शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

अध्यात्मात एकाग्रता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 00:38 IST

‘जर तुम्हाला अध्यात्माकडे वळायचे असेल, तर डोंगर, दऱ्यात जा.’ डोंगर, दऱ्यांमध्ये कुठलीच आध्यात्मिकता नोही. ही एक तुमच्या आतल्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे.

-सद्गुरू जग्गी वासुदेव

असे लाखो लोक आहेत, ज्यांना वाटतं की, ते आध्यात्मिक मार्गावर आहेत, पण त्यात ते काहीच प्रगती करत नाहीत. याचे कारण हे आहे की, या मार्गात खरोखर काही घडण्यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णपणे त्यात झोकून देणे गरजेचे आहे. स्वत:ला पूर्णपणे झोकून देणे याचा अर्थ असा नाही की, आपण आपले काम थांबविले पाहिजे. कुटुंबाचा त्याग किंवा इतर कोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हा गैरसमज नेहमीच समाजात राहिला आहे. ‘जर तुम्हाला अध्यात्माकडे वळायचे असेल, तर डोंगर, दऱ्यात जा.’ डोंगर, दऱ्यांमध्ये कुठलीच आध्यात्मिकता नाही. ही एक तुमच्या आतल्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे. तुम्ही तुमच्या आत जे काही करता, ते अध्यात्म आहे. तुमच्याबाहेर, बाह्य जगात तुम्ही काय करता, ते अध्यात्म नव्हे. तुम्ही कोठेही गेलात; शहरात राहात असाल किंवा हिमालयात... तुमचे आंतरिक जग हे सारखेच असते.अध्यात्म हे आतल्या दिशेने टाकले जाणारे पाऊल आहे, एक असा आयाम जो तुमच्या वर्तमान अनुभव कक्षेबाहेर आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी वेगळ्याच पातळीची एकाग्रता लागते. तुम्हाला जर अनुभवात्मक आयामात पाऊल ठेवायचे असेल, तर आजपर्यंत तुम्ही करत असलेली सर्व व्यर्थ बडबड, तुमची धारणा, मान्यता असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्ही खरे किंवा खोटे समजत असलेल्या सर्व गोष्टी, हे सर्वकाही तुम्ही बाजूला ठेवणे गरजेचे आहे.तुम्ही स्वत:ला जे काही समजता किंवा जग तुम्हाला जे काही समजते, ते केवळ सामाजिकदृष्ट्या निगडित आहे. अस्तित्वाशी त्याचा काडीमात्र संबंध नाही. अस्तित्वाच्या दृष्टीने काही घडायला हवे असेल, तर तुम्ही त्याला पूर्णत: एका वेगळ्या मार्गाने सामोरे जाणे आवश्यक आहे. तुम्ही नुकतेच जन्माला आल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली, तरच हे साध्य होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक