शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 11:22 IST

माणूस स्वत:ला पटकन् क्षमा करतो. इतरांच्या कृत्याची मात्र स्वत:जवळ नोंद ठेवतो. त्याचा हिशेब करण्याचा सदैव प्रयत्न करतो. परंतु, कुराणमधील अध्याय १७ च्या आयात

धर्मराज हल्लाळे

माणूस स्वत:ला पटकन् क्षमा करतो. इतरांच्या कृत्याची मात्र स्वत:जवळ नोंद ठेवतो. त्याचा हिशेब करण्याचा सदैव प्रयत्न करतो. परंतु, कुराणमधील अध्याय १७ च्या आयात १४ मध्ये जे लिहून ठेवले आहे, ते माणसाला दिशा देणारे आहे. माणसाने स्वत:च आपल्या कृत्याची नोंद वाचावी अन् स्वत:चा हिशेब करण्यासाठी तो स्वत:च पुरेसा असतो, असे त्यात म्हटले आहे. माणसाने संपूर्ण दिनचर्येचा हिशेब ठेवला पाहिजे. सकाळी उठल्यापासून तो निद्राधीन होईपर्यंत ज्या काही कृती करतो, त्याची नोंद आपल्या अवतीभोवतीची माणसे ठेवतात. समाज लक्ष ठेवतो. त्याहीपेक्षा स्वत:चे मन हे स्वत:च्या कृतीसाठी ग्वाही देत असते. चुकल्याक्षणी तू इथे चुकला आहेस, हे बजावले जाते. परंतु, मानवी वृत्ती त्याकडे हळुवारपणे दुर्लक्ष करते. स्वत:च्या चुकांवर एकप्रकारे आपण पांघरुण घालतो. आपल्याला कळते की, आपण चुकलो आहोत. मात्र वळत नाही. स्वत:ला दुरुस्त करण्याचीही तयारी नसते. लोभ, माया, अभिलाषा स्वस्त बसू देत नाही. जे स्वलाभाचे ते आणखी मिळावे. जे मिळते ते स्वत:लाच मिळावे, ही सामान्य प्रवृत्ती असते. खरे तर धर्म प्रार्थना ही मानव कल्याणाची असते. स्वत:ला सुखी ठेवण्याची धडपड करताना समाजाला अर्थात सर्वांना सुखी करण्याची प्रार्थना केली जाते. ती केवळ उक्तीपुरती असते. कदाचित उपचाराचा भाग बनलेली असते. प्रत्यक्ष कृती करताना मात्र स्वकल्याण, कुटुंबकल्याण यापलीकडे पाहण्याची वृत्ती जोपासली जात नाही. 

कुराणमधील आयातीत असे म्हटले आहे की, तुम्हीच तुमच्या कृत्याच्या नोंदी वाचा. तुम्ही स्वत: आत्मपरीक्षण करा. जिथे तुम्ही चुकला आहात तिथे तुम्ही आत्मटीका करा. अर्थात स्वत:चा हिशेब, स्वत:चे परीक्षण करण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही आवश्यकता नाही, ते तुम्हीच करा. हा हिशेब प्रामाणिकपणे केला तर आपणाला सद्मार्ग सापडेल. आपल्या चुका दिसतील, त्या दुरुस्त करण्याची संधी मिळेल. जो ही संधी मिळवितो, तोच स्वत:चे भले करतो. ज्यांना स्वत:चा हिशेब करायचा नाही, आपले वागणे, बोलणे बेहिशेबी ठेवायचे आहे, त्याच्या जीवनात अंधकार पसरल्याशिवाय राहत नाही. एकार्थाने पवित्र कुराणात जे म्हटले आहे, ते आपल्या जीवनात अंमलात आणले तरच कल्याण होईल. त्यासाठी प्रत्येक क्षणी आपल्याकडून घडणाऱ्या कृत्यांची नोंद ठेवा. ज्या नोंदी मानवी कल्याणाच्या आड येतात, त्या पुसून टाका. त्याची पुनरावृत्ती करू नका. हिशेबातून सद्गुणांची बेरीज व्हावी. दुर्गुणांची वजाबाकी व्हावी. आपले भलेबुरे आपल्याला कळत असते. त्याचा हिशेब ठेवला तर कोणते पारडे जड होत आहे, हेही कळते. चुकांच्या नोंदींचे पारडे जड होत असेल तर धोक्याची घंटा समजावी. त्याच क्षणी सद्मार्गाचा अवलंब करावा. त्यासाठी वृद्धापकाळाची प्रतीक्षा करणे उचित नाही. आपले हिशेबाचे खाते सद्गुणांनी परिपूर्ण करायचे असेल तर आजपासूनच सुरुवात करावी लागेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक