शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

इसापूर धरण येथे आता वन्यजीव अभयारण्य

By admin | Updated: December 29, 2014 23:51 IST

इसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल

नंदकिशोर बंग - शेंबाळपिंपरीइसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल व वनविभाग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून याठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांची पैदास करण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच इसापूर विश्रामगृहावर एका संयुक्त बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. पुसद तालुक्यातील इसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पक्षी अभयारण्य म्हणून शासनाने घोषित केले होते. वन व महसूल विभागाने संयुक्त पाहणी केली. अहवालही पाठविला होता. मात्र या परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असल्याने आता याठिकाणी वन्यजीव अभयारण्य म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. पुसद तालुक्यातील राखीव वनक्षेत्रातील २०८६.७४ हेक्टर जमीन तर हिंगोली वनविभागातील ४३९.५५ अशी एकूण २९२३.२८५ हेक्टर जमीन जलसंपदा विभागाने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पासाठी संपादित केली आहे. ६३८.३४ हेक्टरचे क्षेत्र वनविभागाचे आणि खासगी वने तर २२०.०६ हेक्टर जमीन वन्यजीव अभयारण्यासाठी संपादित करण्यात येणार आहे. सदर अभयारण्य ३७.८० चौरस किलोमीटर परिसरात राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील नाणंद, जांबनाईक, अनसिंग, गौळ मांजरी, गोपवाडी, सातेफळ, बुटी तर हिंगोली जिल्ह्यातील खानापूर, दुर्ग सावंगी, सावरगाव, टाकळी, वागदरा तर खासगी क्षेत्रातील जांबनाईक, अनसिंग, सुकमी, गौळ मांजरी, पाचफूड, उटी, इसापूर अशा ३३ शेतातील २२०.०६ हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच एक संयुक्त बैठक घेण्यात आली. इसापूर विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, पंचायत समिती सदस्य शशीकला चंदेल, प्रेम मेंढे, उपवनसंरक्षक एस.व्ही. आलुरवार, हिंगोलीचे उपविभागीय वन अधिकारी एच.एम. कांबळे, पैनगंगा नगरचे उपअभियंता आनंद शर्मा, जी.एम. राठोड, शेंबाळपिंपरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शकील अहेमद खान, सदबाराव मोहटे, डॉ. बी.जी. नाईक, महेंद्र मस्के, बाबूराव कांबळे आदी उपस्थित होते. या सभेमध्ये पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत २६ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच वृक्षतोड, आरा गिरणी उभारणी, प्रदूषण निर्माण करणारे उद्योग, शेतीच्या प्रणालीबद्दल अक्षय ऊर्जेचा स्वतंत्र वापर, हवा आणि वादळाचे प्रदूषण, नैसर्गिक पाणी व द्राव्याचा स्त्राव, घनकचरा, पर्यावरण तंत्रज्ञानाचा वापर आदी मुद्यांवर उपविभागीय वनअधिकारी एस.आर. दुमारे यांनी माहिती दिली. तसेच ठरावही मंजूर करण्यात आला.