शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

अन्नदान ते उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 05:52 IST

आरोग्य बिघडवणारं अन्न सेवन तरी कसं करावं व दानही कसं करावं? दान केलं तरी ते उत्तम कसं असू शकेल? ...

आरोग्य बिघडवणारं अन्न सेवन तरी कसं करावं व दानही कसं करावं? दान केलं तरी ते उत्तम कसं असू शकेल? इंजेक्शन देऊन मोठं केलेलं टरबूज, पावडर टाकून पिकवलेली केळी व कलर दिलेले वाटाणे, आंबे, भेसळीचं तेल, निकस धान्य, केमिकलपासून तयार केलेलं दूध, फास्टफुड ढाब्याचं जेवण, हे उत्तम कसं? आज उत्तम अन्नदानच उत्तम असतं हे समजणं महत्त्वाचं आहे.

एका बाजूला अन्नाच्या अतिरेकाने अजिर्ण झाल्याने झोप नाही, दुसरीकडे पोटात अन्नाचा कण नाही म्हणून झोप येत नाही. आमच्या देशात कुपोषणाने मरणारे अनेक आहेत. अन्न वाया घालवणारे जास्त आहेत. अन्नाचं मोल कळावं म्हणूनच अन्नाला ‘अन्नब्रह्म’ म्हटलं आहे. स्वामी रस्त्याने चालत होते, हातात भिक्षा होती. भरधाव येणाऱ्या घोड्याचा धक्का लागला, अन्न जमिनीवर पडलं. स्वामींनी मातीवरचा एक एक कण उचलून घेतला. बा.भो. म्हणतात, तो मातीच्या कणाकणातून भिक्षेचे कण वेचत होता. कणाकणाने पूर्ण परंतु भक्तासाठी व्याकूळ होता. आपल्या परिवाराला स्वामी म्हणत, जेवढं अन्न लागेल तेवढंच मागत जा.

असं सांगतात, झोळी टाकल्यावर अन्नकण जमिनीवर पडले तेव्हा म्हणाले, ‘‘एैसे आणुआणु सांडावे ते काई तुमचे दाई’’ अन्नदात्याचं अन्न वाया घालवता ते तुमचे वैरी आहेत काय? शेजारचा उपाशी असेल तर तुम्हाला जेवणाचा अधिकार नाही ही महंमद पैगंबराने आपल्या अनुयायांना केलेली सूचना खरंच मोलाची आहे. गरज आहे तेथे उत्तम नक्कीच अन्नदान करा, पण फुकट मिळतं म्हणून कामचुकार व आळशी पोसू नका. गरजवंताने ते जरूर घ्यावं, पण आपल्यात बळ आल्यावर आपणही दान करावं, विंदांची कविता सुंदर आहे. ते म्हणतात,^‘‘देणाºयाने देत जावे, घेणाºयाने घेत जावे,कधी तरी घेणाºयाने देणाºयाचे हात घ्यावे’’बा.भो. शास्त्री