शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

भेटीचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:44 IST

माणसं अलीकडे माणसांना भेटतच नाहीत, असं कधी-कधी वाटतं. माणसांच्या गर्दीत माणूस माणसं शोधताना दिसतो. काय शोधतात? माणूसपण. मनन, चिंतन ...

माणसं अलीकडे माणसांना भेटतच नाहीत, असं कधी-कधी वाटतं. माणसांच्या गर्दीत माणूस माणसं शोधताना दिसतो. काय शोधतात? माणूसपण. मनन, चिंतन आणि आपलंपण, भौतिक शोध खूप झालेत, बोध हरपला असं वाटतं. अशी भेट दुर्मीळ झाली. भेट होत नाही, असंही नाही, पण त्यात ओढ नाही. भेटीत नजरेच्या धडका होतात. घातक शब्दांचा संघर्ष उभा राहतो. भेटीत संवाद नाही. जिव्हाळा नाही, आर्तता नाही. संस्कार व उद्बोधन नाही, आनंदाचे तरंग निर्माण होत नाही. म्हणून चक्रधर भेटीचं स्वरूप आपल्या सूत्रातून सांगतात.

‘‘भ्रमत भ्रमता भेटी: कां आपजौनिभेटी: एकमेका भेटलेया हे भेटलेयाचा पाडु जाए’’ या सूत्राचा केंद्रबिंदू ‘हे’ अक्षर महत्त्वाचं आहे. ‘हे’चा अर्थ परमेश्वर म्हणजे आनंद असा आहे. भेटीच्या मिलनात आनंद वाटला पाहिजे. उगीच भेटलो असं न म्हणता, बर भेटलो, असं म्हणता आलं पाहिजे. दोन चांगल्यांच्या भेटीत तो सोहळा जन्माला येतो. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या सहा विकारांचं प्रक्षेपण देहबोलीतून होत असतं. डोळ्यातून कामाचा संचार होतो, तेव्हा कामाला काम, क्रोधाला क्रोध, मदाला मद व मत्सराला मत्सर भिडतात व प्रेमाच्या संचाराने विकार निर्विकार होतात. मग ‘मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे’ असं वाटायला लागतं. चंद्र जवळ आला की, सागराच्या लाटा थयथय नाचायला लागतात. अशा स्वस्थचित्ताच्या लोकांनी सतत भ्रमण करावं, हाच धर्माचा खरा हेतू आहे. वारं फिरतं गवताची पेरणी होते. पाणी वाहतं प्राण्यांची तहान भागवतं. सज्जन फिरतात, विवेकाचं वाटप होतं. सज्जनांची भेट ही वेधाने बोधाची घेतलेली ही भेट आहे. ज्ञानाने विरक्तीला व विरक्तीने भक्तीला भेटावं, भेटल्याने दक्षता योग्यता वाढते.

- बा.भो. शास्त्री