शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

सद्विवेक बुद्धीने वागणे जीवनास दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:39 IST

बदलत्या काळानुसार स्पष्टपणा कमी होऊन भयमुक्त व सांशकता पूर्ण वातावरणाची निर्मिती होताना दिसून येते. 

बोलण्यात राही निर्भय । कष्ट करण्यातही पुढेच पाय ।। वागणूक तरी आदर्श ।राहे प्रचारकांची ।। 

वाढत चाललेल्या दांभिकतेवर अत्यंत मार्मिक असे आसूड राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी उगरलेला आहे. स्वतःच्या हितासाठी माणसे दिवसरात्र झटत आहेत. आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या ना त्या मार्गाने अर्थार्जनात सोबतच स्वार्थ देखील वाढत असून चांगुलपणा मात्र कमी होताना दिसत आहे. ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ' असे जरी प्रचलित असले, तरी त्याची खंत मनाला लागून राहते. ग्राम विकास हा केंद्रबिंदू मानून कित्येक ध्येयवेडे कार्य करत होते, करत आहेत, आणि करत राहतील परंतु बदलत्या काळानुसार स्पष्टपणा कमी होऊन भयमुक्त व सांशकता पूर्ण वातावरणाची निर्मिती होताना दिसून येते. 

आत्मकेंद्री वृत्ती कमी होऊन व्यक्तिपूजेचा संचार होताना दिसत आहे. खुशमस्करीपणा वाढीस लागलेला आहे. त्यामुळे विकासात बाधा निर्माण होताना दिसते. अशा प्रसंगी संत श्री तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे व्यक्ती हा  निर्भय असावाच. परंतु तो दिलेले काम करण्यास देखील पुढे असला असला पाहिजे. असे त्यांनी सांगितले आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण'अशा प्रकारची मनोवृत्ती स्वतः व राष्ट्राच्या विकासात बाधा असते. सदविवेक बुद्धीने आदर्श स्वरूपाचे वागणे ही सर्वांना दिशा देऊन जाते. आणि त्यातूनच नवचैतन्य निर्माण होते.

अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ।।कैसे न कळे त्या डेंगा ।हित आदळले अंगा ।। 

संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी देखील वरील अभंगाच्या ओळी ताठर मनाची तुलना अत्यंत कठोर वेडेवाकडे अशा खोट्या सोबत केली आहे.  अशा ताठर व ढोंगी वागण्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे अहितच होते. कामचुकार व दृष्टप्रवृत्तीची तुलना व ओझे वाहणाऱ्या आणि नदीतून जाणाऱ्या गाढवा सोबतच केली आहे. 

त्याचे असे घडले की एका व्यापार्‍याने त्याच्या व्यापाराकरिता ओझे वाहण्यासाठी म्हणून एक गाढव खरेदी केले. व्यापाऱ्यास मिठाची पोती नदीपात्राच्या एका तीरावरून दुसर्‍या तीरावर न्यावयाचे होते.  त्यांनी गाढवाच्या पाठीवर ते दोन मिठाची पोती ठेवले.आणि त्यास नदीपात्रातून दुसर्‍या तीरावर जाण्यासाठी हाकलले मिठाचे ओझे जड होते. त्यामुळे गाढवाचे पाय दुखायला लागले. पाय घसरून पाण्यात पडले. त्यामुळे मिठाचा पाण्याशी संपर्क होऊन मीठ विरघळू लागले. आणि गाढव काठावरी येईपर्यंत बरेच मीठ कमी होऊन ओझे कमी झाले होते. ही युक्ती वाढली. त्याचा कामचुकारपणा जागा झाला. पण अज्ञानी गाढवास वस्तू ज्ञानाचे वावडे होते. पुढच्या वेळी देखील ओझे वाहताना समान युक्ती अवलंबण्याचा गाढवाने प्रयत्न केला. परंतु पुढच्या वेळी मात्र व्यापाऱ्याने त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले होते. गाढवाने ओझे कमी करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात घसरून पडल्याचे नाटक केले.

वस्तूज्ञानात अज्ञानी असणाऱ्या गाढवाच मात्र ओझे कमी होईल असे वाटले. आणि प्रत्यक्षात मात्र उलटेच घडले पाणी कापसामध्ये घुसल्यामुळे कापूस ओला होऊन वजन अधिकच जड झाले. यामुळे गाढव काठावर येता-येता मूर्च्छित अवस्थेत गेले. तात्पर्य हेतुपरस्पर कामचुकारपणा व आळस हा प्रत्येकाचा घातच करत असतो. व सर्वांसाठी तो घातक स्वरूपाचा असतो. म्हणून  महाराजांनी  याचे उत्तम वर्णन केलेले आहे.

श्रम ही फक्त एकट्या दुकट्या ची बाब नसून सांघीक स्वरूपात श्रम करण्याची गरज असून श्रमाने श्रम परिहार होतो. व देश ऐक्य वाढीस लागते. असे विशद केले आहे अंततः एकच सांगणे की, 

सर्वांनी सर्वांशी पुरक व्हावे ।  ऐसे धर्माचे सूत्र बरवे ।हे काय तुम्हासी सांगावे शहाणे जन हो ।- डॉ.भालचंद्र संगनवार ( जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर. ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक