शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

अद्वैत साम्यभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 02:59 IST

अध्यात्माची सिद्धता ही आध्यात्मिक साम्यभावात भेद मावळणे आणि अभेदत्व उभे राहणे हेच भक्तिमार्गाचेही प्रयोजन ठरते. तर द्वैत सोडणे आणि अद्वैत मोडणे हे परमार्थाचेही प्रयोजन ठरते. भक्तीची अवस्था ही अद्वैती परमानंदी अशी आहे.

- डॉ. रामचंद्र देखणेअध्यात्माची सिद्धता ही आध्यात्मिक साम्यभावात भेद मावळणे आणि अभेदत्व उभे राहणे हेच भक्तिमार्गाचेही प्रयोजन ठरते. तर द्वैत सोडणे आणि अद्वैत मोडणे हे परमार्थाचेही प्रयोजन ठरते. भक्तीची अवस्था ही अद्वैती परमानंदी अशी आहे.हाचि परमानंद आलंगीन बाही।क्षेम देता ठायी द्वैत तुटे।।या परमानंदाला आपल्या बाहूंनी आलिंगन देतो आणि आलिंगन दिले की द्वैत नाहीसे होते. परमानंदी आलिंगन हे ब्रह्मभावाचे लक्षण ठरते. ज्ञानदेवांनी ब्रह्मभावाला गेलेल्या श्रेष्ठ भक्ताचे लक्षण सांगताना ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात म्हटले आहे,जो आत्मलाभासारिखे।गोमटे काहीचि न देखे।म्हणौनी भोग विशेखे।हरिखे जेना।। १२/१९०इथे ज्ञानदेवांनी आत्मलाभ हा शब्द ब्रह्मप्राप्ती या अर्थाने वापरला आहे. गीतेच्या बाराव्या अध्यायातील‘यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काडङ्क्षति।आणि सम: रात्रौ च नित्रेच’ या दोन श्लोकांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्य करताना ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यातील अनेक ओव्या या समभावाचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. प्रस्तुत ओवीतून ज्ञानदेव सांगतात की, ज्याला आत्मलाभ झाला आहे. ब्रह्मप्राप्ती झाली आहे, जो ब्रह्मरूपाने आपणच विश्व झाला आहे. ज्याचा जीव जीवातील, जीव जडातील, जीव ईश्वरातील आणि ईश्वर जडातील भेदभाव सहज गेलेला आहे. आणि ब्रह्मप्राप्तीमुळे जो अभेदरूपाने वावरतो आहे. तो ‘भोग विशेखे हरिखे जेना’ सामान्य भोगप्राप्तीने काय आनंदित होणार? तो विषय भोगाच्या केव्हाच पलीकडे गेलेला आहे. तो समत्वदर्शी झाले आहे. असा ब्रह्मभाव येण्यासाठी काही अवस्था आहेत. पहिली आहे द्वैतभाव, नंतर जीवऐक्यभाव, नंतर जीवशिव ऐक्यभाव आणि ब्रह्मभाव. सूर्याच्या ठिकाणी अंधार व दिवस हे दोन्ही जसे संभवत नाही. त्याप्रमाणे त्या भक्ताच्या ठिकाणी चांगल्या-वाईट कर्माचे किंवा भोगाचे संस्कार उमटत नाहीत. तो शुद्ध ज्ञानरूप होऊनच राहिला आहे. ज्ञानदेव अद्वैतभक्तिचाच पुरस्कार करतात. नव्हे तर तिलाच ज्ञानभक्ती असेही म्हणतात. योगमार्गाला भक्ती आणि भक्तिमार्गाला ज्ञान तर ज्ञान आणि योगमार्गाला पुन्हा भक्तीची जोड देऊन अध्यात्माला सामाजिकतेच्या अंगाने पुढे नेऊन अद्वैती साम्यभावच उभा करतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक