शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

झेडपी शाळेत विद्यार्थ्यांची फरफट

By admin | Updated: September 4, 2016 00:54 IST

वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या शाळांना भरभराटीचे दिवस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रिक्त पदे : अशैक्षणिक कामांचा विद्यार्थ्यांवर पडतोय ताणअविनाश खंदारे उमरखेडवेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या शाळांना भरभराटीचे दिवस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गुणवत्ता असूनही तालुक्यातील शाळांमध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे केंद्र म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. या ठिकाणी शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर पोहोचले आहे. जुन्या पिढीतील अनेक शिस्तीच्या शिक्षकांनी मोठमोठे अधिकारी ग्रामीण भागातून राज्याला दिले आहेत. परंतु उमरखेड तालुक्यातील सध्याची परिस्थिती बघता काही मोजके शिक्षकच असा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. इतर शिक्षक केवळ पगारापुरते हजेरीपटावर स्वाक्षरी मारून मोकळे होत आहे. इंग्रजी माध्यमाचे भूतही या शाळांच्या मानगुटीवर बसले आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवण्यासाठी आटापिटा करीत आहे. गावागावांत कॉन्व्हेंट संस्कृती रुजू लागली आहे. टाय, बूट घातलेले विद्यार्थी आता खेड्यातही दिसू लागले आहे. ही बाब चांगली असली तरी या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे पालकांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसत आहे. याच गोष्टी देण्याची क्षमता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरला आहे. शाळांचे मुख्य उद्दिष्ट वाचन आणि लेखन असताना शासनाला नियमित अध्यापनासोबत त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांनाही शाळाबाह्य कामांचे ओझे पेलवत नाही. अनेक शिक्षक दैनंदिन अध्यापन कामाव्यतिरिक्त इतर कामांमध्येच व्यस्त दिसत आहेत. अपुरी शिक्षक संख्याही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मारक ठरत आहे. जिल्हा परिषद शाळांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू शकतात. मात्र त्यासाठी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष शिक्षकांमध्येही एकवाक्यता आणि संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे योग्य नियोजन आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे बनले आहे. इंग्रजी शाळेच्या तोडीचा अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती असल्यास कोणताही पालक अधिक पैसे खर्च करून खासगी शाळांकडे धाव घेणार नाही. जिल्हा परिषद शाळांना ऊर्जीतावस्था यावयाची असेल तर शिक्षकांमध्ये समर्पणाची भावना असणे आवश्यक आहे. तेव्हाच विद्यार्थी व पालक पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांकडे वळण्यास बाध्य होतील. जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा सोन्याचे दिवस येण्यासाठी सध्या कार्यरत शाळा व्यवस्थापन समित्यांनी अधिक दक्ष होण्याची गरज आहे.