शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वास्तवात परत या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 05:19 IST

तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमची धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमचा पती किंवा पत्नी यांच्याप्रति नाही.

तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमची धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमचा पती किंवा पत्नी यांच्याप्रति नाही. तुमची सर्वात सखोल आसक्ती तुमचे विचार आणि तुमच्या भावनांशी आहे - नेहमीच. ‘नाही, मला माझी पत्नी प्रिय आहे, माझे मूल मला प्रिय आहे,’ असे तुम्ही म्हणाल. पण जेव्हा तुमची पत्नी, तुमचे मूल किंवा तुमच्या भोवतालची परिस्थिती यात तुमचे विचार, विचारसरणी आणि भावना विरुद्ध जातात, तेव्हा हे सर्व काही कोसळते. फक्त तुमचे स्वत:चे विचार आणि भावनाच तग धरून राहतात. खरे पाहता, आयुष्यात हेच तुम्ही जमवलेले आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे भावना व्यक्त करण्याचे मार्ग, तुमच्या कल्पना, तुमची विचारसरणी, तुमच्या धारणा आणि मान्यता... यात हे सारे तुमच्या भोवतालच्या इतर गोष्टींना चिकटून वाढत जाते. म्हणून हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे. तुमचे घर किंवा तुमचा बँक बॅलन्स नव्हे. तुमची विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याच्या रीती, तुमची विचारसरणी - तुमचे व्यक्तिमत्त्व, हेच तुम्ही खरोखर गोळा करून ठेवले आहे. हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे.‘माझ्याजवळ एक कल्पना आहे’ याचा अर्थ, हा काही बोध किंवा वास्तविकता नव्हे. ही केवळ विशिष्ट प्रकारची कल्पना आहे. विचारधारा म्हणजे एक संघटित कल्पना. ही कल्पनाच तुम्हाला वास्तविकतेपासून अलग करते. ही कल्पना जेव्हा मोठ्या प्रमाणावर संघटित केली जाते, तेव्हा ती तुम्हाला पूर्णत: वास्तविकतेपासून विभक्त करते. कल्पना फार आकर्षक आहे. जेव्हा ती मोठ्या प्रमाणात संघटित केली जाते, तेव्हा ती खूपच आकर्षक बनते. पण तुम्हाला वास्तविकतेपासून जर दूर केले गेले, तर खरोखर तुम्ही एक अर्थपूर्ण जीवन जगू शकाल का? खऱ्या अर्थाने तुम्ही वास्तविक जीवन जगू शकाल का? तुम्ही जीवन अनुभवू शकाल का? जीवन जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते जसे आहे तसे जाणून घेणे.-सद्गुरू जग्गी वासुदेव