मी किती केलं आणि त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीने किती केलं याचा हिशेब लावला जातो. कधी कधी आपण बोलून दाखवत नाही, पण मनातल्या मनात तो हिशेब करण्याची प्रक्रिया सुरूच राहते. अनेकदा ती अव्याहत सुरू असते. काही वेळा तर आपण स्वत:चीच समजूत घालतो की जाऊ दे, कदाचित हे पूर्वजन्माचं देणं असेल जे आज आपण फेडत आहोत. कळत नकळत आपल्याला आपल्या कर्मांचं गूढ लक्षात येतं.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक