शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जलस्वराज्यतून यवतमाळ बाद

By admin | Updated: June 4, 2014 00:21 IST

गावागावात तीव्र पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा केला जात असतानाही यवतमाळ जिल्ह्याला जलस्वराज्य टप्पा - २ प्रकल्पातून वगळण्यात आले. केंद्र शासनाच्या योजनेतून बाद झालेला जिल्हा हे जिल्ह्यातील

पाणीटंचाई कायम : राजकीय-प्रशासकीय अपयशाचा फटका यवतमाळ : गावागावात तीव्र पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा केला जात असतानाही यवतमाळ जिल्ह्याला जलस्वराज्य टप्पा - २ प्रकल्पातून वगळण्यात आले. केंद्र शासनाच्या योजनेतून बाद झालेला जिल्हा हे जिल्ह्यातील राजकीय नेते आणि प्रशासनाचे अपयश मानले जात आहे. जलस्वराज्यच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु त्यात पाणीटंचाई असलेल्या संपूर्ण गावांचा समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना जलस्वराज्य टप्पा - २ ची प्रतीक्षा होती. अखेर या दुसर्‍या टप्प्याला शासनाने मंजुरी दिली. परंतु या टप्प्यातून यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये राजगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने होणारा टँकरने पाणीपुरवठा आणि ५00 पेक्षा कमी लोकसंख्येचे गाव हा प्रमुख निकष ठेवला गेला आहे. या निकषात बसणारी यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावे, तांडे, वाड्या, वस्त्या आहेत. परंतु त्यानंतरही यवतमाळ जिल्ह्याचा प्रकल्पात समावेश करण्यात न आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये दरवर्षीच पाणीटंचाई निर्माण होते. या गावांचा कृती आराखड्यांमध्ये समावेश करून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी जिल्ह्यात २८८ गावात संभाव्य पाणीटंचाई उद्भवणार असल्याचे कृती आराखड्यात नमूद करण्यात आले. कित्येक गावात पाण्याचे स्रोत नाही, कुठे असले तर ते फ्लोराईडमुळे दूषित आहेत. नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागते. रखरखत्या उन्हात टँकरची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी, शेतमजूर व गोरगरिबांचा रोजगार बुडतो. पाणीटंचाईबाबत यवतमाळ जिल्ह्यात भीषण स्थिती असतानाही जलस्वराज्य प्रकल्पातून वगळण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. याबाबत जिल्ह्यातील मंत्री-आमदारांना जाब विचारण्याची तयारी विविध संघटना व नागरिकांनी केली आहे. जलस्वराज्य टप्पा - २ मध्ये समाविष्ठ गावांना १६ जूनपर्यंत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव मागितले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)