शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच काँग्रेस जिल्हा कार्यालयाविना

By admin | Updated: July 1, 2014 00:51 IST

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात काँग्रेस कार्यकर्त्यांना हक्काचे व मालकीचे जिल्हा कार्यालयच नाही. आमदार वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

यवतमाळ : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात काँग्रेस कार्यकर्त्यांना हक्काचे व मालकीचे जिल्हा कार्यालयच नाही. आमदार वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांना हक्काचे कार्यालय हवे याची जाणीव होऊ लागली आहे. काँग्रेसचे आमदार वामनराव कासावार यांच्या आर्णी रोड स्थित बंगल्यात अनेक वर्षांपासून काँग्रेसने जिल्हा कार्यालय थाटले आहे. पक्षाचे सर्व कार्यक्रम, बैठका, प्रचार तेथूनच चालायचा. परंतु कासावार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान दोन-तीन दिवसांपासून या कार्यालयाला सातत्याने कुलूप दिसत आहे. कार्यालयावर नामफलक अथवा पक्षाचा ध्वजही दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हुरहूर पहायला मिळत आहे. राजीनाम्यानंतर कासावारांनी तर या कार्यालयाला कुलूप लावले नाही ना, अशी चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष असे, पक्षांतर्गत विरोधामुळे कासावारांनी जिल्हाध्यक्ष पद सोडले. आता कार्यकर्त्यांनाही कासावारांच्या बंगल्यात असलेल्या या पक्ष कार्यालयात जाताना तेवढा हक्क वाटत नाही. त्यामुळेच पूर्वी प्रमाणे कुणी कार्यकर्ता जोशात या कार्यालयाकडे फिरकला नाही. याच कार्यालयात आता दवाखाना थाटला जाणार असल्याची चर्चाही काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. जिल्ह्यात काँग्रेसला हक्काचे व मालकीचे कार्यालय नाही, ही बाब प्रत्येकालाच मान्य आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे माणिकराव ठाकरेंच्या रुपाने गेली सहा वर्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आहे. परंतु एवढ्या वर्षात त्यांना आपल्या गृहजिल्ह्यासाठी पक्षाच्या मालकीच्या कार्यालयाची निर्मिती करता आलेली नाही. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यातील सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्याकडे सतत लालदिवा आहे. त्यानंतरही या नेत्यांना यवतमाळ जिल्ह्यासाठी पक्षाचे हक्काचे कार्यालय एवढे वर्षात थाटता आलेले नाही. सत्तेतील भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकट्या यवतमाळात दोन ते तीन कार्यालये आहेत. त्या तुलनेत काँग्रेसची अवस्था वाईट मानली जाते. पाच आमदार आणि खुद्द महाराष्ट्राचे अध्यक्षपद यवतमाळात असताना एक जिल्हा कार्यालय या नेत्यांना थाटता येऊ नये, यातच त्यांचे अपयश दडलेले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)