शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

यवतमाळ शहरात आज झाडू लागलाच नाही

By admin | Updated: November 15, 2014 02:09 IST

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेने कंत्राटदारावर सोपविली आहे. २००२ पासून कंत्राटी सफाई कामगार शहराच्या आरोग्यसाठी अल्प वेतनात राबत आहेत.

यवतमाळ : शहरातील स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेने कंत्राटदारावर सोपविली आहे. २००२ पासून कंत्राटी सफाई कामगार शहराच्या आरोग्यसाठी अल्प वेतनात राबत आहेत. त्यांना असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या कायदेशीर सवलती कधीच पुरविण्यात आल्या नाही. महिन्याला वेळेवर वेतनही दिले जात नाही. अखेर या जाचाला कंटाळून कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले त्यामुळे शहराला झाडूच लागला नाही. शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषद वर्षाकाठी खासगी कंत्राटदाराला कंत्राट देते. नगर पालिकेने कंत्राटदाराशी करार करताना किमान वेतन आणि कामगारांसाठी असलेल्या शिफारसी प्रमाणे सोयी सुविधा देण्याची हमी कंत्राटदाराकडून घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र कंत्राटी तत्वावर राबणाऱ्या २५० कामगारांची सातत्याने बोळवण केली जात आहे. या कामगारांना अल्पवेतन आणि भविष्य निर्वाह निधीबाबत कुठलीही हमी देण्यात आलेली नाही. आतापर्यंत चार कंत्राटदारांनी शहर सफाईचे कंत्राट घेतले. यापैकी एकाही कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी कधीच जमा केला नाही. याची वारंवार सूचना नगर परिषद प्रशासनाला करूनही त्यांच्याकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. तुम्ही ठेकेदाराचे कामगार आहात त्याच्याकडेच दाद मागा, पालिकेशी काहीही देणेघेणे नाही अशा शब्दात सुनावून या कामगारांना परत पाठविले जाते. सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आज अखेर असंघटीत कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदाराने एक वर्षापासून वेतनातील वाढीव रक्कमही दिलेली नाही. ६०० रुपये प्रति महिना या प्रमाणे वाढीव वेतनाची रक्कम कामगारांना घ्यायची आहे. मात्र असंघटीत असलेल्या कामगारांच्या मागण्यांकडे कुणीही फारसे लक्ष्य देण्याच्या मानसिकतेत नाही. जिल्हा कामगार अधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्यांनी या कामगारांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाही. त्यामुळे कंत्राटी सफाई कामगारांनी वेठबिगारीचे जिने जगण्याची वेळ आली आहे. आरोग्यास धोकादायक असलेल्या स्थितीतही हे कामगार आपली जबाबदारी पूर्ण करतात. याउलट त्यांना किमान वेतनही मिळत नाही, याशिवाय कामासाठी पूरविली जाणारी आवश्यक संसाधणे कंत्राटदार देत नाही. त्यामुळे घाणीपासून संसर्ग होऊन असाध्य रोग जडण्याची भिती वाढली आहे. कामगारांच्या आंदोलनामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ कचरा गोळा झाला नाही. दत्त चौक, स्टेट बँक चौक, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बसस्थानक चौक परिसर येथे कचरा साचलेला आढळून आला. या अकस्मात स्थितीसाठी नगर परिषदेने नियमित असलेल्या १७५ सफाई कामगारांना कामाला लावले आहे. त्यामुळे या आंदोलनाची तितकी तिव्रता जाणवली नाही. मात्र असाच संप सुरू राहिल्यास शहरात घाणीचे ढिगारे लागल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)