शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
4
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
5
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
6
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
7
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
8
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
9
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
11
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
13
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
14
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
15
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
16
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
17
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
18
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
19
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
20
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

महिलांनी ठोकले नगरपरिषदेला कुलूप

By admin | Updated: June 26, 2014 00:03 IST

आठवडाभरापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना पाणी देण्यास आर्णी नगरपरिषद अपयशी ठरल्यानंतर बुधवारी संतप्त महिलांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत चक्क नगरपरिषदेलाच कुलूप ठोकले.

आर्णी : पाणीपुरवठा बंद असल्याने संतापआर्णी : आठवडाभरापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना पाणी देण्यास आर्णी नगरपरिषद अपयशी ठरल्यानंतर बुधवारी संतप्त महिलांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत चक्क नगरपरिषदेलाच कुलूप ठोकले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या संतापाचे रूपांतर रास्ता रोको आंदोलनात झाले. शहरातील गांधीनगर या भागात गेल्या आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. नगरपरिषदेच्यावतीने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना होत नसल्यामुळे येथील महिलांना पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या एक आठवड्यापासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची ही समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे येथील महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली. यावेळी नगरपरिषदेच्या कार्यालयात महिलांच्या समस्या ऐकून घ्यायला कुणीच नव्हते. त्यामुळे महिलांच्या संतापात अधिकच भर पडली. अखेर आपल्या न्याय मागण्यांसाठी संतप्त महिलांनी नगरपरिषदेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून नगरपरिषद समोरच्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला. दरम्यान, महिलांनी आंदोलन केल्याचे समजताच नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आरिज बेग, नगरसेवक छोटू देशमुख, शेखर लोळगे, विशाल ठाकरे, रमेश ठाकरे, गणेश हिरोळे घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्त्या महिलांच्या समस्या उपाध्यक्ष आरिज बेग यांनी ऐकून घेतल्यानंतर आज सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)