शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शब्दांमुळे आचार-विचारात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:21 IST

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते.

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलया कोय...जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय...

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते. प्रत्येकाचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक व द्वेषरहित असणे गरजेचे आहे. चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी सर्व मनुष्य प्राण्यात आढळतात. तथापी मानवी चक्षू हे फक्त दुसऱ्या व्यक्तीत कोणते अवगुण आहेत. याचाच शोध घेतात. उक्त दोह्यात संत कबीरांनी अंर्तमनाचा वेध घेताना सांगितले आहे की, वाईट बाबीचा शोध घेण्यासाठी गेलो तर मला कु णीही वाईट दिसले नाही. याउलट मी स्वताच्या मनाचा विचार केला तर त्यापेक्षा कू णीही वाईट नाही असे आढळुन आले. बहूतांश नात्यांमध्ये येत असलेला दुरावा हा एकमेकातील दोष व अवगुण याची होत असलेली वाच्यता यामुळे येत आहे. अवगुण दुर्लक्षित करुण सद्गुणांची स्विकृती केल्यासच प्रेम, माया, वृद्धींगत होत असते. रहीमांच्या दोह्यात ही गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित केली आहे. ते म्हणतात,

रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाये..टुटे से फिर ना जुटे, जुटे गाँठ परि जाये...

दैंनदिन जीवनात समाजात वावरत असताना शब्द आणि कृती विचारपुर्वक ठेवणे गरजेचे आहे. शब्दांची धार ही शस्त्रांच्या धारेपेक्षा तेज असते, म्हणुनच म्हटले आहे, शब्द हे शस्त्र आहे. त्याचा जपुन वापर करा. अपशब्द वापरामुळे महाभारत घडले हे जाणकार सांगतातच. प्रेमपुर्वक शब्द हे भविष्यातील मोठे संकट टाळू शकतात. शब्दांची फुकंर घालुन जखमा बऱ्या होत नाहीत. त्यांचा ठणका कमी होतो. असे व.पू. यांनी देखील म्हटंले आहे. एखाद्याची अगतिकता, दु:ख, आघात जर शब्दाने शिथील होत असतील तर सौहार्दपुर्वक वातावरणात आपण संवाद साधण्यास काय हरकत आहे.

प्रत्येकाकडे शब्दांची शक्ती अमर्याद  असुनही तिच्या वापराबाबत मात्र अनभिज्ञ आहोत. तसे पाहिल्यास जिभेद्वारे होणारे शब्दोच्चार हे धनरुपी असतातच. फक्त त्यात माधुर्य असणे गरजेचे. अन्यथा विपर्यास होण्यास वेळ लागणार नाही. शब्दाचे उगमस्थान हे मुलत: मनात, हदयात आहे. आणि त्यास चांगल्या बुद्धीची जोड असणे गरजेचे आहे. म्हणुन तुकोबा माऊली म्हणतात,

मनाचे संकल्प पावतिल सिद्धी...जरी राहो बुद्धी त्याचे पायी... 

चांगल्या विचारांचे उगम हे चांगल्या बुद्धीतच होतात. हे नव्याने सांगणे नको. मानवी मनाशी तर संवाद देहरुपाने चालु असतोच. शब्दामुळे विचार, आचार आणि आचरण बदलते. कळत नकळत शब्द हे संस्कार क रीत असतात. त्यावरुन व्यक्तीमत्व ठरत असते. मानवी नातेसंबध आणि शब्द यांची मोठी सांगड आहे. शब्दाना जसे वजन, किंमत आहे तशी धार देखील आहे. म्हणुन जाणकारांनी म्हटले आहे, शब्दांना आधार हवा, धार नको. शब्दांनी परिवार, नाती आणि समाज जोडला जातो. तसाच तोडला जातो. शब्दाची आणि मनाची कायम गट्टी जमलेली असते. विचार शब्द आणि कृती नैतिक व्हायला पाहिजे. तरच ते जीवनात समग्रतेशी एकरुप होऊ शकतात.

- भालचंद्र संगनवार

(लेखक लातूर येथे वरीष्ठ भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक