शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वास्तवात परत या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 05:19 IST

तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमची धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमचा पती किंवा पत्नी यांच्याप्रति नाही.

तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमची धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमचा पती किंवा पत्नी यांच्याप्रति नाही. तुमची सर्वात सखोल आसक्ती तुमचे विचार आणि तुमच्या भावनांशी आहे - नेहमीच. ‘नाही, मला माझी पत्नी प्रिय आहे, माझे मूल मला प्रिय आहे,’ असे तुम्ही म्हणाल. पण जेव्हा तुमची पत्नी, तुमचे मूल किंवा तुमच्या भोवतालची परिस्थिती यात तुमचे विचार, विचारसरणी आणि भावना विरुद्ध जातात, तेव्हा हे सर्व काही कोसळते. फक्त तुमचे स्वत:चे विचार आणि भावनाच तग धरून राहतात. खरे पाहता, आयुष्यात हेच तुम्ही जमवलेले आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे भावना व्यक्त करण्याचे मार्ग, तुमच्या कल्पना, तुमची विचारसरणी, तुमच्या धारणा आणि मान्यता... यात हे सारे तुमच्या भोवतालच्या इतर गोष्टींना चिकटून वाढत जाते. म्हणून हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे. तुमचे घर किंवा तुमचा बँक बॅलन्स नव्हे. तुमची विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याच्या रीती, तुमची विचारसरणी - तुमचे व्यक्तिमत्त्व, हेच तुम्ही खरोखर गोळा करून ठेवले आहे. हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे.‘माझ्याजवळ एक कल्पना आहे’ याचा अर्थ, हा काही बोध किंवा वास्तविकता नव्हे. ही केवळ विशिष्ट प्रकारची कल्पना आहे. विचारधारा म्हणजे एक संघटित कल्पना. ही कल्पनाच तुम्हाला वास्तविकतेपासून अलग करते. ही कल्पना जेव्हा मोठ्या प्रमाणावर संघटित केली जाते, तेव्हा ती तुम्हाला पूर्णत: वास्तविकतेपासून विभक्त करते. कल्पना फार आकर्षक आहे. जेव्हा ती मोठ्या प्रमाणात संघटित केली जाते, तेव्हा ती खूपच आकर्षक बनते. पण तुम्हाला वास्तविकतेपासून जर दूर केले गेले, तर खरोखर तुम्ही एक अर्थपूर्ण जीवन जगू शकाल का? खऱ्या अर्थाने तुम्ही वास्तविक जीवन जगू शकाल का? तुम्ही जीवन अनुभवू शकाल का? जीवन जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते जसे आहे तसे जाणून घेणे.-सद्गुरू जग्गी वासुदेव