शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

शब्दांमुळे आचार-विचारात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:21 IST

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते.

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलया कोय...जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय...

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते. प्रत्येकाचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक व द्वेषरहित असणे गरजेचे आहे. चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी सर्व मनुष्य प्राण्यात आढळतात. तथापी मानवी चक्षू हे फक्त दुसऱ्या व्यक्तीत कोणते अवगुण आहेत. याचाच शोध घेतात. उक्त दोह्यात संत कबीरांनी अंर्तमनाचा वेध घेताना सांगितले आहे की, वाईट बाबीचा शोध घेण्यासाठी गेलो तर मला कु णीही वाईट दिसले नाही. याउलट मी स्वताच्या मनाचा विचार केला तर त्यापेक्षा कू णीही वाईट नाही असे आढळुन आले. बहूतांश नात्यांमध्ये येत असलेला दुरावा हा एकमेकातील दोष व अवगुण याची होत असलेली वाच्यता यामुळे येत आहे. अवगुण दुर्लक्षित करुण सद्गुणांची स्विकृती केल्यासच प्रेम, माया, वृद्धींगत होत असते. रहीमांच्या दोह्यात ही गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित केली आहे. ते म्हणतात,

रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाये..टुटे से फिर ना जुटे, जुटे गाँठ परि जाये...

दैंनदिन जीवनात समाजात वावरत असताना शब्द आणि कृती विचारपुर्वक ठेवणे गरजेचे आहे. शब्दांची धार ही शस्त्रांच्या धारेपेक्षा तेज असते, म्हणुनच म्हटले आहे, शब्द हे शस्त्र आहे. त्याचा जपुन वापर करा. अपशब्द वापरामुळे महाभारत घडले हे जाणकार सांगतातच. प्रेमपुर्वक शब्द हे भविष्यातील मोठे संकट टाळू शकतात. शब्दांची फुकंर घालुन जखमा बऱ्या होत नाहीत. त्यांचा ठणका कमी होतो. असे व.पू. यांनी देखील म्हटंले आहे. एखाद्याची अगतिकता, दु:ख, आघात जर शब्दाने शिथील होत असतील तर सौहार्दपुर्वक वातावरणात आपण संवाद साधण्यास काय हरकत आहे.

प्रत्येकाकडे शब्दांची शक्ती अमर्याद  असुनही तिच्या वापराबाबत मात्र अनभिज्ञ आहोत. तसे पाहिल्यास जिभेद्वारे होणारे शब्दोच्चार हे धनरुपी असतातच. फक्त त्यात माधुर्य असणे गरजेचे. अन्यथा विपर्यास होण्यास वेळ लागणार नाही. शब्दाचे उगमस्थान हे मुलत: मनात, हदयात आहे. आणि त्यास चांगल्या बुद्धीची जोड असणे गरजेचे आहे. म्हणुन तुकोबा माऊली म्हणतात,

मनाचे संकल्प पावतिल सिद्धी...जरी राहो बुद्धी त्याचे पायी... 

चांगल्या विचारांचे उगम हे चांगल्या बुद्धीतच होतात. हे नव्याने सांगणे नको. मानवी मनाशी तर संवाद देहरुपाने चालु असतोच. शब्दामुळे विचार, आचार आणि आचरण बदलते. कळत नकळत शब्द हे संस्कार क रीत असतात. त्यावरुन व्यक्तीमत्व ठरत असते. मानवी नातेसंबध आणि शब्द यांची मोठी सांगड आहे. शब्दाना जसे वजन, किंमत आहे तशी धार देखील आहे. म्हणुन जाणकारांनी म्हटले आहे, शब्दांना आधार हवा, धार नको. शब्दांनी परिवार, नाती आणि समाज जोडला जातो. तसाच तोडला जातो. शब्दाची आणि मनाची कायम गट्टी जमलेली असते. विचार शब्द आणि कृती नैतिक व्हायला पाहिजे. तरच ते जीवनात समग्रतेशी एकरुप होऊ शकतात.

- भालचंद्र संगनवार

(लेखक लातूर येथे वरीष्ठ भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक