शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

सिरियातील संहाराविरुद्ध यवतमाळात जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:12 IST

हुकूमशाही लादण्यासाठी सिरियात निष्पाप नागरिकांचा नरसंहार होत आहे. भारताने या प्रकाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात कठोर भूमिका घेण्याची मागणी करीत येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी आक्रोश केला.

ठळक मुद्देकठोर भूमिका घ्या : मुस्लिम बांधवांचे साकडे

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : हुकूमशाही लादण्यासाठी सिरियात निष्पाप नागरिकांचा नरसंहार होत आहे. भारताने या प्रकाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात कठोर भूमिका घेण्याची मागणी करीत येथे मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी आक्रोश केला. सिरियातील अत्याचारांचा भारताने निषेध नोंदविण्यासाठी मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. स्थानिक कळंब चौकातून निघालेला मोर्चा तिरंगा चौकात पोहोचल्यावर जाहीर सभा झाली. गत काही महिन्यांपासून सिरियामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बशरूल हसद हा राज्यकर्ता रशिया आणि इस्राईल या देशांच्या मदतीने सिरियामध्ये हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या बाबीला सिरियातील नागरिकांनी विरोध केला आहे. यामुळे सिरियावर बॉम्ब हल्ले करण्यात आले. हा भूभाग ओस पडला आहे. हजारो नागरिकांचा जीव गेला. त्यांची संपत्ती नष्ट झाली.सिरियामध्ये मानव अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. महिला आणि बालकांची हत्या झाली आहे. या परिस्थितीकडे जगातले बलाढ्य देश केवळ बघ्याची भूमिका घेऊन पाहात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.इस्राईलने नुकतीच ग्रेटर इस्राईल या देशाची संकल्पना मांडली. या संकल्पनेतून येरूसलेमला राजधानी म्हणून घोषणा केली. या घटनेचा भारताने निषेध नोंदविला आहे. त्याचप्रमाणे सिरियाच्या नरसंहाराविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रसंघाकडे निषेध नोंदवावा. तेथील नागरिकांवरील हल्ले थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावी. कॅनडा, तुर्कीप्रमाणे भारतात सिरियाच्या नागरिकांना आश्रय देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अ‍ॅड. इमरान देशमुख, अ‍ॅड. मीन मुख्तान अहेमद, रियाझ लोहाना, फशिष खान, निजामुद्दीन काझी यांनी निवेदन सादर केले.