शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

जीवनविद्या : वसा संतकार्याचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:38 IST

पसायदानातून जगाच्या सुखासाठी भव्य व दिव्य प्रार्थना जन्माला आली.

 

अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक॥ 

या संताच्या महान कार्याचा झेंडा सदगुरू श्री वामनराव पै यांनी खांद्यावर घेतला व "हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थांने समृद्ध व्हावे व पुढे जावे" या संकल्पपुर्ती साठी जीवनविद्या मिशन या संस्थेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांच्या मनांत हा संकल्प रूजविला. 

सर्वे सुखिन् सन्तु, सर्वे सन्तु निरामय:  या भगवंताचा विचारसर्व सुखी, सर्व भूती, संपुर्ण होईजे या दिव्य संकल्पातून मानवी मनात परिवर्तनाचे बीजारोपण करण्यासाठी या विश्वात्मक देवाकडे आर्त मागणी केली. आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥तोषूनी मज द्यावे। पसायदान हे॥

या पसायदानातून जगाच्या सुखासाठी भव्य व दिव्य प्रार्थना जन्माला आली.

याच पसायदानाचे मनात सतत स्मरण राहावे व मानवी जीवन सुख, शांती व समृद्धीने भरून जावे, याच सदभावनेतून  "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. या विश्वशांतीसाठी निर्माण झालेल्या विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थनेतून मानवी मनामनांत सदगुरूंनी आनंदी व विधायक विचारांची बीजे बिंबवली व रूजविली. 

वेद उपनिषदांतील शुध्द ज्ञान भगवंताच्या भगवत् गीता या महान तत्वज्ञानाने जगात अ‍वतिर्ण झाली. हे दिव्य ज्ञान सर्व सामान्य मराठी जनतेला ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ रूपाने प्राकृतमध्ये दिले. हेच दिव्य असे ईश्वरी ज्ञान सर्व संतानी अभंगाच्या रूपाने साध्या सोप्या मराठी भाषेतून समाजापर्यंत पोहचविले. 

आज संगणकीय युगात या पाकृत ओव्या व पद्यातल्या अभंगातील गुढ व गुह्य आजच्या युगाला विशेषत: तरूणाईला कळावे, या तीव्र तळमळीने सदगुरू श्री वामनराव पै यांनी किर्तन व प्रवचनांतून संतांच्या वचनातील गुह्य साध्या सोप्या मराठमोळ्या भाषेत समाजापर्यंत पोहचवू लागले. लोकांना ती आवडू लागली. हे तत्वज्ञान मोठ्याप्रमाणात लोकांपर्यंत पोहचावे म्हणून लोकाग्रहास्तव त्यांनी ग्रंथ लेखन सुरू केले.

त्यातूनच ज्ञानेश्वरीचे सार असणारे महान ज्ञानामृत व नामामृत सर्वसामान्य जनताजनार्दनापर्यंत पोहचून मानवाचा उध्दार व्हावा, या शुध्द व पवित्र हेतूने अगाध ज्ञान देणारा ज्ञानेशांचा संदेश व नामाचा महिमा व सामर्थ्य मुक्त कंठाने गाणारा नामाचा नंदादीप हे ग्रंथ सदगुरू श्री वामनराव पै यांनी जनताजनार्दनाला समर्पित केले.

महान तत्वज्ञानांचा, महान संदेशांचा, महान संस्कृतीचा व अमृत विचारधनांचा हा समृद्ध, शाश्वत, कल्याणकारी दिव्य संतवारसा सदगुरू श्री वामनराव पै यांनी अंगिकारला व संतकार्याचा पाईक होऊन त्यांनी स्वत:चा देह चंदनासारखा झिजवून किर्तन, प्रवचन, व्याख्याने व ग्रंथरूपाने जगाला शांती सुखाचा राजमार्ग दिला.

-संतोष तोत्रे

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक