शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

रेशन माफियाचे साम्राज्य मोडीत काढण्याचे धाडस जिल्हा पुरवठा विभाग दाखविणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

आर्णी येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या तीन सलग कारवाया सुमारे १६०० पोती रेशनचा गहू जप्त केला होता. मात्र, या तस्करीची लिंक पुढे उघड झाली नाही. पुरवठा विभागाकडून सकारात्मक अहवाल न मिळाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. आता 'लोकमत'च्या वृत्तमालिकेनंतर प्रशासनाचे या माफियाच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. हे साम्राज्य ठोस कारवाई करून मोडीत काढणार का, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काळ्या बाजारात धान्य विकणाऱ्या माफियांनी जिल्ह्यातील रेशन दुकानेच ताब्यात घेतली असून परवानाधारक दुकानदार केवळ नामधारी उरलेले आहेत. रेशनमाफियाच्या या कारनाम्याबाबत 'लोकमत'ने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कळंब येथून १६ लाखांच्या धान्यासह दोन ट्रक जप्त करीत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात धान्य माफिया काल्याचाही समावेश आहे. मात्र, केवळ एवढ्या कारवाईवर न थांबता प्रशासन जिल्ह्यातील रेशन माफियाचे हे साम्राज्य मोडीत काढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील १५ वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात शासकीय धान्याचा काळा बाजार करणारे रॅकेट कार्यरत आहे. दिग्रस, आर्णीसह यवतमाळमधून धान्य गोळा करणारी विंग आहे. दुसरीकडे रेशन दुकानदारांच्या गोदामातून धान्याची उचल करणारी स्वतंत्र यंत्रणा माफियाने उभारली आहे. यासाठी दहा ते बारा वाहनांचा ताफाही या माफियाकडे आहे. पंटरकडून जमा केलेल्या या धान्यावर घातक रसायनांचा प्रयोग करून त्याला चांगल्या प्रतीच्या धान्यात भेसळ करण्यासाठी वापरले जाते. यातून मोठी आर्थिक रसद रेशन माफियाला मिळत आहे. वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा कारभार चालविला जात आहे. गुरुवारी ज्या धान्य माफियावर कारवाई करीत तांदूळ आणि गहू जप्त करण्यात आला आहे, त्याच धान्य माफियाचा २०१८ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कळंब येथे २०० पोती तांदूळ जप्त केला होता. यावेळी या माफियाचे अवैध गोडाऊनही नष्ट केले होते. मात्र, गुरुवारच्या कारवाईनंतर या माफियाचे कारनामे बिनबोभाट सुरूच होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धान्य माफिया काल्याचा भुरटा चोर ते रेशन माफिया हा प्रवास पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांना धरून सुरू असल्याचे दिसते. आर्णी येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या तीन सलग कारवाया सुमारे १६०० पोती रेशनचा गहू जप्त केला होता. मात्र, या तस्करीची लिंक पुढे उघड झाली नाही. पुरवठा विभागाकडून सकारात्मक अहवाल न मिळाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. आता 'लोकमत'च्या वृत्तमालिकेनंतर प्रशासनाचे या माफियाच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. हे साम्राज्य ठोस कारवाई करून मोडीत काढणार का, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

त्या सात दुकानदारांचे निलंबन पुरवठा विभाग करणार कधी ? 

- यवतमाळमधील सात परवानाधारकांनी तपासणीला सहकार्य केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र वस्तू अधिनियम १९७५ नुसार कारवाई प्रस्तावित आहे. तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी डीएसओंकडे २८ जूनला अहवाल दिला. त्यावर पुरवठा विभागाने तब्बल दीड महिना केवळ सुनावणीमध्ये घालविला. हा विषयही ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर आता पुरवठा निरीक्षकांनी संबंधित दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. या बाबतची कारवाई पुरवठा विभाग करणार कधी?.

 

टॅग्स :mafiaमाफिया