शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

बाबासाहेबांची यवतमाळातील जयंती महाराष्ट्रात प्रसिद्ध

By admin | Updated: April 14, 2017 02:48 IST

बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवणींना उजाळाअविनाश साबापुरे यवतमाळ बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे. अख्ख्या महाराष्ट्रात यवतमाळची जयंती प्रसिद्ध होती. कारण इथला कार्यक्रमच तसा शिस्तबद्ध होता. हत्ती, घोड्यांवरून मिरवणूक निघायची. समोर लेझीम पथक, बैलबंडी आणि संपूर्ण मिरवणुकीला संरक्षण असायचे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचे... ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टेंभुर्णे सांगत होते, परिवर्तनाच्या विचारांनी भारलेल्या काळाच्या आठवणी!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’शी ते बातचित करीत होते. रवींद्र टेंभुर्णे यांचे वडील बालाराम टेंभुर्णे हे तत्कालीन समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अन् बाबासाहेबांचे निष्ठावंत पाईक. तेथपासून म्हणजे १९३६ च्या काळापासून या आठवणींचा पट उलगडत गेला. कव्वाली, कलापथके, जलसे यांचाही जयंती उत्सवात समावेश असायचा. सासुरवाशीण मुलींना कोणीही दिवाळीत माहेरी आणण्याऐवजी बाबासाहेबांच्या जयंतीला आणत होते. आज काही गोष्टी मागे पडल्या. मिरवणुकीत जल्लोष जरूर करावा, मात्र डीजे लावून नुसतेच नाचणे म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन नव्हे, असे ठाम मत रवींद्र टेंभुर्णे यांनी व्यक्त केले. कोलाहल माजेल, शिस्त बिघडेल, असे वर्तन टाळावे. आंबेडकरी तरुणांनी १८ तास अभ्यास करूनच महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन टेंभुर्णे यांनी केले. अन्न स्वाहा करणारा यज्ञ उधळलाबाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते तेव्हा कोणत्याही गैरप्रकाराला कसा कडाडून विरोध करायचे, याची एक आठवण रवींद्र टेंभुर्णे सांगतात. १९६९ च्या सुमाराची ही गोष्ट. यवतमाळात दुष्काळाची स्थिती होती. अशात काही मंडळींनी आझाद मैदानात यज्ञ आयोजित करून तुप, तेल, धान्य त्यात स्वाहा करण्याचा घाट घातला होता. शंकराचार्य येणार होते. आम्ही दलित पँथर, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तुम्ही यज्ञ जरून करा, पण एवढे अन्न वाया घालवू नका, असा हट्ट धरला. शेवटी तो यज्ञच बारगळला. सोशल मीडियातील वाद टाळाआजही समाजातून अंधश्रद्धा संपलेली नाही. कट्टर धार्मिकवाद, जातीवाद नष्ट करून समतेच्या मूलतत्त्वाचा प्रसार झाला पाहिजे. समाज माध्यमांवर आज महापुरुषांविषयी खूप उलटसुलट माहिती बघायला मिळते. मात्र समाज माध्यमांवर संयम बाळगावा. मोबाईलवर वाद करण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असे आवाहन रवींद्र टेंभुर्णे यांनी केले.आंबेडकर आखाडा यवतमाळची ओळखयवतमाळच्या पाटीपुऱ्यात डॉ. आंबेडकर आखाडा १९३६ मध्ये निर्माण करण्यात आला. साधारण ३०० महिला-पुरुष तेथे लाठीकाठीचे प्रशिक्षण घ्यायचे. महादेव मेश्राम, सदाशिव भागवत, प्रभाकर टेंभुर्णे, बालाराम टेंभुर्णे या आखाड्याचे वस्ताद होते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तेव्हा या आखाड्याचा खास सहभाग असायचा. रेतीची गाडी छातीवरून चालवणे, अणकूचीदार खिळ्यावर झोपून छातीवर घणाने दगड फोडणे, डोळ्यांच्या कडांनी गज वाकवणे असे साहसी प्रकार सादर केले जाई. कबड्डी आणि कुस्तीच्या स्पर्धा तर रोमांचक व्हायच्या. पहेलवानांना एक रूमाल आणि एक नारळ भेट दिला जाई. पाटीपुरा सर्वात शिक्षित वस्तीजिल्ह्यात सर्वाधिक पदवीधरांची वस्ती म्हणून यवतमाळातील पाटीपुऱ्याची गणना झाली होती. नगरपरिषदेने केलेल्या एका सर्वेतून ही बाब समोर आली होती. भले ही वस्ती बकाल असेल पण बाबासाहेबांच्या प्रेरणेने इथले अनेक जण उच्च शिक्षित झाल्याचा आनंद टेंभुर्णे यांनी व्यक्त केला. जुन्या काळात हा भाग जिल्ह्यातील क्रांतिस्थळ होता. ‘दिलदार माणसांची दिलदार वस्ती आहे’ या कवितेतून टेंभुर्णे यांनी पाटीपुराबाबतच्या भावना सांगितल्या.