शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

अंधारातून प्रकाशाकडे ......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 16:40 IST

दिवाळी सण हा प्रकाश वा दिव्यांचा सण भारतभर साजरा केला जाणारा महत्वाचा सण आहे. दिपावलीचे महत्व जाणून घेणे अत्यंत ...

दिवाळी सण हा प्रकाश वा दिव्यांचा सण भारतभर साजरा केला जाणारा महत्वाचा सण आहे. दिपावलीचे महत्व जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.जीवनातला अंधार दूर सारुन प्रकाशाकडे वाटचाल करणं हेच खरे प्रकाश पर्व आहे.

अंधार म्हणजे  आसक्ती आणि मोह यांचा अंधकार.दुःख,वेदना,अज्ञान,अंधश्रद्धा अस्वस्थता व  अनारोग्य,विफलता,नैराश्य हे अंधाराचे  लक्षण म्हणता येईल.काम,क्रोध,माया,लोभ ,अहंकार ,ईर्शा ,द्वेष या गर्तेत आकंठ बुडणारा व्यक्तीच्या जीवनात अंधकार निर्माण होत असतो. हा अंधार आपणास जीवन सुखापासून दूर घेवून जातो. या अंधारातून मुक्त होवून प्रकाश पर्वाचे स्वागत करणा-या  दिवाळीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे.

जीवन सुंदर आहे.ते सुंदरतेने जगता यावं यासाठी स्वयंप्रकाशित व्हावं लागतं. अंधार नाहीसा करण्यासाठी अंतरंग स्वच्छ व शुद्ध असावे लागते.प्रकाश हे एक तत्व आहे.हे तत्व आत्मसात करावं लागतं. प्रकाश म्हणजे चैतन्य,उत्साहाची उधळण ही अनुभूती आहे. ती अनुभवता आली पाहीजे. मन मंदिराच्या गाभा-यात एक दिवा प्रज्वलीत करुन स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय जीवनात उजेड पडणार नाही.उघड्या डोळ्यासमोरचा अंधार कदापि दूर होणार नाही.

स्वयंप्रकाश ज्ञान-ईश्वराची ओळख करुन देतो. ही ओळख सर्वांना सज्ञान बनविते. सज्ञानी हाच प्रकाशाचे महात्म्य ओळखू शकतो. ज्ञानप्रकाश  म्हणजे यशोशिखरावर पोहोचविणारा ,सुख समृद्धीचा प्रशस्त सन्मार्ग होय. स्वयंप्रकाशित होणं याचा अर्थ  बरे- वाईट,सत्य -असत्य,ज्ञान-अज्ञान,श्रद्धा-अंधश्रद्धा,सुख- दुःख,हित -अहित ,वेदना आणि संवेदना  याची जाणिव होणं असा आहे.स्वतःसाठी सारेच जगत असतात परंतू दुस-यासाठी जगता आलं पाहीजे. असहाय्य,वंचितांचे मदतीला धावून जाण्यात खरा पुरुषार्थ आहे.दुस-याचं सुख असो वा दुःख हे आपलं समजण्याची संवेदना निर्माण होत मनुष्य आणखी तेजस्वी होते. या प्रखर तेजाने तयांचे जीवन उजळून जाते. सद्याचं युग हे विज्ञान युग म्हटले जाते.या युगातील मानव निर्मित झगमगाटात आपण सारे वाहून गेलो आहोत...रात्रीचा दिवस करण्याची किमया आपल्याला मोहीत करुन जाते. कृत्रिम असलेल्या अनेक साधने आपल्याला निसर्ग निर्मित पेक्षाही मोठ्या वाटतात.वा-याची झुळूख पेक्षाही पंख्याची हवा ,वातानुकुलीत हवेत आपणाला आनंदायी वाटते.अंधार दूर करण्याच्या शोधात आपण सुखाचा अनुभव घेत सुर्य दर्शनही दुर्मिळ व्हावं अशा झगमगाटात आपण जगतो आहोत. जल समृद्धीचा  नाहीसी करीत विद्युत प्रकल्पात आपणास प्रसन्नता वाटू लागली आहे.नव्या नव्या प्रयोगातून सारं अंतरिक्ष काबिज करण्याच्या मोहात मनुष्य सुपर न झाला आहे.वास्तविकता ही आहे की आपण निसर्गावर हा अन्याय करित आहोत. हे सुर्यप्रकाशा एवढे सत्य कुणी नाकारु शकेल कां?

मी अविवेकाची काजळी।फेडूनि विवेक दिप उजळी।जै योगीया पाहीजे दिवाळी निरंतर।।

वरील श्री ज्ञानेश्वरीतील एक ओवी या ठिकाणी प्रकाश टाकणारी आहे

 हे सारे विज्ञान वरदान ठरण्यापेक्षा शाप ठरले की काय? असा यश्चप्रश्न ठाकला आहे.भौतिक सुख हेच जीवनाचं ध्येय ठरल्याने जीवनातला प्रकाश काळवंडला आहे हे  वास्तव चित्र दिसून येते..

सुर्ये आधिष्ठीली प्राची |जगा जाणिव दे प्रकाशाची ||तैसी श्रोतया ज्ञानाची |दिवाळी करी || संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकाशाचे सत्व सांगणारी ही ज्ञानेश्वरीतील ओवी अधोरेखीत करावीशी वाटते.

अज्ञान,अंधश्रद्धा ,असत्याच्या अंधकारातून मुक्त होत सर्वांनी स्वयंप्रकाशित व्हावं आणि दुस-यांनाही अंधारातून मुक्त करुन प्रकाशीत करावं यासाठी प्रकाश मार्गाचे वाटेकरी व्हावे"तमसो मा ज्योतिर्गमय..!" हेच खरे दिपावलीचे प्रकाश पर्व आहे.- नंदकिशोर हिंगणकरआकोट जि.अकोला 

टॅग्स :AkolaअकोलाDiwaliदिवाळीspiritualअध्यात्मिक