शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

दिग्रसच्या धावंडाला जलपर्णीचा विळखा

By admin | Updated: June 2, 2014 01:51 IST

शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या आणि महापुरात १९ जणांचा बळी घेणार्‍या धावंडा

दिग्रस : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या आणि महापुरात १९ जणांचा बळी घेणार्‍या धावंडा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. नदीपात्र हिरवेगार झाले असून पावसाळा तोंडावर आला तरी स्वच्छतेबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. परिणामी यावर्षीच्या पावसाळ्यातही नदी तीरावरील घरांना पुराचा धोका संभवतो.

दिग्रस शहरातून धावंडा नदी वाहते. शहराच्या मध्यभागातून वाहणारी ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रात जलपर्णी आणि बेशरम वाढली आहे. जलपर्णीच्या विळख्याने नदीचे पात्र हिरवेगार झाले आहे. धावंडा नदीच्या पात्रात शहरातील गटाराचे पाणीही येते. त्यामुळे नदीत पूर्ण घाण पाणी साचले आहे. उन्हाळ्यात साचलेल्या डबक्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. तसेच नदी तीरावर आणि पात्रातही मोठय़ा प्रमाणात बेशरमचे झुडूपे वाढली आहे. प्रशासनाने अद्यापपर्यंत नदी स्वच्छतेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. पावसाळ्यात थोडाजर पाऊस झाला तरी धावंडा नदीला पूर येतो. बेशरम आणि जलपर्णीमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. परिणामी नदी तीरावरील घरांमध्ये पुराचे पाणी शिरते.

नांदगव्हाण धरण फुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. या महापुरात १९ जणांचे बळी गेले. अर्धे शहर जलमय झाले होते. त्यानंतर पुनर्वसनासह विविध कामे सूचविण्यात आली. मात्र पुनर्वसनाचेही घोडे अडले आहे. आता पावसाळा तोंडावरच आला आहे. मात्र अद्यापही नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. पावसाळा आला की नदी तीरावरील नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. अन्यथा अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)