शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलग्रामसाठी हवा बुस्टर डोज

By admin | Updated: December 20, 2015 02:38 IST

स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबांबाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत राज्य शासनाने निर्मलग्राम योजना हाती घेतली.

बीडीओंचे दुर्लक्ष : अभियानाकडे आठ तालुक्यांची पाठ, १२१ गावांचा आदर्श कागदावरचयवतमाळ : स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबांबाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत राज्य शासनाने निर्मलग्राम योजना हाती घेतली. प्रारंभी चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बक्षीस मिळताच या गावांचा उत्साह मावळला आहे. इतकेच नव्हेतर, आता स्वच्छतेसाठी नवीन गावे पुढे येण्यास तयार नाहीत. या गावांना बुस्टर डोज देण्यासाठी जिल्हा परिषदेने नवे पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर असावा म्हणून जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या काळात जोमाने काम झाले. त्यांची बदली होताच कामाची गती मंदावली. यानंतर या कामांना गती मिळावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पुढाकार घेतला. मात्र गटविकास अधिकारी याबाबत उत्सुक नसल्याचे दिसते. २००६ ते २०११ पर्यंत जिल्ह्यात १२१ गावे निर्मलग्राम म्हणून जाहीर झाले. त्या गावांना पुरस्कार मिळाला. नंतरच्या काळात या गावात मोठे फेरबदल झाले. पुरस्कार मिळाल्यानंतर ७० टक्के गावे पूर्वपदावर आली आहेत. या गावांना नव्याने स्वच्छतेचा मंत्र देण्याची गरज निर्माण झाली आहे. या योजनेचे आता हागणदारीमुक्त ग्राम असे नामकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी केवळ आठ तालुक्यांतील ११ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. (शहर वार्ताहर)आठ तालुक्यातील यंत्रणा ढिम्महागणदरीमुक्त ग्राम योजनेकडे आठ तालुक्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामध्ये उमरखेड, दारव्हा, नेर, मारेगाव, महागाव, कळंब, घाटंजी आणि दिग्रस तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि इतर यंत्रणा उदासीन आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.जिल्ह्यातील चार लाख ७० हजार कुटुंबांपैकी दोन लाख ५८ हजार कुटुंबांकडे शौचालये बांधण्यात आली आहेत. तर दोन लाख २२ हजार ५२ कुटुंबांकडे शौचालयेच नाही. या कामाला गती देण्यासाठी गावपातळीवर जाणीवजागृतीसाठी प्रशासनाला वेगाने काम करावे लागणार आहे. रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशनमधून नागरिकांना शौचालयासाठी १२ हजार रूपयांचा निधी मिळणार आहे.जिल्ह्यात स्वच्छतेचा शंखनाद करण्यासाठी जनजागृती समितीसह जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. ही समिती गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीला शेंडगाववरून प्रारंभ करणार आहे. पदयात्रा जाणीवजागृतीसाठी ५१ गावांना भेटी देणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वात ४० किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. बाभूळगाव तालुका गोदरीमुक्त करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यात स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.