शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
4
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
5
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
7
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
8
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
11
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
12
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
13
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
14
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
15
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
17
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
18
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
19
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
20
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका

बाबासाहेबांची यवतमाळातील जयंती महाराष्ट्रात प्रसिद्ध

By admin | Updated: April 14, 2017 02:48 IST

बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवणींना उजाळाअविनाश साबापुरे यवतमाळ बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे. अख्ख्या महाराष्ट्रात यवतमाळची जयंती प्रसिद्ध होती. कारण इथला कार्यक्रमच तसा शिस्तबद्ध होता. हत्ती, घोड्यांवरून मिरवणूक निघायची. समोर लेझीम पथक, बैलबंडी आणि संपूर्ण मिरवणुकीला संरक्षण असायचे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचे... ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टेंभुर्णे सांगत होते, परिवर्तनाच्या विचारांनी भारलेल्या काळाच्या आठवणी!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’शी ते बातचित करीत होते. रवींद्र टेंभुर्णे यांचे वडील बालाराम टेंभुर्णे हे तत्कालीन समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अन् बाबासाहेबांचे निष्ठावंत पाईक. तेथपासून म्हणजे १९३६ च्या काळापासून या आठवणींचा पट उलगडत गेला. कव्वाली, कलापथके, जलसे यांचाही जयंती उत्सवात समावेश असायचा. सासुरवाशीण मुलींना कोणीही दिवाळीत माहेरी आणण्याऐवजी बाबासाहेबांच्या जयंतीला आणत होते. आज काही गोष्टी मागे पडल्या. मिरवणुकीत जल्लोष जरूर करावा, मात्र डीजे लावून नुसतेच नाचणे म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन नव्हे, असे ठाम मत रवींद्र टेंभुर्णे यांनी व्यक्त केले. कोलाहल माजेल, शिस्त बिघडेल, असे वर्तन टाळावे. आंबेडकरी तरुणांनी १८ तास अभ्यास करूनच महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन टेंभुर्णे यांनी केले. अन्न स्वाहा करणारा यज्ञ उधळलाबाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते तेव्हा कोणत्याही गैरप्रकाराला कसा कडाडून विरोध करायचे, याची एक आठवण रवींद्र टेंभुर्णे सांगतात. १९६९ च्या सुमाराची ही गोष्ट. यवतमाळात दुष्काळाची स्थिती होती. अशात काही मंडळींनी आझाद मैदानात यज्ञ आयोजित करून तुप, तेल, धान्य त्यात स्वाहा करण्याचा घाट घातला होता. शंकराचार्य येणार होते. आम्ही दलित पँथर, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तुम्ही यज्ञ जरून करा, पण एवढे अन्न वाया घालवू नका, असा हट्ट धरला. शेवटी तो यज्ञच बारगळला. सोशल मीडियातील वाद टाळाआजही समाजातून अंधश्रद्धा संपलेली नाही. कट्टर धार्मिकवाद, जातीवाद नष्ट करून समतेच्या मूलतत्त्वाचा प्रसार झाला पाहिजे. समाज माध्यमांवर आज महापुरुषांविषयी खूप उलटसुलट माहिती बघायला मिळते. मात्र समाज माध्यमांवर संयम बाळगावा. मोबाईलवर वाद करण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असे आवाहन रवींद्र टेंभुर्णे यांनी केले.आंबेडकर आखाडा यवतमाळची ओळखयवतमाळच्या पाटीपुऱ्यात डॉ. आंबेडकर आखाडा १९३६ मध्ये निर्माण करण्यात आला. साधारण ३०० महिला-पुरुष तेथे लाठीकाठीचे प्रशिक्षण घ्यायचे. महादेव मेश्राम, सदाशिव भागवत, प्रभाकर टेंभुर्णे, बालाराम टेंभुर्णे या आखाड्याचे वस्ताद होते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तेव्हा या आखाड्याचा खास सहभाग असायचा. रेतीची गाडी छातीवरून चालवणे, अणकूचीदार खिळ्यावर झोपून छातीवर घणाने दगड फोडणे, डोळ्यांच्या कडांनी गज वाकवणे असे साहसी प्रकार सादर केले जाई. कबड्डी आणि कुस्तीच्या स्पर्धा तर रोमांचक व्हायच्या. पहेलवानांना एक रूमाल आणि एक नारळ भेट दिला जाई. पाटीपुरा सर्वात शिक्षित वस्तीजिल्ह्यात सर्वाधिक पदवीधरांची वस्ती म्हणून यवतमाळातील पाटीपुऱ्याची गणना झाली होती. नगरपरिषदेने केलेल्या एका सर्वेतून ही बाब समोर आली होती. भले ही वस्ती बकाल असेल पण बाबासाहेबांच्या प्रेरणेने इथले अनेक जण उच्च शिक्षित झाल्याचा आनंद टेंभुर्णे यांनी व्यक्त केला. जुन्या काळात हा भाग जिल्ह्यातील क्रांतिस्थळ होता. ‘दिलदार माणसांची दिलदार वस्ती आहे’ या कवितेतून टेंभुर्णे यांनी पाटीपुराबाबतच्या भावना सांगितल्या.