शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवघा रंग एक झाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:23 IST

इंद्रजित देशमुखवैष्णवांचा मेळा वारीला चाललाय. आज सगळीकडे आनंदीआनंद दाटून आलाय. वारकऱ्यांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहतोय. ‘अवघा रंग एक झाला’ ही अवस्था आहे. सावळा पांडुरंग भेटणार आहे. माहेरची ओढ आणि तेथील सुख याविषयी तन्मयता धारण केलेले मन भान हरपून वारीत समरसून जातंय. खरं पाहिलं तर या वारीसाठी एवढं वेडं का व्हायचं? ...

इंद्रजित देशमुखवैष्णवांचा मेळा वारीला चाललाय. आज सगळीकडे आनंदीआनंद दाटून आलाय. वारकऱ्यांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहतोय. ‘अवघा रंग एक झाला’ ही अवस्था आहे. सावळा पांडुरंग भेटणार आहे. माहेरची ओढ आणि तेथील सुख याविषयी तन्मयता धारण केलेले मन भान हरपून वारीत समरसून जातंय. खरं पाहिलं तर या वारीसाठी एवढं वेडं का व्हायचं? का इतके दिवस सगळी आवराआवर करायची. सगळा संसार सोडून ऊन, पाऊस, वादळ या साºया गोष्टींची तमा न बाळगता पायपीट का करायची? इतर तीर्थांची आणि पंढरी क्षेत्राची तुलना करता नेमकं काय मिळतं या वारीतून, याविषयी तुकोबाराय सांगतात -काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन ।पंढरीची जाण एक यात्रा ।।काशी देह विटंबणे द्वारके जाळणे ।पंढरीसी होणे ब्रह्मरूप ।।अठरापगड जाती याती सकळहो वैष्णव ।दुजा नाही भाव पंढरीसी ।।तुका म्हणे असो अथवा नसो भाव ।दर्शने पंढरीराव मोक्ष देतो ।।काशीची यात्रा आम्ही पापनाशासाठी किंवा पुण्य संपादनासाठी किंवा मरणोत्तर मुक्तीसाठी करतो; पण पंढरीची वारी ही निष्काम वृत्तीने करण्याची आहे. काशीची यात्रा मृत्यू जवळ आला की कराविशी वाटते ती एकदाची घडावी असे वाटते; परंतु पंढरीची यात्रा ही एकदाच आणि मृत्यू जवळ आला आहे म्हणून करायची नाही तर न चुकता दरवर्षी जायचे आहे. काशी यात्रा एकट्याने किंवा कुटुंबीयांसमवेत होते; पण पंढरीची वारी दिंडीबरोबर करायची असते. एकमेकांत मिसळून, समतेचा गजर करीत, जात-पात विसरून करायची असते. कारण वारीमध्ये वारकºयांचा गाव, वर्ण, प्रांत, जात आणि व्यक्तित्त्वही संपूर्ण विलीन झालेले असते. विठ्ठलभक्तीच्या भरतीने ओसंडून वाहणारा तो एक जनसागरच असा असतो. या जनसागरातील व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक, तो जनमानसाच्या व्यापक हृदयाचा मोक्ष अनुभवतोच. तुकोबाराय आणखी एका अभंगात म्हणतात -वाराणसी गया पाहिली द्वारका ।परि नये तुका पंढरीचा ।।पंढरीच्या लोका नाही अभिमान ।पाया पडेजन एकमेका।।तुका म्हणे जाये एक वेळा पंढरी ।तयाचिया घरी यम न ये ।।इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी थोडासा विरंगुळा मिळेल; पण आयुष्याचा विसावा मिळण्याचे ठिकाण हे पंढरपूर आहे. याचे कारण पंढरपुरामध्ये माणसाचा अभिमान नाहीसा होण्याची एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये समोरच्या प्रत्येकामध्येच पांडुरंग आहे यावर श्रद्धा ठेवून एकमेकांचे जीवभावे दर्शनाची रीत आहे. सात वर्षांचा मुलगा सत्तर वर्षांच्या आजोबांच्या पाया पडतो आणि सत्तर वर्षांचा आजोबा सात वर्षांच्या बाळाच्या पाया पडतो. एकमेका पायी लागण्याच्या व्यवस्थेत ‘जन हेचि जनार्दन’ याचा बोध इथे मिळतो. अभिमान माणसाला घातास कारण ठरतो. अहंकार संपणे ही परमार्थातील उच्चतम अवस्था आहे. जिथे अहंकार संपतो तो कळी आणि काळालाही घाबरत नाही. अहंकार निर्मूलनाचे हे साधे, सोपे आचारधर्म वारकºयाला विश्व कवेत घ्यायला मदत करतात. वारीच्या सहभागासाठी अलीकडे हौशे, गवशे, नवशे लोक येताहेत. हौशे लोक तर जगभरातून येताहेत. हौसेने हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी काही श्रद्धाळू नवसे नवस फेडण्यासाठी येतात. काही गवशे काही मिळविण्यासाठी येतात. वारकºयाला मात्र काहीच मागायचे नाही. त्याचे हे निष्काम व्रत आहे. त्याला देवाजवळ स्वत:साठी काहीच मागायचे नाही, कारण या यात्रेतील शेवटची प्रार्थना ही पसायदानाची असते, ज्यामध्ये एकट्याचे कल्याण नाही. मागितले तर अवघ्या विश्वाचे कल्याण मागितले आहे. या यात्रेच्या निमित्ताने त्याला हवे आहे चंद्रभागेचे स्नान, पांडुरंगाचे दर्शन. बस्स दुसरे काही नको. फक्त दर्शने समाधान याच वृत्तीने ही लक्ष लक्ष पाऊले वाट चालत आहेत. तीच पाऊले देखणी जी परब्रह्म भेटी चालती. भवसागर तुटोनिया परमशांती अनुभवती. या यात्रेतल्या वारकºयांची विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. ही वाट चालताना विठ्ठल आणि संतजनांच्या नुसत्या आठवणीनेही त्यांच्या अंगावर शहारे येतात. कंठात गहिवर दाटतो. डोळ्यात पाणी साचते, म्हणूनच पंढरीच्या यात्रेला दुसºया कुठल्याच यात्रेची सरयेणार नाही, कारण या यात्रेची फलश्रुती हीच आहे की,भाग गेला शीण गेला ।अवघा झाला आनंदु ।।(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)