शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 04:56 IST

मनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो.

- ब्रह्माकुमारी नीतामनुष्य जीवन अतिदुर्लभ समजले जाते. परंतु जर खोलवर विचार केला तर प्रत्येक जन्माचे काही ऋण घेऊन आपण पुढे जात असतो. माणसाला सामाजिक प्राणी मानले जाते. समाज, कुटुंब, प्रकृती अशा अनेक बाबींबरोबर मनुष्याला ऋणानुबंध आहेत. संपूर्ण जीवनच त्या अनुषंगाने चालत आहे. एखादे मूल जन्माला आले की हळूहळू त्याच्यावर मातृऋण, पितृऋण वाढत जातात. हे ऋणांचे बंध प्रत्येकाला फेडावेच लागतात. कारण हे बांध आपल्याला जीवनाच्या प्रवाहामध्ये कुठे ना कुठे थांबवतात. जोपर्यंत त्याची भरपाई होत नाही तोपर्यंत आपली अजिबात सुटका नाही. आपण सर्वच पावलोपावली अनुभव घेत असतो की कोणतेही बंधन आपल्याला आवडत नाही. परंतु ही बंधने मनाला तसेच आपल्या पूर्ण जीवनाला प्रभावित करतात. सगळ्यांनाच आपल्या मनासारखा जीवनसाथी, नोकरी, कुटुंब मिळत नाही. काही ठिकाणी तडजोड करूनच जीवन व्यतीत करावे लागते. म्हणजेच हे बंध असे आहेत ज्यांनी आपले जीवन बांधून ठेवले आहे. पण सत्य हे आहे कीहे बांध कदाचित आपणच घातले आहेत. कळत नकळत केलेले विचार, बोल, कृती याचाच तो परिणाम आहे. आजच्या युगात ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ या नियमावर लोक चालत आहेत. कदाचित आपण त्याला आज व्यवसाय म्हणतो. प्रत्येक संबंधामध्ये, मग ते पती-पत्नी, भावंडं, मित्रमैत्रिणी, वडील-मुलगा, चालक-मालक असो. सगळीकडे मी किती केलं आणि त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीने किती केलं याचा हिशेब लावला जातो. कधी कधी आपण बोलून दाखवत नाही, पण मनातल्या मनात तो हिशेब करण्याची प्रक्रिया सुरूच राहते. अनेकदा ती अव्याहत सुरू असते. काही वेळा तर आपण स्वत:चीच समजूत घालतो की जाऊ दे, कदाचित हे पूर्वजन्माचं देणं असेल जे आज आपण फेडत आहोत. कळत नकळत आपल्याला आपल्या कर्मांचं गूढ लक्षात येतं.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक