शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भक्ती ही परब्रह्माचीच

By admin | Updated: August 29, 2016 16:18 IST

‘‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम’’ हे वारकरी संप्रदायाचे घोषवाकय आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस।’ अशी मांडणी आहे, परंतू संप्रदायाचा नकाश संत पुंडलिकाने तयार केला आहे.

- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा ‘‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम’’हे वारकरी संप्रदायाचे घोषवाकय आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस।’ अशी मांडणी आहे, परंतू संप्रदायाचा नकाश संत पुंडलिकाने तयार केला आहे. म्हणून घोषवाक्यामध्ये पुंडलिक अग्रस्थानी आहे. भक्तीच्या मांडणीमध्ये भक्ती ही परब्रह्माचीच केली जाते. त्यामध्ये निष्कामतेची भूमिका प्रमुख असून भक्ती जीवनाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मोक्षासाठी केली जाते. ‘पुढे भक्तिने धरिले हाती । मागे ज्ञान वैराम्य येती।’’ यावरच आध्यात्मिक विकास अवलंबून आहे. गीतेतील भगवान, ब्रह्मतत्व जे निर्गुण निराकार आहे त्याला सगुण साकार बनवून विठ्ठल रुपामध्ये उभे करण्याचे सर्वोच्च कार्य पुंडलिकाने केले आहे. यापेक्षा मोठे कार्य असून शकत नाही. संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात ‘‘नेणे ब्रह्म वाट चुकले । उघडे पंढरीसि आहेत।।भक्त पुंडलिके देखिले । उभे केले विटेवरी।। भक्तीमध्ये भ्रांत कल्पना शिरल्या होत्या. देहाला तुच्छ मानायचे, विश्वाला नाशिवंत समजायचे आणि कर्म बंधनकारक मानून कर्मत्याग, संन्यासाचा विचार करायचा. यामुळे गीतेचा कर्मयोग, स्वधर्म लोपला होता आणि समाज कामनायुक्त उपासनेत अनेक देवदेवतांमध्ये अडकला होता. पुंडलिकाने कर्माकडे आणि विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. त्याने आई - बापातच देव विराजमान आहे आणि आईबापाची सेवाच ईश्वराची सेवा आहे याची शिकवण प्रत्यक्ष अनुसरुन दाखविली. जो आईवडीलांच्या संदर्भात उदासीन असेल तो ईश्वर भक्तीच करु शकत नाही, असे ठाम सांगितले. समाजातील रुढी ग्रस्तता, निष्कर्मता आणि विश्वाकडे पाहण्याचा कोता दृष्टिकोन बदलविण्याचे मुख्य काम पुंडलिकाने केले. ‘‘महायोग पीठे तटे भीमरथ्या।वरं पुंडरीकाय दातूं मुनीद्रै: ।। आद्य शंकराचार्य पुंडलीकाला मुनी असे संबोधितात. मुख्य म्हणजे हे विश्व आणि सर्वसृष्टी ईश्वराचाच अविष्कार आहे. त्याकडे पाहण्याची भोगरपदृष्टी चांगली नाही तसेच भक्तीच्या नावाखाली या सृष्टीला तुच्छ मानणारी दृष्टीही चांगली नाही, तर या विश्वाकडे पूजनीय भावाने पाहिले पाहिजे असा श्रेष्ठ संदेश भक्त पुंडलिकाने जगासमोर ठेवला. मानवाला कामनायुक्त विचार सरणी कडून निष्काम परोपकारी विचार सरणीकडे प्रवृत्त केले. मानवी देह कर्मप्रधान असून कर्म अटळ आहे ते केलेच पाहिजे. त्यावरच स्वत:चे जीवन चालते. तसेच सृष्टिचक्राची सुरळीतता मानवाच्या कर्मावरच अवलंबून आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती आहे.