राज्यभरात दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 17:19 IST2017-08-20T17:13:18+5:302017-08-20T17:19:19+5:30

गेल्या २४ तासांत झालेल्या धुव्वाधार पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळ वाहूनच गेला आहे. वरुणराजाच्या या कृपेमुळे बळीराजा सुखावला आहे

अनेक भागांत पावसाची संततधार सुरु आहे. राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले

धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसत असल्याने उपयुक्त पाणी साठ्यात वाढ होत आहे.

अतिवृष्टीचा वेधशाळेचा इशारा खोटा ठरतोय की काय, असे वाटत असतानाच शनिवारी रात्री पासून पावसाला सुरुवात झाली

विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यालाही पावसाने दिलासा दिला आहे. तसंच, नगरमध्येही पावसाची संततधार सुरू आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ७७ दिवसांपैकी केवळ २९ दिवसच पाऊस झाल्यानं मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग दाटून आले होते.