शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

इसापूर धरण येथे आता वन्यजीव अभयारण्य

By admin | Updated: December 29, 2014 23:51 IST

इसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल

नंदकिशोर बंग - शेंबाळपिंपरीइसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल व वनविभाग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून याठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांची पैदास करण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच इसापूर विश्रामगृहावर एका संयुक्त बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. पुसद तालुक्यातील इसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पक्षी अभयारण्य म्हणून शासनाने घोषित केले होते. वन व महसूल विभागाने संयुक्त पाहणी केली. अहवालही पाठविला होता. मात्र या परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असल्याने आता याठिकाणी वन्यजीव अभयारण्य म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. पुसद तालुक्यातील राखीव वनक्षेत्रातील २०८६.७४ हेक्टर जमीन तर हिंगोली वनविभागातील ४३९.५५ अशी एकूण २९२३.२८५ हेक्टर जमीन जलसंपदा विभागाने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पासाठी संपादित केली आहे. ६३८.३४ हेक्टरचे क्षेत्र वनविभागाचे आणि खासगी वने तर २२०.०६ हेक्टर जमीन वन्यजीव अभयारण्यासाठी संपादित करण्यात येणार आहे. सदर अभयारण्य ३७.८० चौरस किलोमीटर परिसरात राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील नाणंद, जांबनाईक, अनसिंग, गौळ मांजरी, गोपवाडी, सातेफळ, बुटी तर हिंगोली जिल्ह्यातील खानापूर, दुर्ग सावंगी, सावरगाव, टाकळी, वागदरा तर खासगी क्षेत्रातील जांबनाईक, अनसिंग, सुकमी, गौळ मांजरी, पाचफूड, उटी, इसापूर अशा ३३ शेतातील २२०.०६ हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच एक संयुक्त बैठक घेण्यात आली. इसापूर विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, पंचायत समिती सदस्य शशीकला चंदेल, प्रेम मेंढे, उपवनसंरक्षक एस.व्ही. आलुरवार, हिंगोलीचे उपविभागीय वन अधिकारी एच.एम. कांबळे, पैनगंगा नगरचे उपअभियंता आनंद शर्मा, जी.एम. राठोड, शेंबाळपिंपरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शकील अहेमद खान, सदबाराव मोहटे, डॉ. बी.जी. नाईक, महेंद्र मस्के, बाबूराव कांबळे आदी उपस्थित होते. या सभेमध्ये पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत २६ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच वृक्षतोड, आरा गिरणी उभारणी, प्रदूषण निर्माण करणारे उद्योग, शेतीच्या प्रणालीबद्दल अक्षय ऊर्जेचा स्वतंत्र वापर, हवा आणि वादळाचे प्रदूषण, नैसर्गिक पाणी व द्राव्याचा स्त्राव, घनकचरा, पर्यावरण तंत्रज्ञानाचा वापर आदी मुद्यांवर उपविभागीय वनअधिकारी एस.आर. दुमारे यांनी माहिती दिली. तसेच ठरावही मंजूर करण्यात आला.