शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सद्विवेक बुद्धीने वागणे जीवनास दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:39 IST

बदलत्या काळानुसार स्पष्टपणा कमी होऊन भयमुक्त व सांशकता पूर्ण वातावरणाची निर्मिती होताना दिसून येते. 

बोलण्यात राही निर्भय । कष्ट करण्यातही पुढेच पाय ।। वागणूक तरी आदर्श ।राहे प्रचारकांची ।। 

वाढत चाललेल्या दांभिकतेवर अत्यंत मार्मिक असे आसूड राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी उगरलेला आहे. स्वतःच्या हितासाठी माणसे दिवसरात्र झटत आहेत. आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या ना त्या मार्गाने अर्थार्जनात सोबतच स्वार्थ देखील वाढत असून चांगुलपणा मात्र कमी होताना दिसत आहे. ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ' असे जरी प्रचलित असले, तरी त्याची खंत मनाला लागून राहते. ग्राम विकास हा केंद्रबिंदू मानून कित्येक ध्येयवेडे कार्य करत होते, करत आहेत, आणि करत राहतील परंतु बदलत्या काळानुसार स्पष्टपणा कमी होऊन भयमुक्त व सांशकता पूर्ण वातावरणाची निर्मिती होताना दिसून येते. 

आत्मकेंद्री वृत्ती कमी होऊन व्यक्तिपूजेचा संचार होताना दिसत आहे. खुशमस्करीपणा वाढीस लागलेला आहे. त्यामुळे विकासात बाधा निर्माण होताना दिसते. अशा प्रसंगी संत श्री तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे व्यक्ती हा  निर्भय असावाच. परंतु तो दिलेले काम करण्यास देखील पुढे असला असला पाहिजे. असे त्यांनी सांगितले आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण'अशा प्रकारची मनोवृत्ती स्वतः व राष्ट्राच्या विकासात बाधा असते. सदविवेक बुद्धीने आदर्श स्वरूपाचे वागणे ही सर्वांना दिशा देऊन जाते. आणि त्यातूनच नवचैतन्य निर्माण होते.

अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ।।कैसे न कळे त्या डेंगा ।हित आदळले अंगा ।। 

संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी देखील वरील अभंगाच्या ओळी ताठर मनाची तुलना अत्यंत कठोर वेडेवाकडे अशा खोट्या सोबत केली आहे.  अशा ताठर व ढोंगी वागण्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे अहितच होते. कामचुकार व दृष्टप्रवृत्तीची तुलना व ओझे वाहणाऱ्या आणि नदीतून जाणाऱ्या गाढवा सोबतच केली आहे. 

त्याचे असे घडले की एका व्यापार्‍याने त्याच्या व्यापाराकरिता ओझे वाहण्यासाठी म्हणून एक गाढव खरेदी केले. व्यापाऱ्यास मिठाची पोती नदीपात्राच्या एका तीरावरून दुसर्‍या तीरावर न्यावयाचे होते.  त्यांनी गाढवाच्या पाठीवर ते दोन मिठाची पोती ठेवले.आणि त्यास नदीपात्रातून दुसर्‍या तीरावर जाण्यासाठी हाकलले मिठाचे ओझे जड होते. त्यामुळे गाढवाचे पाय दुखायला लागले. पाय घसरून पाण्यात पडले. त्यामुळे मिठाचा पाण्याशी संपर्क होऊन मीठ विरघळू लागले. आणि गाढव काठावरी येईपर्यंत बरेच मीठ कमी होऊन ओझे कमी झाले होते. ही युक्ती वाढली. त्याचा कामचुकारपणा जागा झाला. पण अज्ञानी गाढवास वस्तू ज्ञानाचे वावडे होते. पुढच्या वेळी देखील ओझे वाहताना समान युक्ती अवलंबण्याचा गाढवाने प्रयत्न केला. परंतु पुढच्या वेळी मात्र व्यापाऱ्याने त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले होते. गाढवाने ओझे कमी करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात घसरून पडल्याचे नाटक केले.

वस्तूज्ञानात अज्ञानी असणाऱ्या गाढवाच मात्र ओझे कमी होईल असे वाटले. आणि प्रत्यक्षात मात्र उलटेच घडले पाणी कापसामध्ये घुसल्यामुळे कापूस ओला होऊन वजन अधिकच जड झाले. यामुळे गाढव काठावर येता-येता मूर्च्छित अवस्थेत गेले. तात्पर्य हेतुपरस्पर कामचुकारपणा व आळस हा प्रत्येकाचा घातच करत असतो. व सर्वांसाठी तो घातक स्वरूपाचा असतो. म्हणून  महाराजांनी  याचे उत्तम वर्णन केलेले आहे.

श्रम ही फक्त एकट्या दुकट्या ची बाब नसून सांघीक स्वरूपात श्रम करण्याची गरज असून श्रमाने श्रम परिहार होतो. व देश ऐक्य वाढीस लागते. असे विशद केले आहे अंततः एकच सांगणे की, 

सर्वांनी सर्वांशी पुरक व्हावे ।  ऐसे धर्माचे सूत्र बरवे ।हे काय तुम्हासी सांगावे शहाणे जन हो ।- डॉ.भालचंद्र संगनवार ( जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर. ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक