शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

मंजुरी न घेताच शौचालयांचे काम सुरू

By admin | Updated: January 9, 2016 02:57 IST

शहरी भागातील अस्वच्छता कमी करण्यासाठी नगरपरिषदेमार्फत अभियान राबविण्यात येत आहे.

नगरपरिषद वणी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला खो, लाभार्थ्यांना माहितीच नाहीवणी : शहरी भागातील अस्वच्छता कमी करण्यासाठी नगरपरिषदेमार्फत अभियान राबविण्यात येत आहे. यात शौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्याने निधी देण्याची तयारी केली. नगरपरिषदही त्यात आपला निधी देते. मात्र येथील नगरपरिषदेने शौचालयाबाबत कोणताच ठराव न घेता, सभेत लाभार्थी न निवडता शौचालयांचे बांधकाम सुरू केल्याची ओरड सुरू झाली आहे.ज्या परिसरात शौचालये नसतात, त्या परिसरात अस्वच्छता पसरलेली असते. संबंधित परिसरात आजार पसरतात. त्यामुळे जनतेला स्वच्छतेचे महत्त्व कळावे म्हणून शासनाने २००२ पासून स्वच्छता अभियानाची सुरूवात केली. आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले. त्यात शौचालय बांधण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे चार हजार, राज्य सरकारतर्फे आठ हजार, तर नगरपरिषदतर्फे चौदाव्या वीत आयोगातून पाच हजार रूपये, असा एकूण १७ हजार रूपयांचा निधी अनुदान म्हणून देण्याची तरतूद आहे. शहरी भागात अथवा ग्रामीण भागातही केवळ १७ हजार रूपयांत शौचालय बांधणे कठीण आहे. त्यामुळे आता आमदार किंवा खासदार निधीतून लाभार्थ्यांना किमान दोन हजार रूपये निधी मिळावा म्हणून नगरपरिषदेचा प्रयत्न सुरू आहे.शौचालय बांधण्याकरिता अर्जासोबत आधार कार्ड, बँक पासबुकाची सत्यप्रत देऊन एक हमीपत्र लिहून द्यावयाचे आहे. आरोग्य विभागातून विनामूल्य अर्ज मिळणार आहे. अनुदानाचा गैरवापर होऊ नये म्हणून नगरपरिषदेचे या बांधकामावर नियंत्रण व देखरेख राहणार आहे. आत्तापर्यंत शहरात ५१९ शौचालयांसाठी निधी उपलब्ध झाला. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या सहमतीने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यात प्रथम लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात सहा हजार रूपये जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी घरी शौचालयाचे बांधकाम करावयाचे आहे.नगरपरिषदने शौचालय बांधकामासाठी कोणताही कंत्राटदार अथवा बचत गटास नियुक्त केले नाही. लाभार्थ्यांनी स्वत: बांधकाम केल्यास ते जास्तीचे व अधिक चांगले आणि टिकावू काम करू शकतात, असा यामागे हेतू आहे. मात्र शासनातर्फे केवळ १७ हजार रूपयेच देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी शौचालयाचे काम केले किंवा नाही, याचा आराखडा तयार करतील. या योजनेत लोकांचा सहभाग चांगला असून ती उपयुक्त असल्याचे आरोग्य विभागाचे अभियंता ॠषीकेश देशमुख यांनी सांगितले.आता शौचालयासाठी अनेकांनी कागदोपत्री कारवाई पूर्ण केली. मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमाच झाले नाही. काहींना त्यांच्या अर्जाची निवड झाली की नाही, याबाबतही माहिती नाही. मात्र तरीही रामनगर, भोईपुरा, सर्वोदय चौकामधील काही नागरिकांनी आपल्या घरी शौचालयासाठी मोठे खड्डे करून ठेवले आहे. काहींनी कुणालाही न सांगताच घरी शौचालयाचे काम सुरू केले आहे. योजनेत नागरिकांचा सहभाग असावा म्हणून नगरपरिषदही चूप बसून आहे. दुसरीकडे मोमीनपुरा परिसरात काही ठिकाणी काम झाल्यानंतर लाभार्थ्यांना तुमच्या बँक विड्रॉलवर स्वाक्षरी मारून पासबुक द्या, अशी मागणी काही जण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. नगरपरिषदेने शौचालय बांधकामासाठी कुणासही नियुक्त केले नसताना, हे काय गौडबंगाल सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ज्यांनी अर्ज केले, असे अनेक नागरिक आता संभ्रमात आहे. (प्रतिनिधी)बांधकामाची नगर विकास विभागाकडे तक्रारशौचालयांचे काम परस्परच होत असल्याचे निदर्शनास येताच स्विकृत सदस्य पी.के.टोंगे यांनी या योजनेत मोठी गडबड असून २०११ च्या जनगणनेनुसार लाभार्थ्यांचा विचार केलेला नाही, अशी तक्रार नगर विकास विभागाच्या राज्य अभियान संचालकांकडे केली आहे. शहरात नगरपरिषदेने लाभार्थी निवडले नाही. नगरपरिषदेने या संदर्भात कोणताही ठराव घेतला नाही. संबंधित अभियंत्याने मर्जीने लाभार्थी निवडले. लाभार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रूपये जमा केले. सदस्यांना माहिती नसताना प्रभाग क्रमांक एक व चारमध्ये शौचालयाचे बांधकाम काम सुरू झाले. अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात आला नाही. ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर व देखरेख कोण करणार, याविषयी माहिती दिली नाही. लाभार्थ्यास अर्ज मंजूर झाल्याचे कळविले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. शहरात शौचालय बांधकाम करणारे ‘हेर‘ फिरत असून आमच्याकडून शौचालय बाधा, न बांधल्यास अनुदान मिळणार नाही, असे ते सांगत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.