शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी लगीनघाई

By admin | Updated: December 29, 2016 00:21 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी लगनीघाई सुरू केली आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी लगनीघाई सुरू केली आहे. मात्र अंतर्गत दुहीमुळे काही पक्षांसमोर संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करून सत्तेचा सोपान चढण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर सत्ता प्राप्तीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले. जिल्हा परिषदेतूनच राज्याला अनेक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली. मात्र काही पक्षांतील दुही यात अडथळा ठरत आहे. अपवाद वगळता आजपर्यंत येथील जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. तथापि गेल्यावेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी काँग्रेसला झटका दिल्याने अडीच वर्षे शिवसेनेला सत्तेची चव चाखता आली होती. फेब्रुवारीत होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी नव्या दमाने मोर्चेबांधणी चालविली आहे. काँग्रेसने जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून थेट जनतेत मिसळून केंद्र व राज्य शासन कुचकामी असल्याचे मतदारांच्या लक्षात आणून देण्याचा खटाटोप चालविला. मात्र नवीन जिल्हाध्यक्षांची निवड आधी करावी, या मागणीने आता ही यात्राच वांद्यात सापडली आहे. भाजपाने त्यांच्या ताब्यातील विधानसभा मतदार संघात विकास कामांच्या भूमिपूजनांचा सपाटा सुरू केला. लहान-सहान कामांचेही दिमाखदार भूमिपूजन सुरू झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री व राज्य शासनात ऊर्जा, उद्योग आदी विभागांचे राज्यमंत्री पद असल्याने हा पक्ष ताकदवान झाला. त्याचा लाभ घेत भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. इतर पक्षांतील काठावरील इच्छुकांना जाळ्यात ओढण्याचे सत्र भाजपाने सुरू केले आहे. शिवसेनेनेही तालुकास्तरावर इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू केले. पालकमंत्री पद असल्याने शिवसेनाही यावेळी मोठ्या जोमाने निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक घेऊन निवडणुकीचा बिगुल फुंकला खरा, मात्र या पक्षात खदखद सुरू आहे. काही माजी पदाधिकारी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहे. सर्वच पक्षांसमोर कमी अधिक प्रमाणात पक्षांतर्गत वादाची समस्या आहे. त्यातून मार्ग काढून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर वर्चस्व प्राप्त करण्यात त्यांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.(शहर प्रतिनिधी) एमआयएम निवडणूक लढणार काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, बसपा, आरपीआयसुद्धा या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी एमआयएम पक्षाला भरीव यश मिळाले. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये एमआयएमचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक रंगतदार होईल.