शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

जिल्ह्यातील वकिलांचे लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

वकिलाविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील वकिलांनी गुरुवारी लेखणीबंद आंदोलन केले. यामुळे जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज प्रभावित झाले होते.

एसपींना निवेदन : गुन्हा मागे घेण्याची मागणीयवतमाळ : वकिलाविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील वकिलांनी गुरुवारी लेखणीबंद आंदोलन केले. यामुळे जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज प्रभावित झाले होते. जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. नेर तालुका बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. लतिफ आर.मिर्झा पांढरकवडा येथे न्यायालयात प्रकरण चालविण्यासाठी गेले होते. त्यावेळी न्यायालय परिसरात लोकांनी जमाव करून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याविरुद्ध एका महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनने गुरुवारी एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश चव्हाण, अ‍ॅड. सलीम शाह, अ‍ॅड. मिनाजोद्दीन मलनस, अ‍ॅड. साहील पठाण, अ‍ॅड. इम्रान देशमुख, अ‍ॅड. सय्यद अली, अ‍ॅड. मुन्ना ठाकरे, अ‍ॅड. एम.व्ही. भगत यांच्यासह अनेक विधिज्ञ उपस्थित होते. तसेच बाभूळगाव येथेही वकिलांनी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनात अ‍ॅड. जी.व्ही.कडुकार, अ‍ॅड. रणजित रंगारी, अ‍ॅड. सतीश ठाकरे, अ‍ॅड. हजारे, अ‍ॅड. पोलादे, अ‍ॅड. रोशनी वानोडे, अ‍ॅड. सतीश गावंडे, अ‍ॅड. वानखडे, अ‍ॅड.एस.आर. गुल्हाने आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)