शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:57 IST

एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवार

एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो. देवाचे चिंतन केले तर दैवीगुण म्हणजे प्रेम, आनंद, मौन, शांती या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात. राक्षसाचे चिंतन केल्यास क्र ोध, हव्यास, अहंकार, मत्सर या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात म्हणूनच परमेश्वराचे चिंतन आपल्याला जीवनाच्या भवसागरातून सुखरूप पार पाडत असते. कोणत्याही परिस्थिती मध्ये आपण केलेला पाहिला विचार महत्त्वाचा ठरतो कारण त्यानंतरची विचारांची शृखंला त्याप्रमाणे निर्माण होते.जेव्हा पाहिला विचार सकारात्मक असतो तेव्हा त्यानंतरचे चिंतन सकारात्मकच होत जात असते व माझं चांगलं होणार हा भाव आपल्या बाह्यमनातून अंतर्मनात मूळ धरून बसतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्याचे आपण चिंतन करायला पाहिजे. जेव्हा आपला भूतकाळ चांगला नसतो, वर्तमानकाळ सुद्धा चांगला नसतो तेव्हा माझा भविष्यकाळ कसा चांगला राहील याचे चिंतन महत्त्वाचे ठरते. चिंतनाचे प्रमाण, त्याची तीव्रता व त्याचा दर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक आहे यावर आपले भविष्य अवलंबून असते. अध्यात्मामधील निसर्ग नियम सांगतो की ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी निसर्गाकडे विचारामार्फत परावर्तीत होत असतात व जेव्हा त्या निसर्गाकडे पोहचतात, तेव्हा निसर्ग त्याला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे चिंतन हे सजगपणे करायला पाहिजे. जेव्हा आपण वारंवार एखाद्या गोष्टीचे चिंतन करतो तेव्हा ती आपल्या अंतर्मनात रुजते व त्याप्रमाणे आपल्या जीवनात गोष्टी घडत जातात.चिंतन हे परिस्थितीचे न करता त्यावरील उपायाचे करायला पाहिजे म्हणजेच परिस्थितीवर मात करता येते; मात्र बरेचदा आपण आपली शक्ती ही परिस्थितीचे चिंतन करण्यात व त्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात घालवितो व त्यामध्ये आपली आत्मिक शिक्त खर्ची पडते. त्यामुळे आपण परिस्थितीसमोर दुर्बल होतो व त्यावर मात करू शकत नाही. चिंतन चांगल्या गोष्टीचे करायचे की वाईट गोष्टीचे हा विकल्प आपल्यालाच ठरवायचा असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की, जसे तुम्ही चिंतन कराल तसे तुम्ही व्हाल; दुबळे किंवा तेजस्वी!.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक