शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 11:22 IST

माणूस स्वत:ला पटकन् क्षमा करतो. इतरांच्या कृत्याची मात्र स्वत:जवळ नोंद ठेवतो. त्याचा हिशेब करण्याचा सदैव प्रयत्न करतो. परंतु, कुराणमधील अध्याय १७ च्या आयात

धर्मराज हल्लाळे

माणूस स्वत:ला पटकन् क्षमा करतो. इतरांच्या कृत्याची मात्र स्वत:जवळ नोंद ठेवतो. त्याचा हिशेब करण्याचा सदैव प्रयत्न करतो. परंतु, कुराणमधील अध्याय १७ च्या आयात १४ मध्ये जे लिहून ठेवले आहे, ते माणसाला दिशा देणारे आहे. माणसाने स्वत:च आपल्या कृत्याची नोंद वाचावी अन् स्वत:चा हिशेब करण्यासाठी तो स्वत:च पुरेसा असतो, असे त्यात म्हटले आहे. माणसाने संपूर्ण दिनचर्येचा हिशेब ठेवला पाहिजे. सकाळी उठल्यापासून तो निद्राधीन होईपर्यंत ज्या काही कृती करतो, त्याची नोंद आपल्या अवतीभोवतीची माणसे ठेवतात. समाज लक्ष ठेवतो. त्याहीपेक्षा स्वत:चे मन हे स्वत:च्या कृतीसाठी ग्वाही देत असते. चुकल्याक्षणी तू इथे चुकला आहेस, हे बजावले जाते. परंतु, मानवी वृत्ती त्याकडे हळुवारपणे दुर्लक्ष करते. स्वत:च्या चुकांवर एकप्रकारे आपण पांघरुण घालतो. आपल्याला कळते की, आपण चुकलो आहोत. मात्र वळत नाही. स्वत:ला दुरुस्त करण्याचीही तयारी नसते. लोभ, माया, अभिलाषा स्वस्त बसू देत नाही. जे स्वलाभाचे ते आणखी मिळावे. जे मिळते ते स्वत:लाच मिळावे, ही सामान्य प्रवृत्ती असते. खरे तर धर्म प्रार्थना ही मानव कल्याणाची असते. स्वत:ला सुखी ठेवण्याची धडपड करताना समाजाला अर्थात सर्वांना सुखी करण्याची प्रार्थना केली जाते. ती केवळ उक्तीपुरती असते. कदाचित उपचाराचा भाग बनलेली असते. प्रत्यक्ष कृती करताना मात्र स्वकल्याण, कुटुंबकल्याण यापलीकडे पाहण्याची वृत्ती जोपासली जात नाही. 

कुराणमधील आयातीत असे म्हटले आहे की, तुम्हीच तुमच्या कृत्याच्या नोंदी वाचा. तुम्ही स्वत: आत्मपरीक्षण करा. जिथे तुम्ही चुकला आहात तिथे तुम्ही आत्मटीका करा. अर्थात स्वत:चा हिशेब, स्वत:चे परीक्षण करण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही आवश्यकता नाही, ते तुम्हीच करा. हा हिशेब प्रामाणिकपणे केला तर आपणाला सद्मार्ग सापडेल. आपल्या चुका दिसतील, त्या दुरुस्त करण्याची संधी मिळेल. जो ही संधी मिळवितो, तोच स्वत:चे भले करतो. ज्यांना स्वत:चा हिशेब करायचा नाही, आपले वागणे, बोलणे बेहिशेबी ठेवायचे आहे, त्याच्या जीवनात अंधकार पसरल्याशिवाय राहत नाही. एकार्थाने पवित्र कुराणात जे म्हटले आहे, ते आपल्या जीवनात अंमलात आणले तरच कल्याण होईल. त्यासाठी प्रत्येक क्षणी आपल्याकडून घडणाऱ्या कृत्यांची नोंद ठेवा. ज्या नोंदी मानवी कल्याणाच्या आड येतात, त्या पुसून टाका. त्याची पुनरावृत्ती करू नका. हिशेबातून सद्गुणांची बेरीज व्हावी. दुर्गुणांची वजाबाकी व्हावी. आपले भलेबुरे आपल्याला कळत असते. त्याचा हिशेब ठेवला तर कोणते पारडे जड होत आहे, हेही कळते. चुकांच्या नोंदींचे पारडे जड होत असेल तर धोक्याची घंटा समजावी. त्याच क्षणी सद्मार्गाचा अवलंब करावा. त्यासाठी वृद्धापकाळाची प्रतीक्षा करणे उचित नाही. आपले हिशेबाचे खाते सद्गुणांनी परिपूर्ण करायचे असेल तर आजपासूनच सुरुवात करावी लागेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक