गंभीर समस्या : दोन दिवसात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासनयवतमाळ : झरी जामणी तालुुक्यातील सुर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अनंतपूर गट ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांना सादर केले. अनंतपूरमध्ये एक हातपंप आहे. पाणी पातळी खोल गेल्याने हा पंप बंद पडला आहे. या गावातील नळयोजना बंद पडली आहे. या ठिकाणी एक सार्वजनिक विहीर आहे. मात्र या विहिरीचे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी महिलांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन दिवसात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक खुलसंगे, अरुणाबाई धोबे, संध्या आसवले, संगीता काकडे, कलावती गोरे, सुलभा डोंगरकर, सखुबाई काकडे, संगीता धोबे, रेखा पाचभाई, शुभांगी धोबे, प्रभा आसवले, ज्योती सातपुते, मनीषा डोहे, शांता काकडे, छाया पारखी, रूखमाबाई मेश्राम, बहिनाबाई मेश्राम, विनोद धोबे, अण्णा आसवले, गणेश धोबे, किसन धोेबे, नामदेव मेश्राम, मारूती डोहे, बापूजी टेकाम, संतोष लालसटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
अनंतपूरच्या महिलांची पाण्यासाठी धडक
By admin | Updated: May 19, 2016 02:06 IST